शहरं
Join us  
Trending Stories
1
मातृभाषेसोबतच आणखी एक भारतीय भाषा शिकवा; यूजीसीचं सर्व राज्यांना पत्र, नियमावली जारी
2
काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
आजचे राशीभविष्य, ०८ डिसेंबर २०२५: आपण केलेल्या कामातून यश अन् कीर्ती लाभ होईल
4
इंडिगोवर मोठा आर्थिक दंड लावा; डीजीसीए आणि कंपनीच्या प्रमुखांना हटवा
5
यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा
6
देशातील सर्वांत मोठी एअरलाइन का डगमगली?; नवीन नियमांमुळे संकट! कमी कर्मचारी मॉडेलचाही फटका
7
विमानसेवाच जमीनदोस्त ! अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू, प्रवाशांचे हाल
8
विरोधी पक्षनेतेपद मुद्यावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; ‘मविआ’ला खुर्चीचीच चिंता असल्याची सरकारची टीका
9
महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
10
विमानतळावर इंडिगोने स्थापन केला आपत्ती व्यवस्थापन गट; अडथळ्यांबाबत २४ तासांत स्पष्टीकरण देण्याची नोटीस
11
क्रिकेटपटू स्मृती मानधना अन् पलाशचे लग्न अखेर माेडले; कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा : स्मृती
12
...ये दोस्ती हम नही तोडेंगे ! मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे अमेरिका, युरोप आणि चीनचेही होते लक्ष
13
आजी-आजोबांच्या ‘स्क्रीन’च्या ‘व्यसनां’चं काय करणार?
14
गोव्यात नाइट क्लब ठरला ‘मृत्यू क्लब’; अग्नितांडवात २५ ठार; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
15
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
16
Bigg Boss 19: गौरव खन्नाने करुन दाखवलं! 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोरलं नाव
17
गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
18
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
19
'बिग बॉस १९'मधून तान्या मित्तलचा प्रवास संपला; प्रणित मोरेची टॉप ३ मध्ये एन्ट्री, ट्रॉफी जिंकणार?
20
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

यापुढे एकटेच लढणार आणि जिंकणार! उद्धव ठाकरेंकडून स्वबळाचा पुनरुच्चार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2018 14:27 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा स्वबळाचा पुनरुच्चार केला. यापुढे प्रत्येक निवडणुकीत एकटेच लढणार आणि निवडणूक जिंकणार, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

औरंगाबाद -  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा स्वबळाचा पुनरुच्चार केला. यापुढे प्रत्येक निवडणुकीत एकटेच लढणार आणि निवडणूक जिंकणार, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. शरद सहकारी साखर कारखान्याच्या द्वितीय गळीत हंगामाचा शुभारंभ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. यावेळी बोलताना ठाकरे यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला. 25 वर्ष भाजपला सांभाळले. प्रत्येक वेळी मदत केली. मात्र आता एकटेच लढणार आणि एकटेच विजयी होणार आहोत. नुकसान कोणाचे होणार हे कळलेच. घरात घुसायला लागलात. आता सोडणार नसल्याचा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.शिवसेनेने राज्यात सर्वात अगोदर  शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. शेतकरी हा विषय शहरात मांडला. कारण शेतकरी हा अन्नदाता आहे. त्याला कर्जमुक्त करण्याचे उद्दिष्ट शिवसेनेचे आहे. जी काही शेतकऱ्यांना मदत मिळाली. ती शिवसेनेमुळेच मिळाली असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.2022 पर्यंत राहणार का?केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पडला आहे. 2022 पर्यंत शेतकऱ्यांना हे देणार, ते देणार, दुप्पट उत्पन्न करणार हे सगळं खरंय पण तुम्ही राहणार आहात का? तुमचा निकाल जनताच लावणार आहे. नुसत्याच घोषणा केल्या जात आहेत. अंमलबजावणीचा पत्ता नाही. सौभाग्य योजना, उज्जवला योजना अशा योजनांची संख्या मोजा, आपणाला आठवणार नाहीत. पण नुसत्याच घोषणा. यामुळे आता एकटी शिवसेना एकहाती सत्ता मिळवेल आणि विकासाची गंगा शेतकऱ्यांपर्यंत पोहचवले, असेही ठाकरे म्हणाले. डल्ला मारणारे हल्लाबोल करताहेतसध्या काहीजण रस्त्यावर उतरले आहेत. शिवसेना सत्तेत असून विरोधाची भूमिका घेत असल्याची टीका करतात.पण स्वतःसाठी कधीतरी टीका केली का? जनतेसाठीच टीका करत आहोत. परंतु हे डल्ला करणारेच हल्लाबोल करत आहेत, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली.भाषण अर्ध्यावर सोडावं लागलंउद्धव ठाकरे यांनी भाषण करण्यासाठी सुरुवात केली. मात्र जनरेटर सतत बंद पडत असल्यामुळे अर्ध्यावर सोडून द्यावे लागले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण