शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे”: सरसंघचालक मोहन भागवत
2
“मोदी सरकार काय लपवायचा प्रयत्न करत आहे?”; SIR वरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा सवाल
3
नगरपरिषद निवडणुकांसाठी एकनाथ शिंदेंचा धडका, १० दिवसांत ५३ सभा; जनता कौल देईल का?
4
पुतिन यांच्या भारत दौऱ्यात सर्वात मोठ्या डीलची तयारी...! संपूर्ण जग बघत राहणार, पाकिस्तान-चीनचं टेन्शन वाढणार
5
“CM असताना अडीच तासांपेक्षा जास्त कधी झोपलो नाही, विरोधकांची झोप उडवली”: एकनाथ शिंदे
6
महापरिनिर्वाण दिन २०२५: मध्य रेल्वे अतिरिक्त विशेष लोकल सेवा चालवणार; पाहा, वेळापत्रक
7
"...तर ताबडतोब देश सोडा!", डोनाल्ड ट्रम्प यांची मादुरो यांना फोनवर थेट धमकी; अमेरिका-व्हेनेझुएला युद्ध पेटणार?
8
अंत्यविधीसाठी कुटुंब परगावी, चोरट्यांनी साधली संधी; वॉशिंग मशीनमधील दागिने-पैसे केले लंपास
9
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
10
याला म्हणतात 'इंटरनॅशनल बेइज्जती'! रशियन तरुणींना कोणत्या देशाचे तरुण सर्वाधिक आवडतात? पाकिस्तानी ब्लॉगरचा VIDEO पाहून हसू आवरणार नाही!
11
VIDEO : रोहित-गंभीर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममधील व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा
12
SIR वरुन पश्चिम बंगालमध्ये तणाव वाढला; कोलकात्यात शेकडो BLO चे तीव्र आंदोलन...
13
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
14
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
15
तीन स्मार्ट मैत्रिणी अन् महिन्याला लाखोंची कमाई ! ब्रम्होसची माहिती देत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांतला केवळ तीन वर्षांची शिक्षा
16
लैंगिक शोषणाच्या तक्रारींची भिती दाखवणाऱ्या प्राध्यापकाला इतकी सौम्य शिक्षा कशी? चार प्राध्यापकांची केली होती फसवणूक
17
IND vs SA: रोहित शर्मासोबत एअरपोर्टवर नेमकं काय घडलं? विराट कोहलीही टक लावून बघतच बसला...
18
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
19
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
20
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
Daily Top 2Weekly Top 5

दर तीन महिन्याला बिले मिळेनात, हजारोंची बिले एकदाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : महाकृषी ऊर्जा अभियानात जिल्ह्यातील २ लाख २७ हजार कृषिपंप ग्राहकांना वीजबिल कोरे करण्याची संधी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

औरंगाबाद : महाकृषी ऊर्जा अभियानात जिल्ह्यातील २ लाख २७ हजार कृषिपंप ग्राहकांना वीजबिल कोरे करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही बाब शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी ठरत असून, या ग्राहकांना दर तीन महिन्याला बिले दिली जात असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे; परंतु कृषिपंप ग्राहकांना वर्षानुवर्षे वीजबिलेच मिळत नाहीत. तसेच बिल जेव्हा येते, त्यावेळी हाती पैसे नसतात. त्यामुळे थकबाकी वाढत असल्याची ओरड शेतकऱ्यांमधून होत आहे.

शेतकऱ्यांकडून नवीन कृषिपंप वीज धोरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऑक्टोबर २०२०मध्ये नवीन कृषिपंप वीज धोरण जाहीर झाले. या धोरणात थकबाकी भरण्यासाठी महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत विविध सवलती जाहीर करण्यात आल्या. त्यानंतर औरंगाबाद परिमंडळात १ मार्चपर्यंत ४२ हजार २६३ शेतकऱ्यांनी २१ कोटी ९५ लाखांचा भरणा केला आहे. यासंदर्भात शेतकरी लक्ष्मण चंदेल (शिल्लेगाव) म्हणाले, दोन-तीन वर्षांपूर्वी पाऊस नव्हता. त्यामुळे विहिरीला पाणी नव्हते, तरीही वीजबिल आले. सचिन वाल्मीकराव शेलार (शहाजतपूर) म्हणाले, कोरोना काळात शेतकरी हातघाईस आले असून, वीजबिल माफ केले पाहिजे. विजेचा वापर कमी होत असताना बिले मात्र जास्तीची येत आहेत, ही मोठी अडचण आहे.

तालुकानिहाय कृषिपंपचालक

औरंगाबाद - २८,८०७

गंगापूर - २७,९०६

कन्नड - ३१,४९१

खुलताबाद - ११,३०६

पैठण - ३१,४४६

फुलंब्री - १९,१७१

सिल्लोड - २७,७४०

सोयगाव - ९,३०७

वैजापूर - ३९,९४९

---

जिल्ह्यातील कृषिपंपचालक - २,२७,१२३

वीजबिल थकबाकी - २,६७२ कोटी

----------

कृषिपंपधारकांना दर तीन महिन्यांनी वीजबिल दिले जाते. शिवाय मोबाईवरही बिल कळवले जाते. ज्यांनी मोबाईल नंबरची नोंदणी केली नसेल, त्यांना माहिती मिळत नसेल. नियमितपणे वीजबिलाचे वितरण केले जाते.

- संजय अकोडे, अधीक्षक अभियंता, (ग्रामीण) महावितरण

-------

मी चार वर्षांपूर्वी कृषी संजीवनी योजनेत जुने थकीत बिल भरले व बेबाकी करून विहिरीवर विद्युत मीटर बसवला; परंतु चार वर्षांत एकदाही मीटर रिडींग न घेता, मला ६३ हजारांचे बिल देण्यात आले. विशेष म्हणजे, माझ्या मीटरमध्ये आज रोजी ९ हजार ७४१ युनिट असताना ३६ हजार ५३० युनिटचे बिल पाठवले आहे.

- एस. लक्ष्मण, लाडसावंगी

---

महावितरण कंपनी तीन ते चार वर्षांत एकदा वसुलीसाठी येते. ज्याचे लाख-दोन लाख बिल थकले, त्याच्याकडून पाच हजार रुपये व ज्याचे दहा ते वीस हजारांचे बिल थकले, त्याच्याकडूनही पाच हजार रुपयेच वसूल केले जातात.

- राजेंद्र डवणे, सय्यदपूर

------

ज्यावेळेस पैसे असतात, त्यावेळी बिल येत नाही. ज्यावेळी शेतकऱ्यांकडे पैसे नसतात, त्यावेळी वीजबिल येते. विजेसंदर्भात असलेल्या अडचणीही सोडवल्या जात नाहीत. महावितरणने वाढीव बिलाची समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले पाहिजे.

- रामेश्वर निघोटे, हडस पिंपळगाव