शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
4
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
5
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
6
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
7
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
8
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
9
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
10
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
11
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
12
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
13
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
14
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
15
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
20
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री फडणवीस- उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यात कुरघोडी? उदय सामंत यांनी दिले थेट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 19:06 IST

तलावांच्या कामांवरील स्थगितीवरही मांडली उदय सामंत यांनी भूमिका

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कुठल्याही मुद्यांवरून कुरघोडीचे राजकारण सध्या नाही. दोघांमध्ये सामंजस्याचा संवाद आहे. दोघांमध्ये अतिशय चांगले बॉण्डिंग असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांना सांगितले. शहरात कौशल्य विकास केंद्राचा आढावा घेण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत आले होते. तत्पूर्वी विमानतळावर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्कालीन शिंदे सरकारच्या १४ तलाव संरक्षण प्रकल्पांतर्गत घेतलेले निर्णय रद्द केल्याचे बोलले जात आहे. त्यात शिंदे यांनी मंजूर केलेल्या ११ प्रकल्पांचा समावेश होता. त्यासाठी वितरित केलेले ७३ कोटी परत मागण्यात आले आहेत. अशी चर्चा सुरु आहे. यावर सामंत म्हणाले, सरकारमध्ये येऊन एक वर्ष सात महिने झाले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यात काहीही कुरघोडी नाही. काही तांत्रिक अडचणींमुळे तलावांबाबतचा निर्णय झाला असावा. मराठवाड्यात मागील तीन महिन्यात २१७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकारला आणखी किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या हव्या आहेत, असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. यावर मंत्री सामंत म्हणाले, आत्महत्यांचे प्रमाण थांबले पाहिजे. त्या होऊच नये हीच सरकारची भूमिका आहे. शेतकऱ्यांनीही आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलू नये.

कडूंना भेटणार नाही....प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू आणि मंत्री सामंत यांची भेट झाल्याची चर्चा सुरू आहे. यावर सामंत म्हणाले, कडू हे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आहेत. आम्हाला एकमेकांना भेटण्याची अजिबात आवश्यकता नाही. मी त्यांना भेटलेलो नाही आणि भेटणारही नाही. खा. संजय राऊत यांनी दिलेल्या पत्रावर मुख्यमंत्री निर्णय घेतील. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधान परिषद उमेदवारीबाबत विचारले असता, ‘मी त्यावर बोलणार नाही’, असे सामंत म्हणाले. माजी खा. इम्तियाज जलील यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी ते सरकारकडे द्यावेत. पोलिस महानिरीक्षकांनी त्यांच्याकडील पुरावे घेण्यासाठी चौकशीसाठी बोलवावे, असेही सामंत म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : No rivalry between Fadnavis and Shinde, says Uday Samant.

Web Summary : Minister Uday Samant denies any political rivalry between Fadnavis and Shinde, emphasizing their strong bond. He addressed concerns about cancelled lake projects, attributing it to technical issues. Samant also commented on farmer suicides and stated that he wouldn't meet Bachchu Kadu.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेUday Samantउदय सामंत