शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
3
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
4
Mithilesh Tiwari: बिहारच्या मुख्यमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
5
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
6
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
7
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
8
नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय
9
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
10
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
11
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
12
अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?
13
'२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आणखी एक मोठा इशारा
14
Google New QR Code: गुगलचा मास्टर प्लॅन! आता QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणतीही वेबसाईट उघडणार नाही; पाहा काय आहे नवा नियम
15
एका पेक्षा एक तगड्या खेळाडूंपासून सारं काही होतं, पण...., ही बाब ठरली मुंबईच्या अपयशाचं सर्वात मोठं कारण
16
‘तुम तो ठहरे परदेसी’चे गीतकार जहीर आलम यांचे निधन; शब्दांनी जग जिंकले, पण आयुष्य काढले गरिबीत
17
रात्रभर घराबाहेर खाटेवर झोपला, सकाळी 'पत्नी विष प्यायली' म्हणत रडला; क्रूर पतीचा 'असा' उघड झाला बनाव!
18
Daily Worship: १०० वर्षांचे आयुष्य आणि निरोगी शरीर हवंय? मग रोज सकाळी म्हणा 'हा' प्रभावशाली श्लोक
19
मृत्यूला हरवलं, कॅन्सरशी लढत अद्वैती बनली 'टॉपर'; जिद्द, संघर्षमय यशाच्या प्रवासाचा विद्यार्थ्यांसमोर आदर्श
Daily Top 2Weekly Top 5

नऊ दलघमी पाणी सोडले

By admin | Updated: July 25, 2014 00:27 IST

लक्ष्मण दुधाटे , पालम पालम तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्यातून नांदेड शहरासाठी २४ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली होती.

लक्ष्मण दुधाटे , पालम
पालम तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्यातून नांदेड शहरासाठी २४ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली होती. चार दरवाजे उघडून दुपारी १.०० वाजेपर्यंत चोख पोलिस बंदोबस्तात ९ दलघमी पाणी सोडण्यात आले आहे. पाणी सोडताना वाद होऊ नयेत, यासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने डिग्रस परिसराला छावणीचे स्वरुप आले होते.
डिग्रस बंधाऱ्यातील पाण्याचा प्रश्न नेहमीच वादात सापडला आहे. दोन महिन्यापूर्वी पाणी सोडताना शासकीय अधिकारी व स्थानिकांचा वाद शिगेला पोहचला होता. यामुळे पाणी सोडण्यात आले नव्हते. मागील आठ दिवसांपासून बंधाऱ्यातील पाणी नांदेडला पळविण्यासाठी हालचाली सुरू होत्या. परभणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्याने पाणी सोडण्याची प्रक्रिया झपाट्याने पार पडली.
स्थानिकांचा होणारा विरोध मोडून काढण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा ठेवण्यात आला होता. २४ जुलै रोजी पहाटेपासून पोलिसांची वाहने डिग्रस परिसरात दाखल होण्यास सुरुवात झाली होती. बंधाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी नाकेबंदी केल्याने स्थानिकांना विरोध करण्यासाठी संधी मिळाली नाही. सकाळी ९.३० मिनिटांनी बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्यास सुरुवात झाली.
टप्याटप्याने चार दरवाजे उघडून १२.४५ मिनिटांला दरवाजे बंद करण्यात आले आहेत. या कालावधीत बंधाऱ्यातील ९ दलघमी पाण्याचा विसर्ग झालेला आहे. दरवाजे बंद करताना वीज पुरवठा खंडित झाल्याने मनुष्य बळाचा वापर करीत दरवाजे बंद करावे लागले. बंधाऱ्यातील ९ दलघमी पाणी सोडल्याने बंधाऱ्यात आता केवळ १२ दलघमी पाण्याचा साठा राहिल्याने गोदावरीने तळ गाठला आहे. यावेळी पोलिस प्रशासनाचा कडक बंदोबस्त ठेवला होता. यावेळी पाणी सोडताना उपविभगीय अधिकारी गोविंद रणवीरकर, अप्पर पोलिस अधीक्षक नियती ठक्कर, तहसीलदार डॉ. भवानजी आगे, नायब तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांच्यासह विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते. तसेच मोठा पोलिस बंदोबस्त होता़ (प्रतिनिधी)
खाकी वर्दीचा धाक
डिग्रस बंधाऱ्यातील पाणी सोडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा मागील चार दिवसांपासून गतीमान झाली होती. स्थानिकांचा विरोध मोडून काढण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात होत्या. यापूर्वी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करून प्रशासनाने दहशत निर्माण केलेली आहे. त्यामुळे पाणी सोडताना विरोध केल्यास कारवाई होईल, या भितीने अनेक जण चिंतेत होते. २४ जुलै रोजी पाणी सोडताना विरोध होऊ नये यासाठी स्थानिक जनतेला खाकी वर्दीचा धाक दाखविला जात होता. रस्त्यावर जागोजाग नाकेबंदी करून डिग्रसच्या हद्दीत प्रवेश करणाऱ्यांची चौकशी केली जात होती. त्यामुळे पाणी सोडण्यासाठीचा विरोध कमी झाला.
पात्रात शिल्लक राहिला गाळ
डिग्रस बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे. यामुळे आतापर्यंत काठोकाठ असलेली गोदावरी रिकामी झाली आहे. भरपूर पाणी सोडल्याने गोदावरीच्या पात्रात आता गाळच शिल्लक राहिलेला आहे. शासकीय अधिकाऱ्यांच्या मोजमापाप्रमाणे १२ दलघमी पाण्याचा साठा शिल्लक राहिला, असे कागदावर असले तरीही या पाण्यात गाळाचे प्रमाण जास्त आहे. गोदावरीच्या पात्रातील मोठमोठे खड्डे गाळाने भरल्याने गोदावरीचे पात्र उथळ झाले आहे. परिणामी पाण्याची साठवण म्हणावी तशी शिल्लक राहत नाही. सध्या नांदेडला पाणी सोडल्यामुळे पात्रात गाळ शिल्लक आहे.