शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
4
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
5
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
6
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
7
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
8
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
9
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
10
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
11
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
12
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
13
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
14
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
15
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
16
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
17
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
18
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
19
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
20
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
Daily Top 2Weekly Top 5

नव्या महापौैर, उपमहापौैरांना करावा लागेल आव्हानांचा सामना

By admin | Updated: November 21, 2014 00:47 IST

दत्ता थोरे , लातूर लातूर नगरीच्या दुसऱ्या महापौैर पदाचा अख्तर शेख आणि उपमहापौैर पदाचा कैैलास कांबळे हे शनिवारी पदभार घेणार आहेत. पक्षनिष्ठेने मिळालेली पदे कष्टाने टिकवावी लागतात.

दत्ता थोरे , लातूरलातूर नगरीच्या दुसऱ्या महापौैर पदाचा अख्तर शेख आणि उपमहापौैर पदाचा कैैलास कांबळे हे शनिवारी पदभार घेणार आहेत. पक्षनिष्ठेने मिळालेली पदे कष्टाने टिकवावी लागतात. पहिल्यांना मिळालेले मार्क दुसऱ्याने वाढवावे लागणार आहेत. लातूरकरांच्या नजरा या दोघांकडे लागल्या असून त्यांनाही आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. लातूर मनपाची मुख्य अडचण म्हणजे आर्थिक घडी विस्कटलेली. उत्पन्नाचे स्त्रोत कमी आणि खर्चाला हजार वाटा आहेत. एलबीटीबाबत सरकारचे धरसोडीचे धोरण आणि उत्पन्नाला नवे पर्याय न शोधण्याची भूमिका यामुळे मनपात खरा गोंधळ आहे. अधिकाऱ्यांवर अंकुश नाही. द्वितीय व तृतीय श्रेणीतील प्रत्येक अधिकारी कुणाच्या ना कुणाच्या तरी लग्यातला आहे. वर्षानुवर्षे काहीजण एकाच जागी ठाण मांडून आहेत. अदलाबदली केली तरी जागचे हलेनात. अशा धोंडांना त्यांच्या जागा दाखवाव्या लागतील. प्राधान्य द्यावे लागेल ते पाण्याला. कारण यांच्या निवडीनंतरचा उन्हाळा आतापासून जाणवू लागला आहे. लिंबोटीचा प्रस्ताव शाईपासून वेगळा व्हायला तयार नाही आणि भंडारवाडीला मुहूर्त नाही. आता पदभार घेतल्यापासून ठोस निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर पदाधिकारी आणि श्रेष्ठी दोघांनाही बदनामीचा सामना करावा लागेल. हा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढायचा असेल तर मीटरपासून रेन हार्वेस्टिंगपर्यंत काही कडू-गोड निर्णय राबवावे लागणार आहेत. शहराला अनेक आजारांनी ग्रासले आहे. कचऱ्याचा पार नारु झालाय. डेंग्यूच्या उद्रेकात लातूरकर ‘झोपले’. किती दिवस कचऱ्याचे घोंगडे भिजत ठेवणार ? कुणाचे भले करा नाहीतर ? पण हा निर्णय निकाली निघायला हवा, ही जनसामान्यांची अपेक्षा आहे. घरात नाहीतर घरासमोर दिसणारा कचरा हा पदाधिकाऱ्यांचा ‘कचरा’ करतो आहे. कॅरीबॅग मुक्तीच्या आणि डेंग्युमुळे स्वच्छतेच्या रॅल्या निघाल्या. लोकांना सुधारणा पाहीजेत अन् मनपा लोकांना प्रबोधन देतेय. मनपाच्या शाळा, दवाखाने यांना तर सलाईनची गरज आहे. फेरीवाल्यांसाठी मनपाचे आतापर्यंतचे काम चांगले झालेय. अंतिम पुनर्वसनचा कळस बाकी आहे. नव्याने मंजूर झालेल्या महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान राज्यस्तर योजनेअंतर्गत १३३ कोटींच्या कामाला आता सुरुवात होईल. पुढचे भविष्य पाहून दर्जा वाढवावा लागेल. भंगार आणि डिझेल घोटाळ्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी दक्ष रहावे लागेल. झोन झालेत पण कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्षेत आहेत. आधीच्याच कर्मचाऱ्यांच्या पगारी नाहीत. नव्याचे कुठून देणार ? वाटा तर शोधाव्याच लागतील. महापौैर काय आणि उपमहापौैर काय दोघेही उपेक्षित घटकांतून पुढे आलेले आहेत. दोघांना मिळालेल्या पदांचा चांगला उपयोग करुन घ्यावा लागेल. पण उपयोगिता कामाशिवाय दिसणार नाही. सभागृहालाही शिस्त हवी. अधिनियम, राजदंड, राजमुद्रा आता तरी व्हावी. जिथे - जिथे अद्याप नगरपरिषद शब्द आहे तो पुसला जावा. पालिकेत असांसदिय शब्दप्रयोग आणि गोंधळाने काला केला होता. मागचा काळ बरा होता म्हणायची पाळी किमान आता येऊ नये, एवढी काळजी नव्या महापौैर आणि उपमहापौैरांनी घ्यावी, अशी अपेक्षा जनतेची आहे.