शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

‘बैठकीचा निव्वळ फार्स’

By admin | Updated: November 28, 2014 01:17 IST

औरंगाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादेत येऊन घेतलेल्या बैठकीतून आज काहीच निष्पन्न झाले नाही. यातून दुष्काळग्रस्तांना त्वरित मदत मिळण्याच्या दृष्टीने काहीही

औरंगाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादेत येऊन घेतलेल्या बैठकीतून आज काहीच निष्पन्न झाले नाही. यातून दुष्काळग्रस्तांना त्वरित मदत मिळण्याच्या दृष्टीने काहीही निर्णय झाला नसल्याबद्दल मराठवाड्यातील आमदारांनी नाराजी व्यक्त केली. ४ही बैठख निव्वळ देखावा होती. बैठकीत शेतकरी हिताचे काहीही निर्णय झालेले नाहीत. १९ हजार गावांसाठी सरकार केंद्र सरकारकडे साडेचार हजार कोटींची मदत मागणार आहे. राज्य सरकार काय करणार याची काहीही स्पष्टता झालेली नाही. माजी मंत्री आ. जयदत्त क्षीरसागर (राष्ट्रवादी काँग्रेस, बीड)४ब्रह्मगव्हाण- खर्डा प्रकल्पावर ८० टक्के खर्च झाला आहे. केवळ २० टक्के खर्चासाठी हा प्रकल्प रखडला आहे. या प्रकल्पासह आपेगाव, हिरडपुरीत पाणी सोडणे, जायकवाडीतून विविध गावांसाठी पाईप लाईन टाकणे आणि पैठणच्या अन्य प्रकल्पांना निधी देण्याची मी मागणी केली. त्यावर चर्चा करण्याचे आश्वासन मला मुख्यमंत्र्यांनी दिले. सकारात्मक चर्चा झाल्याने बैठकीवर मी समाधानी आहे. आ. संदीपान भुमरे (शिवसेना, पैठण)४ही निव्वळ आढावा बैठक होती. दि.१५ डिसेंबरपर्यंत फायनल आणेवारी घोषित केली जाणार आहे. राज्याचा प्रस्ताव केंद्राकडे जाणार आहे. त्यानंतर केंद्राचे पथक येईल. मग काय व्हायचा तो निर्णय होईल. सन २०१२ पेक्षा या वर्षीचा दुष्काळ मोठा आहे; परंतु या बैठकीने दुष्काळग्रस्तांच्या पदरात तात्काळ काहीच पडलेले नाही. मराठवाड्याच्या तोंडाला मुख्यमंत्र्यांनी पानेच पुसली आहेत. या बैठकीत केवळ पिण्याचे पाणी व रोजगारावर चर्चा झाली. ही कामे अधिकारी स्तरावर नियमित सुरू असतात. त्यासाठी मुख्यमंत्र्यांची गरज नसते. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्यावरही त्यांनी स्पष्ट मत व्यक्त केले नाही. शेवटी हे लबाडाचे जेवणाचे आमंत्रण आहे, पोट भरल्यावरच खरे. बैठकीवर मी समाधानी नाही. माजी मंत्री आ. अब्दुल सत्तार (काँग्रेस, सिल्लोड)येथे राजा उदारही झाला नाही आणि हाती भोपळाही दिला नाही. थातुरमातुर चर्चा करून बैठक गुंडाळण्यात आली. विद्युत रोहित्रे (डीपी) नसल्यामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. त्यावरही मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला नाही. राज्य सरकारने अद्याप केंद्राला मदतनिधीसाठी प्रस्तावही दिला नाही. तरीही हे केंद्राच्या मदतीचे सांगून आम्हाला वेड्यात काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. आ. अर्जुन खोतकर (शिवसेना, जालना)४काहीच निर्णय न घेता बैठक संपली. बैठकीचा निव्वळ फार्स होता. दुष्काळग्रस्त मराठवाड्याला काहीही दिलासा मिळाला नाही. बैठकीमुळे मी समाधानी नाही. आ. धनंजय मुंढे (राष्ट्रवादी काँग्रेस, बीड)मुळात दुष्काळ जाहीर होतो आणेवारीवर. ग्रामआणेवारीचे नियम ब्रिटिशकालीन आहेत. ते बदलल्याशिवाय काहीही पदरात पडणार नाही. या नियमामुळे अनेक गावांचा समावेश दुष्काळग्रस्त गावात होत नाही. हे नियम बदला, अशी आमची मागणी आहे. एवढे नक्की बैठक होऊनही आमच्या पदरात काहीच पडलेले नाही.आ. हर्षवर्धन जाधव (शिवसेना, कन्नड)