शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

ना मिळाले हेलिकॅप्टर, ना मिळाली भरलेली लाखोंची रक्कम; औरंगाबादच्या यात्रेकरूंना गंडविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 12:25 IST

हेलिकाॅप्टरने प्रवास लवकरात लवकर होणार असल्याचे समजून पुढील केलेल्या निवासाच्या बुकिंगचे गणित कोलमडले.

औरंगाबाद : उत्तरकाशीतील पवनहंस ट्रॅव्हल्स कंपनीच्या बनावट वेबसाईटवरून औरंगाबाद जिल्ह्यातील ७० भक्तांनी केदारनाथ, बद्रीनाथ व इतर तीर्थक्षेत्राला जाण्यासाठी ऑनलाईन हेलिकाॅप्टर सेवेसाठी बुकिंग केले. त्यापोटी ६ लाख रुपयांची रक्कमही भरली, परंतु हे भक्त गुप्तकाशीला पोहोचले, तेव्हा त्यांना ना हेलिकॉप्टर मिळाले ना भरलेली रक्कम परत मिळाली. डेहराडून येथील तहसीलदार व पवनहंस कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे भक्तांच्या लक्षात आले.

हेलिकाॅप्टरने प्रवास लवकरात लवकर होणार असल्याचे समजून पुढील केलेल्या निवासाच्या बुकिंगचे गणित कोलमडले. त्यामुळे ७० यात्रेकरूंवर मिळेल त्या व्यवस्थेने यात्रा पूर्ण करण्याची वेळ आली. तीर्थक्षेत्रांना जाण्यासाठी विमान अथवा हेलिकॉप्टर सेवा ऑनलाईन माध्यमातून घेण्यापूर्वी वेबसाईटची सत्यता पडताळणी करणे गरजेचे आहे.

चार दिवसांपूर्वी ७० जणांनी पवनहंस ट्रॅव्हल्स कंपनीच्या वेबसाईटवरून हेलिकॉप्टरची तिकिटे बुक केली. त्यातील दोन तिकिटे व कन्फर्मेशनचा मेसेज एजंटने व्हाॅट्सॲपवर पाठविला. गुप्तकाशीतील एकाला ती तिकिटे खरी आहेत का, यासाठी पाठविली. ती तिकिटे खरी होती. त्यामुळे बाकीच्या सर्व तिकिटांची रक्कम ऑनलाईन भरली, परंतु ७० यात्रेकरू डेहराडूनला पाेहोचले, त्यावेळी पवनहंसच्या कार्यालयात यांच्या नावाची नोंदही नव्हती आणि तिकीटेही नव्हती. असाच प्रकार हरियाणासह इतर राज्यांतील भक्तांसोबत झाल्याचे देखील तेथे दिसले. त्यानंतर यात्रेकरूंनी मनोज बोरा व इतर मित्रपरिवारांशी सपंर्क करून हा प्रकार कळविला. त्यांनी सहकार मंत्री अतुल सावे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना संपर्क करून या प्रकाराची माहिती दिल्यानंतर यात्रेकरूंना पुढील प्रवासासाठी सहकार्य, मदतीचा प्रयत्न केला.

ऑनलाईन बुकिंग खात्रीपूर्वक कराएन-३मध्ये राहणारे गिरीश पांडे यांचाही त्या ७० यात्रेकरूंमध्ये समावेश आहे. ‘लोकमत’शी बोलताना पांडे यांनी सांगितले की, औरंगाबाद, वैजापूर, श्रीरामपूर, जालना येथील ७० जणांचे बुकिंग केले होते. ६ लाख रुपये ऑनलाईन माध्यमातून दिले होते. दोन तिकिटे खरी पाठविली, उर्वरित डेहराडूनमध्ये कंपनीच्या काैंटरवर देणार असल्याचे कळविले, परंतु तेथे पाेहोचल्यावर आमची फसवणूक झाल्याचे समजले. पवनहंस कंपनीने देखील याबाबत स्थानिक पोलिसांत तक्रार दिली आहे. यापुढे औरंगाबादच्या नागरिकांनी ऑनलाईन तिकीट बुकिंग करताना खात्री करण्याचे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद