शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

नरेंद्र मोदींना दुष्काळग्रस्तांचा विसर - उद्धव ठाकरे

By admin | Updated: November 25, 2014 13:11 IST

निवडणुकीदरम्यान प्रत्येक गाव पिंजून काढत लोकांवर आश्वासनांची खैरात करणा-यांना आता दुष्काळग्रस्तांचा विसर पडला, अशी टीका उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींवर केली आहे.

ऑनलाइन लोकमत
जालना, दि. २५ - विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रत्येक गाव न गाव पिंजून काढणारे मोठमोठे नेते आता कुठे गेले? त्यांची लाट ओसरल्यावर आता फक्त कोरडा मराठवाडा उरलेला दिसत आहे, त्यांना दुष्काळग्रस्तांचा विसर पडला आहे अशा शब्दांत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. सध्या मराठवाड्याच्या दौ-यावर असलेले उद्धव ठाकरे जालना येथे बोलत होते. 
दोन महिन्यांपूर्वी राज्यात जत्रा भरलेली दिसत होती. अनेक मोठमोठे नेते आश्वासनांची खैरात करताना दिसत होते. त्यावेळी त्यांची सर्वत्र लाट होती असं म्हणतात मग आता ती लाट कुठे गेली? त्या लाटेतलं पाणी ओसरून गेल्यावर फक्त कोरडा मराठवाडाच दिसत आहे. ती मोठमोठी नेतेमंडळी आता तुम्हाला फक्त फोटोंतूनच दिसत आहेत, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.