शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

मराठवाड्याला पाणी देण्यास नगरच्या शेतकऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 3:17 PM

समन्यायी पाणी वाटपाबाबत बैठक सुरु असून दुपारपर्यंत याबाबत काही निर्णय झाला नाही. 

औरंगाबाद : नगरच्या शेतकऱ्यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे मंडळाच्या कार्यालयात येत जायकवाडी धरणात नगर जिल्ह्यातून पाणी सोडण्यास विरोध केला. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे मंडळात सध्या समन्यायी पाणी वाटपाबाबत बैठक सुरु असून दुपारपर्यंत याबाबत काही निर्णय झाला नाही. 

अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांचे पाणी जायकवाडीला सोडण्याबाबत आज गोदावरी मराठवाडा पाटबंधारे मंडळात बैठक सुरु आहे. या बैठकीत समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार वरच्या धरणातून सुमारे १२ टीएमसी पाणी जायकवाडीला देण्याचा निर्णय होणार आहे. आज दुपारी बैठका सुरु असताना नगर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी मंडळाच्या कार्यालयात येत हे पाणी वाटप समन्यायी नसून असमन्यायी असल्याचा आरोप करत पाणी वाटपाला विरोध केला. 

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे मंडळाच्या कार्यकारी संचालकांना त्यांनी या संदर्भात एक निवेदन दिले आहे. निवेदनात २०१२ पासून पाणी वाटप कायद्याद्वारे नगर आणि नाशिक जिल्ह्यातून पाणी नेले जाते हे अन्यायकारक आहे, जायकवाडी धरणाची क्षमता महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश राज्यातील वादामुळे वाढविण्यात आली आहे, जायकवाडीचे लाभक्षेत्र व ऊर्ध्व धरणांचे लाभ क्षेत्र यांची पीकनिहाय गरज व पर्जन्यमान विचारात घेतले नाही. जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात ११ उच्चस्तरीय बंधारे बांधण्यात आली आहेत, ही बंधारे शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या गरजा भागवत आहेत आदी कारणे नमूद करत आंदोलक शेतकऱ्यांनी वरच्या धरणातून पाणी सोडण्यास विरोध केला. 

दरम्यान, मराठवाड्यातील सर्व लोकप्रतिनिधीने दुष्काळी परिस्थिती पाहता समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार पाणी सोडण्याची मागणी केली आहे. यामुळे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे मंडळात बैठक आयोजित करण्यात आली आहे. आज दुपारपर्यंत या बैठकीत कोणताही निर्णय झालेला नव्हता.  

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीAurangabadऔरंगाबादAhmednagarअहमदनगरFarmerशेतकरी