शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
2
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
3
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
4
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
5
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
6
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
7
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
8
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
9
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
10
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
11
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
12
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
13
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
15
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
16
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
17
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
18
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
19
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
20
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार

भटक्या-विमुक्त चळवळीचे नेते मोतीराज राठोड यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 12:48 PM

महाराष्ट्रभरातील भटक्या-विमुक्तांची चळवळ उभी केली.

ठळक मुद्दे अनेक आंदोलनांनी त्यांनी महाराष्ट्र दणाणून सोडला होता.

औरंगाबाद : भटक्या-विमुक्त चळवळीचे नेते, विद्यापीठ नामांतर लढ्यातील अग्रणी व ज्येष्ठ साहित्यिक प्रा. मोतीराज राठोड यांचे आज दुपारी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. 

राठोड यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर त्यांच्या बंजारा कॉलनीतील निवासस्थानी चळवळीतील कार्यकर्त्यांची, बंजारा समाजाच्या स्त्री-पुरुषांची मोठी गर्दी झाली. गेल्या काही वर्षांपासून प्रा. राठोड हे कॅन्सरसारख्या आजाराशी मुकाबला करीत होते. आज सकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना एका खाजगी दवाखान्यात नेण्यात आले; परंतु उपचार सुरू करण्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. राठोड यांच्या पश्चात पत्नी कला राठोड, दोन मुले, मुलगी, नातवंडे व पतवंडे असा परिवार आहे. 

प्रा.  राठोड यांनी वसंतराव नाईक महाविद्यालयात हिंदीचे प्राध्यापक म्हणून सेवा केली. तसेच त्यांनी महाराष्ट्रभरातील भटक्या-विमुक्तांची चळवळ उभी केली. अनेक आंदोलनांनी त्यांनी महाराष्ट्र दणाणून सोडला होता. प्रा. राठोड यांचा जन्म २ सप्टेंबर १९४३ रोजी दिंडाळा तांडा, ता. उमरखेड, जि. यवतमाळ येथे झाला. १९६३ मध्ये नगरपालिकेत नाका कारकुनाची नोकरी करतानाच एम.ए. (मराठी), एम.ए. (हिंदी), एम.फिल.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. विद्यापीठ नामांतर चळवळीतही त्यांचा सहभाग होता. राज्य व राष्ट्रीय  पातळीवरील साहित्य अकादमीपासून ते विविध पुरस्कारांचे मानकरी ठरले.

‘कबीरां’चे गाढे अभ्यासक प्रा. मोतीराज राठोड हे संत कबीरांचे, त्यांचे दोहे आणि भजनांचे अत्यंत गाढे अभ्यासक होते. कबीरांवर त्यांनी विपुल लेखन केले आणि कबीरांवर ते तासन्तास बोलू शकत होते. ‘कबीरा खडा बाजार में, लिये लुकाटी हाथ, जो घर फुंके अपना चलो हमारे साथ’ हे ठासून सांगताना प्रा. राठोड कमालीचे खुलत. 

प्रा. राठोड यांची विपुल ग्रंथसंपदाप्रा. राठोड यांनी विपुल लेखन केले. बंजारा संस्कृती, कबीर-जोतिबा, कहत कबीर, तांडा संस्कृती, भटक्या-विमुक्तांचा जाहीरनामा, समाज और संस्कृती, भटक्या-विमुक्त जाती-जमाती, कबीरवाद, गोरमाटी, गोर बंजारा जनजाती का इतिहास, गोर बंजारा जागतो रेस, गोर बंजारा वंशाचा इतिहास, गुन्हेगार जमाती कायदा आणि परिणाम, पाल निवासी भटक्या जमाती, सिंधू संस्कृतीपूर्व गोर संस्कृती नांदत होती, लदेणी, बंजारा संस्कृती और ऋग्वेदकालीन संस्कृती तुलनात्मक अध्ययन, बंजारा लोकसाहित्य का संकलन और विश्लेषण, याडी उद्ध्वस्त तांडा कथा, मी आणि चळवळ, कायीं ठाली कायीं भरी बाते, प्राचीन बंजारा समाज व्यवस्था, नोटिफाईड ट्राईब्ज नोमॅडिक ट्राईब्ज ही पुस्तके त्यांनी लिहिली.

टॅग्स :Deathमृत्यूsocial workerसमाजसेवकAurangabadऔरंगाबाद