शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

पैशाचे पाणी ! मराठवाड्यात लागतात विहीर अधिग्रहणासाठी रोज २२ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 14:41 IST

बीडमध्ये सर्वाधिक विहिरी प्रशासनाच्या ताब्यात

ठळक मुद्दे ५ हजार ३२१ विहिरी विभागात अधिग्रहित ४०० रुपये रोज एका विहिरीसाठी अधिग्रहणासाठी

- विकास राऊत 

औरंगाबाद : मराठवाड्यात दिवसाकाठी सुमारे २२ लाख रुपये रोज विहीर अधिग्रहणासाठी मोजावे लागत आहेत. पाण्यासाठी पैसा मोजून दुष्काळावर मात केली जात आहे. गेल्या आठवड्याच्या अखेरीस ५ हजार ३२१ विहिरी विभागात अधिग्रहित करण्याचा आकडा होता. वेळेत मान्सूनचे आगमन झाले नाही, तर विहिरी अधिग्रहणाचा आकडा वाढण्याची शक्यता प्रशासकीय सूत्रांनी वर्तविली आहे. ४०० रुपये रोज एका विहिरीसाठी अधिग्रहणासाठी प्रशासकीय मान्यतेने देण्यात येतो. विहिरींचे अधिग्रहण कमी-अधिक प्रमाणात होते. 

मे महिन्याच्या सुरुवातीपासून आजवर साधारणत: ३ कोटींच्या आसपास रक्कम विहिरींच्या अधिग्रहणासाठी लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मे महिन्याच्या सुरुवातीस झालेल्या आॅडिओ ब्रीज (संवाद सेतू)मध्ये बहुतांश सरपंचांकडून विहीर अधिग्रहणाची रक्कम वाढवून देण्याची मागणी आली आहे. शासनाने या मागणीचा विचार केला, तर अधिग्रहणाचे दिवसाकाठी ४०० रुपयांचे दर वाढण्याची शक्यता आहे. ३ हजारांच्या पुढे टँकरचा आकडा गेला असून, विभागातील २५ टक्के लोकसंख्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. यावरून यंदाचा दुष्काळ किती भीषण आहे, याचा अंदाज येतो आहे. विभागातील २,३०० गावे आणि ८०० वाड्यांवर पाणीटंचाई आहे. ८ हजार ५५० पैकी २,३०० गावे म्हणजे २५ ते २७ टक्के ग्रामीण भाग दुष्काळाने होरपळल्याचे स्पष्ट आहे. 

बीडमध्ये सर्वाधिक विहिरी ताब्यात औरंगाबाद जिल्ह्यात ५३२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जालना ६६२, परभणी ३६०, हिंगोली ४४९, नांदेड ६७५, बीड ९५३, लातूर ८१८, उस्मानाबाद ८७२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक ९५३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. 

जिल्हा    विहिरींची संख्या    अधिग्रहण रोजचा खर्चऔरंगाबाद    ५३२    २ लाख १२ हजार ८००जालना    ६६२    २ लाख ६४ हजार ८००परभणी    ३६०    १ लाख ४४ हजार हिंगोली    ४४९    १ लाख ७९ हजार ६००नांदेड    ६७५    २ लाख ७० हजारबीड    ९५३    ३ लाख ८१ हजार २००लातूर    ८१८    ३ लाख २७ हजार २००उस्मानाबाद    ८७२    ३ लाख ४८ हजार ८००एकूण    ५३२१    २१ लाख २८ हजार ४०० 

टॅग्स :droughtदुष्काळfundsनिधीMarathwadaमराठवाडा