शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज 'बीआरएस'ची सभा; के.चंद्रशेखरराव यांच्या भाषणाकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 11:46 IST

सभेच्या पार्श्वभूमीवर शहरात पक्षध्वज व होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत.

छत्रपती संभाजीनगर : भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाने ‘अब की बार किसान सरकार’ हे घोषवाक्य घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात पाऊल ठेवले आहे. या पक्षाची सभा २४ एप्रिलला छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपासवरील जबिंदा मैदानावर होत आहे. सभेला तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी ५ वा. सभा होणार असून मुख्यमंत्र्यांचे ४ वाजेच्या सुमारास विमानतळावर आगमन होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

सभेच्या पार्श्वभूमीवर शहरात पक्षध्वज व होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. विमानतळ ते सभास्थळापर्यंत होर्डिंग्ज आहेत. गोल आकाराच्या होर्डिंग्जने शहरवासीयांचे लक्ष वेधले असून सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. छत्रपती संभाजीनगरची ही सभा रेकॉर्डब्रेक होणार असल्याची ग्वाही स्थानिक नेत्यांनी दिली आहे. बीआरएसचे छोटे मोठे अनेक नेते, निरीक्षक, खासदार, आमदार सभेच्या नियोजनासाठी मागील आठवडाभरात पासून शहरात तळ ठोकून आहेत.

पन्नास माजी नगरसेवकांचा प्रवेशके. चंद्रशेखर राव यांनी आगामी निवडणुका लक्षात घेऊन महाराष्ट्रात बीआरएस वाढवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. याची सुरुवात त्यांनी नांदेडपासून केली. नांदेडमध्ये स्थानिक नेत्यांना पक्षात प्रवेश दिल्यानंतर आता मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरवर लक्ष केंद्रित केले आहे. जिल्ह्यातील अनेक स्थानिक नेते, शेतकरी नेते तसेच छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे सुमारे पन्नास माजी नगरसेवक या सभेत प्रवेश घेणार असल्याचे बीआरएसचे महाराष्ट्र प्रभारी आ. जीवन रेड्डी यांनी सांगितले.

तेलंगणा मॉडेलच्या ४२५ योजना सांगणार आज होणाऱ्या बीआरएसच्या जाहीर सभेत बीआरएसचे सर्वेसर्वा व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे तेलंगणा मॉडेलच्या ४२५ योजनांची माहिती देणार आहेत. रोज सात-आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणाऱ्या महाराष्ट्राने हे मॉडेल स्वीकारावे, असा आग्रह बीआरएसचा आहे.   

बीएसआर सभेसाठी वाहतुकीमध्ये बदलतेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाची जाबिंदा मैदानावर सोमवारी सायंकाळी पाच वाजता सभा आयोजित केली आहे. या सभेला मोठ्या संख्येने नागरिक येण्याची शक्यता असल्यामुळे वाहतुकीमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती प्रभारी सहायक पोलिस आयुक्त दिलीप गांगुर्डे यांनी दिली. सोमवारी सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेदरम्यान शहानूरमियाँ दर्गा चौक ते गोदावरी टी पाॅईंट हा मार्ग रहदारीसाठी बंद करण्यात येणार आहे. त्याऐवजी नागरिकांनी इतर मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन शहर वाहतूक पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :K Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावAurangabadऔरंगाबाद