शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
2
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
3
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
4
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
5
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
6
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
7
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
8
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
9
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
10
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
11
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
12
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
13
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
14
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
15
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश
16
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
17
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
18
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
19
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
20
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"

पाण्याच्या मापात पाप

By admin | Updated: November 25, 2014 01:01 IST

औरंगाबाद : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने १५ मिनिटांनी पाणीपुरवठा कमी केला आहे

औरंगाबाद : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने १५ मिनिटांनी पाणीपुरवठा कमी केला आहे. हे पाण्याच्या मापात पाप असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनीच सुरू केला आहे.दोन दिवसांआड पाणीपुरवठा करायचा आणि त्यातही १५ मिनिटांची दांडी मारायची असा नित्यक्रम दोन महिन्यांपासून सुरू असल्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी धावपळ सुरू आहे. नवीन जलवाहिनीची बंद असलेली कामे आणि पाण्याचा तुटवडा यातून मार्ग काढण्यात पालिका प्रशासन आणि पदाधिकारीदेखील असमर्थ ठरत असल्याचे दिसते आहे. आगामी काळात नागरिकांचा उठाव होऊन मोठा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नवीन जलवाहिनीची कामे बंद आहेत. मुख्य जलवाहिनीचे काम अजून कंपनीने सुरू केलेले नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा पाणीपुरवठा सुरू होतो, तेव्हा कंपनीचा कुठलाही कर्मचारी पाणीपुरवठा होतो किंवा नाही याचा आढावा घेत नाही. पाण्याचा दाब, शेवटच्या घरापर्यंत पोहोचते की नाही, शिवाय, कंपनीने कुठलीही पाहणी न करताच यंत्रणा ताब्यात घेतल्याचा आरोप होत आहे. कंपनी मनपाची जावई आहे का?उपमहापौर संजय जोशी म्हणाले अभियंते बटीक झाले आहेत. कंपनी मनपाची जावई आहे, अशा थाटात अधिकारी कंपनीची खातरदारी करीत आहेत. कंपनीकडे काहीही डेटा व नियोजन नाही. शहराला योजनेतून काहीही फायदा मिळालेला नाही. योजनेतून शून्य आऊटपूट असून १ लिटरही जास्तीचा पाणीपुरवठा वाढलेला नाही. १दूषित पाणीपुरवठा अजूनही सुरू आहे. काही भागांमध्ये गढूळ पाणीपुरवठा होतो आहे. त्याचा शोध कंपनीने बंद केला आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले तर कोण जबाबदार, असा सवाल आहे. २१० नोव्हेंबरपासून दूषित व गढूळ पाण्याची ओरड सुरू आहे, तर दुसरीकडे ३ हजार ५० रुपयांची पाणीपट्टी बिलाच्या नोटीसचा भडिमार कंपनीने सुरू केला आहे.३ काही नागरिकांनी एप्रिलमध्ये पाणीपट्टी भरलेली आहे. असे असतानाही त्यांना पाणीपट्टीची बिले देण्यात आली आहेत. याचा अर्थ कंपनीकडे नळधारकांचा कुठलाही लेखाजोखा नसल्याचे स्पष्ट होत आहे. कंपनीने हे सर्व आरोप फेटाळले आहेत.४समांतर जलवाहिनीच्या कंत्राटासाठी केलेले करार समजून घेण्यासाठी होणारी विशेष सभा लांबणीवर पडणार आहे. महापौर कला ओझा यांच्या घरी मंगल कार्य आहे. त्यामुळे विशेष सभा १० डिसेंबरनंतरच होण्याची शक्यता आहे. ४तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या काळात योजनेचा करार झाला, तर तत्कालीन आयुक्त डॉ. कांबळे यांच्या काळात मनपाची पाणीपुरवठा हस्तांतरित करण्यात आली.