शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
2
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
3
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
4
हृदयद्रावक! खेळताना प्लास्टिकचा बॉल गिळला; दीड वर्षांच्या लेकीचा पालकांसमोर तडफडून मृत्यू
5
"माझा मुलगा मानव ठणठणीत आहे...", मुलाच्या आत्महत्येची खोटी बातमी पसरवणाऱ्यांवर संतापली रेशम टिपणीस
6
मुंबईतील तरुणीवर अलिबागमध्ये बलात्कार, पार्टीनंतर ऑफिसमधील सहकाऱ्यानेच केला घात; पीडितेसोबत काय घडलं?
7
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
8
पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी 'ही' SIP ठरेल गेम चेंजर!
9
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
10
SEBI ची मोठी कारवाई, शेअर बाजारात या कंपनीला बंदी; ₹४८४३ कोटींचा नफाही होणार जप्त
11
Viral Video: इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ पाहून अंगाचा थरकाप उडेल!
12
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
13
Sonam Raghuwanshi : "मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं
14
AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली
15
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता; मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देऊ शकतं मोठं गिफ्ट
16
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
17
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिरासमोर कारने ६ जणांना उडवलं, एकाचा मृत्यू
18
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
19
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
20
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल

पाण्याच्या मापात पाप

By admin | Updated: November 25, 2014 01:01 IST

औरंगाबाद : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने १५ मिनिटांनी पाणीपुरवठा कमी केला आहे

औरंगाबाद : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने १५ मिनिटांनी पाणीपुरवठा कमी केला आहे. हे पाण्याच्या मापात पाप असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनीच सुरू केला आहे.दोन दिवसांआड पाणीपुरवठा करायचा आणि त्यातही १५ मिनिटांची दांडी मारायची असा नित्यक्रम दोन महिन्यांपासून सुरू असल्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी धावपळ सुरू आहे. नवीन जलवाहिनीची बंद असलेली कामे आणि पाण्याचा तुटवडा यातून मार्ग काढण्यात पालिका प्रशासन आणि पदाधिकारीदेखील असमर्थ ठरत असल्याचे दिसते आहे. आगामी काळात नागरिकांचा उठाव होऊन मोठा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नवीन जलवाहिनीची कामे बंद आहेत. मुख्य जलवाहिनीचे काम अजून कंपनीने सुरू केलेले नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा पाणीपुरवठा सुरू होतो, तेव्हा कंपनीचा कुठलाही कर्मचारी पाणीपुरवठा होतो किंवा नाही याचा आढावा घेत नाही. पाण्याचा दाब, शेवटच्या घरापर्यंत पोहोचते की नाही, शिवाय, कंपनीने कुठलीही पाहणी न करताच यंत्रणा ताब्यात घेतल्याचा आरोप होत आहे. कंपनी मनपाची जावई आहे का?उपमहापौर संजय जोशी म्हणाले अभियंते बटीक झाले आहेत. कंपनी मनपाची जावई आहे, अशा थाटात अधिकारी कंपनीची खातरदारी करीत आहेत. कंपनीकडे काहीही डेटा व नियोजन नाही. शहराला योजनेतून काहीही फायदा मिळालेला नाही. योजनेतून शून्य आऊटपूट असून १ लिटरही जास्तीचा पाणीपुरवठा वाढलेला नाही. १दूषित पाणीपुरवठा अजूनही सुरू आहे. काही भागांमध्ये गढूळ पाणीपुरवठा होतो आहे. त्याचा शोध कंपनीने बंद केला आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले तर कोण जबाबदार, असा सवाल आहे. २१० नोव्हेंबरपासून दूषित व गढूळ पाण्याची ओरड सुरू आहे, तर दुसरीकडे ३ हजार ५० रुपयांची पाणीपट्टी बिलाच्या नोटीसचा भडिमार कंपनीने सुरू केला आहे.३ काही नागरिकांनी एप्रिलमध्ये पाणीपट्टी भरलेली आहे. असे असतानाही त्यांना पाणीपट्टीची बिले देण्यात आली आहेत. याचा अर्थ कंपनीकडे नळधारकांचा कुठलाही लेखाजोखा नसल्याचे स्पष्ट होत आहे. कंपनीने हे सर्व आरोप फेटाळले आहेत.४समांतर जलवाहिनीच्या कंत्राटासाठी केलेले करार समजून घेण्यासाठी होणारी विशेष सभा लांबणीवर पडणार आहे. महापौर कला ओझा यांच्या घरी मंगल कार्य आहे. त्यामुळे विशेष सभा १० डिसेंबरनंतरच होण्याची शक्यता आहे. ४तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या काळात योजनेचा करार झाला, तर तत्कालीन आयुक्त डॉ. कांबळे यांच्या काळात मनपाची पाणीपुरवठा हस्तांतरित करण्यात आली.