शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याला विविध क्षेत्रांत नेतृत्व हवे

By admin | Updated: June 21, 2014 01:00 IST

औरंगाबाद : मराठवाड्याला आता विकासासाठी केवळ राजकीय नेतृत्वावरच अवलंबून राहून चालणार नाही, तर आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक नेतृत्वाचीही तेवढीच गरज असल्याचे

औरंगाबाद : मराठवाड्याला आता विकासासाठी केवळ राजकीय नेतृत्वावरच अवलंबून राहून चालणार नाही, तर आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक नेतृत्वाचीही तेवढीच गरज असल्याचे प्रतिपादन आज येथे पुणे विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक श्रुती तांबे यांनी केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेच्या वतीने मराठवाड्याचे अर्थशास्त्रज्ञ डॉ. आर.पी. कुरूलकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त ‘मराठवाड्याचा विकास : कर्ते, आंदोलन आणि संभाषिते’ या विषयावर आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी उद्योगपती राम भोगले हे होते. प्रारंभी, डॉ. कुरूलकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सहस्र विकास ध्येयाची पूर्तता २०१५ आता उंबरठ्यावर आली असताना कशी काय करणार, असा सवाल प्रा. तांबे यांनी यावेळी उपस्थित केला. विकासाच्या अनुषंगाने त्यांनी पब्लिक ट्रान्सपोर्ट, स्लम फ्री सिटी, स्त्रियांचे आरोग्य, सामाजिक वर्जिता, पर्यावरण या मुद्यांचे सविस्तर विश्लेषण केले. त्या म्हणाल्या, विकासाची जाण सामान्य माणसांमध्ये निर्माण करण्यात आपण कुठेतरी कमी पडलो आहोत. विकास हा समतापूर्ण आणि शाश्वत असला पाहिजे. केवळ शिक्षण आणि अर्थकारण यावरच आपण आतापर्यंत भर देत आलो. विकास हा चिरंजीवी असावा. छोटे छोटे प्रकल्प मोठ्या प्रमाणावर सुरू व्हायला हवेत. नवउदारमतवादाच्या वारूत पर्यावरण हा अडथळा बनला असून हे कोडे सोडवले गेले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. स्त्रियांच्या आरोग्याचा प्रश्न हाताळताना प्रा.तांबे यांनी बीड जिल्ह्यातील स्त्रीभ्रूणहत्यांचे वाढते प्रकार, तेथील स्त्रियांचे लैंगिक शोषण, बलात्कार याकडे आकडेवारीनिशी उपस्थितांचे लक्ष वेधले. यापेक्षाही भयानक गोष्ट म्हणजे कल्चरल व्हायोलन्स होय. तुम्हाला मोकळेपणाने तुमचा चॉईस नसेल तर मग विकासाच्या बाता मारून काय उपयोग, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.अध्यक्षीय समारोपात राम भोेगले यांनी विकासाच्या नावाखाली पाश्चात्त्यांचे अंधानुकरण चालू असल्याचा आरोप केला. आपल्या देशाला जे उपयुक्त आहे, जे योग्य आहे, त्या दिशेने विकसित होत जाण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. बालकामगार नकोतच या भूमिकेचाही त्यांनी समाचार घेतला. बाल कामगार कुठे नको, कुठे चालतील, हे ठरवण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले. आपण उद्योगांच्या विकेंद्रीकरणाचा विचारच स्वीकारला नाही. उलट उद्योगांचे एकाच ठिकाणी केंद्रीकरण सुरू आहे. इंग्लंडसारख्या देशात पर्यावरण संतुलन साधत खेड्यागणिक छोटे- छोटे उद्योग निर्माण केले गेले आहेत, याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. फेसलेस पॉप्युलेशनमुळे गुन्हेगारी वाढतच जाणार असल्याचे मत राम भोगले यांनी नोंदवले. समाजाला काही परत द्यावे, ही उद्योजकांकडून करण्यात येणारी अपेक्षा पूर्ण होत नाही, असेही ते म्हणाले. आंदोलन त्सुनामीसारखे असावे. क्षणार्धात सारे बदलून टाकणारे असावे, असे मत भोगले यांनी यावेळी व्यक्त केले. संस्थेचे सचिव प्रा. सुरेश कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर संचालक डॉ. शरद अदवंत यांनी आभार मानले. भुजंगराव कुुलकर्णी, ना.वि. देशपांडे, श्रीराम वरूडकर, दिनकर बोरीकर, तारा लड्डा, अ‍ॅड. प्रदीप देशमुख आदींची यावेळी उपस्थिती होती.