शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

सिंचनात अधोगतीकडे वाटचाल; बिनशर्त सहभागी झालो तरी मराठवाड्याच्या नशिबी संघर्षच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 14:17 IST

Marathawada Muktisangram Din : नागपूर करारातील मुद्दा क्रमांक ४नुसार मराठवाड्याच्या विकासासाठी विशेष लक्ष देणे गरजेचे होते.

- शं. आ. नागरे, तज्ज्ञ सदस्य, मराठवाडा विकास मंडळ, औरंगाबाद विभाग

मराठवाड्याला १७ सप्टेंबर १९४८ रोजी स्वातंत्र्य मिळाले. नंतर संयुक्त महाराष्ट्रात मराठवाडा बिनशर्त सामील झाला. नागपूर करारातील मुद्दा क्रमांक ४नुसार मराठवाड्याच्या विकासासाठी विशेष लक्ष देणे गरजेचे होते. मात्र, ७३ वर्षांत याकडे दुर्लक्ष झाले असून, विशेषत: मराठवाड्याची सिंचनाच्या दृष्टीने अधोगतीकडे वाटचाल सुरू आहे. १९६० साली मराठवाड्यात फक्त ०.१२ लक्ष हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली होते. या प्रदेशाच्या सिंचन विकासासाठी स. गो. बर्वे आयागोची स्थापना झाली. त्यानंतर सिंचन कामांना वेग मिळाला. मात्र, १९७३ नंतर राज्यात नागपूर करार डावलून जिल्हानिहाय नियोजन प्रक्रिया सुरू झाली. याचा परिणाम मराठवाड्यावर अधिक झाला. विदर्भ आणि मराठवाड्यावरील परिणामांची कारणीमिमांसा करण्यासाठी वि. म. दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती स्थापन झाली. मात्र, समितीचा अहवाल शासनाने विचारात घेतला नाही.

१९६०ला मराठवाड्यात ०.१२ लक्ष हेक्टर, १९८२ साली ५.७ लक्ष हेक्टर, २०१० साली १०.५ लक्ष हेक्टर, तर २०१९ साली ११.६४ लक्ष हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले. एकूण राज्याच्या प्रमाणात हे प्रमाण २० टक्के आहे. विदर्भ २२ टक्के व उर्वरित महाराष्ट्र २९ टक्क्यांवर असल्यामुळे मराठवाडा सिंचन तरतुदीत मागे असल्याचे स्पष्ट होत आहे. २०३०पर्यंत राज्यातील सिंचन विकासाच्या नियोजनात मराठवाड्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. मराठवाड्यात १६ हजार ३८५ कोटींची ५५ कामे सुरू आहेत. विदर्भात ४३ हजार ५६१ कोटींची १२३ कामे, तर उर्वरित महाराष्ट्रात ४९ हजार ४४४ कोटींची १३५ कामे सुरू आहेत. एकूण १० हजार कोटींतील ३१३ कामांत 

मराठवाडा ५० टक्क्यांनी मागे आहे.येत्या १० वर्षांत राज्य सिंचन विकासात सरासरी ३०.६० टक्क्यांवर जाईल. यात उर्वरित महाराष्ट्र ३५.१० टक्के, विदर्भ ३१.६० टक्क्यांवर असेल. परंतु मराठवाडा फक्त २१.८० टक्क्यांवर असेल. मराठवाड्याचा सध्याचा ४.६० टक्के अनुशेष ८.८० टक्क्यांवर जाईल. मराठवाड्यात १० वर्षांत फक्त २६ कामे पूर्ण होतील. शासनाने १० वर्षांसाठी ३९ हजार कोटींच्या पॅकेजमधून सिंचन विकासाचे धोरण आखले आहे. यात मराठवाड्यावर फक्त ९ टक्के रक्कम खर्च होईल. विदर्भात ५७, तर उर्वरित महाराष्ट्रात ३४ टक्के रक्कम खर्च होणार आहे.

...तर अनुशेषासाठी लढण्याचा हक्कदेखील जाईलमराठवाडा, विदर्भ विकासासाठी १९९४ साली राज्यात तीन वैधानिक विकास महामंडळांची स्थापना करण्याचा निर्णय झाला. सिंचन विभागाच्या अनुशेषावर महामंडळाने लक्ष वेधले. उर्वरित महाराष्ट्र, विदर्भाला सिंचनाच्या बाबतीत झुकते माप दिले गेले. महामंडळाचे यश व अपयश या बाबींकडे न जाता मराठवाड्याला सिंचनाच्या बाबतीत सक्षम करणे आगामी काळात गरजेचे असावे. पाणी आणि अनुशेषाचा प्रश्न विभागनिहाय मांडण्यासाठी नागपूर करार आणि राज्य घटनेतील तरतुदीनुसार शासन वैधानिक विकास महामंडळात मोडीत काढत असेल तर प्रादेशिक अनुशेषासाठी लढण्याचा हक्क तरी मराठवाड्याला पुढील काळात शिल्लक राहणार आहे काय, असा प्रश्न आहे. मराठवाड्यातील जनता आणि शेतकऱ्यांसाठी लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन शेती वाचविण्याची आणि सिंचन वाढविण्याची गरज आहे. ( शब्दांकन - विकास राऊत )

हेही वाचा - - झोळी रितीच ! मराठवाड्याचा कालबद्ध कार्यक्रम अंमलबजावणी अभावी कागदावरच- निजामाच्या पोलीस ठाण्यावर फडकावला तिरंगा; सशस्त्र लढाईत रजाकारांना कोलते पिंपळगावकरांनी आणले होते जेरीस 

टॅग्स :MarathwadaमराठवाडाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार