शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

उद्योगांसाठी सांडपाण्याच्या वापरात महाराष्ट्र मागेच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 08:25 IST

४० टक्के वापरासाठी कसरत

औरंगाबाद : राज्यात उद्योगांसाठी सरसकट धरणाचेच पाणी वापरले जाते. एसटीपीचे (मलजल प्रक्रिया प्रकल्प) पाणी वापरणाऱ्या उद्योगांची संख्या अगदीच कमी आहे. त्यामुळे उद्योगांना ‘एसटीपी’च्या ४० टक्के पाण्याची सक्ती करताना राज्याला मोठी कसरत करावी लागणार आहे.

एसटीपीचे पाणी औद्योगिक वापरासाठी घ्यावे, असा निर्णय एमआयडीसीच्या संचालक मंडळाने घेतला आहे. त्यामुळे उद्योगांना लागणाऱ्या पाण्यापैकी ४० टक्के पाणी ‘एसटीपी’चेच वापरले पाहिजे, अशी सक्ती केली जाणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी अलीकडेच औरंगाबादेत दिली. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’च्या पर्यावरण डेस्कने राज्यातील १२ शहरांतील उद्योगांना सद्य:स्थितीत दिल्या जाणाºया पाण्याचा आढावा घेतला.

कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास ३३00, तर सातारा औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे ९00 उद्योग आहेत. जळगावमध्ये जवळपास २२00 उद्योग आहेत. तिन्ही ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पच अस्तित्वात नाही. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये एकूण ६६00 उद्योग आहेत. त्यांना ४३२२ एमएलडी पाणी दिले जाते. शहरात ७४४ दशलक्ष लिटर मैलापाणी प्रतिदिन निर्माण होते. ते प्रक्रिया केले जात असले तरी उद्योगाला दिले जात नाही.

अहमदनगरमध्ये साधारण दोन हजार, अकोला औद्योगिक वसाहतीमध्ये जवळपास १0३0, तर नागपूरमध्ये अडीच हजार उद्योगांना थेट पाणी दिले जाते. औरंगाबादेत लहान-मोठे साडेचार हजार उद्योग असून, येथे प्रक्रिया केलेले सांडपाणी थेट नाल्यात सोडून दिले जाते. ठाण्यात स्थिती वेगळीच आहे. येथील एमआयडीसीचा दररोजचा कोटा १0 एमएलडी असताना जेमतेम ५ एमएलडी पाणी मिळते. त्यामुळे प्रक्रिया केलेले पाणी मिळणे तर दूरच.

ना मुंबई, ना नाशिक!

मुंबईमधील कोणतेच उद्योग मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रातून आलेले पाणी वापरत नाहीत. नाशिकलाही हीच स्थिती आहे. मलनिस्सारण केंद्रातून बाहेर आलेले पाणी इथे थेट गोदावरीच्या पात्रात सोडले जाते. नाशिक महापालिका क्षेत्रात लहान-मोठे साडेतीन हजार कारखाने सुरू आहेत. तसेच सिन्नर औद्योगिक वसाहतीतील सुमारे अडीच हजार कारखाने आहेत. या उद्योगांना गंगापूर धरण आणि दारणा नदीतून थेट पाणी दिले जाते.

सोलापूर काहीसे बरे

सोलापूरची परिस्थिती काहीसी बरी आहे. शहर आणि परिसरात १,१५0 उद्योग आहेत. यासाठी १२ एमएलडी पाण्याची गरज आहे. यातील ३.४ एमएलडी पाणी प्रक्रिया केंद्रातून दिले जाते.

 

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबादMaharashtraमहाराष्ट्रenvironmentपर्यावरण