शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

उद्योगांसाठी सांडपाण्याच्या वापरात महाराष्ट्र मागेच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 08:25 IST

४० टक्के वापरासाठी कसरत

औरंगाबाद : राज्यात उद्योगांसाठी सरसकट धरणाचेच पाणी वापरले जाते. एसटीपीचे (मलजल प्रक्रिया प्रकल्प) पाणी वापरणाऱ्या उद्योगांची संख्या अगदीच कमी आहे. त्यामुळे उद्योगांना ‘एसटीपी’च्या ४० टक्के पाण्याची सक्ती करताना राज्याला मोठी कसरत करावी लागणार आहे.

एसटीपीचे पाणी औद्योगिक वापरासाठी घ्यावे, असा निर्णय एमआयडीसीच्या संचालक मंडळाने घेतला आहे. त्यामुळे उद्योगांना लागणाऱ्या पाण्यापैकी ४० टक्के पाणी ‘एसटीपी’चेच वापरले पाहिजे, अशी सक्ती केली जाणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी अलीकडेच औरंगाबादेत दिली. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’च्या पर्यावरण डेस्कने राज्यातील १२ शहरांतील उद्योगांना सद्य:स्थितीत दिल्या जाणाºया पाण्याचा आढावा घेतला.

कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास ३३00, तर सातारा औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे ९00 उद्योग आहेत. जळगावमध्ये जवळपास २२00 उद्योग आहेत. तिन्ही ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पच अस्तित्वात नाही. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये एकूण ६६00 उद्योग आहेत. त्यांना ४३२२ एमएलडी पाणी दिले जाते. शहरात ७४४ दशलक्ष लिटर मैलापाणी प्रतिदिन निर्माण होते. ते प्रक्रिया केले जात असले तरी उद्योगाला दिले जात नाही.

अहमदनगरमध्ये साधारण दोन हजार, अकोला औद्योगिक वसाहतीमध्ये जवळपास १0३0, तर नागपूरमध्ये अडीच हजार उद्योगांना थेट पाणी दिले जाते. औरंगाबादेत लहान-मोठे साडेचार हजार उद्योग असून, येथे प्रक्रिया केलेले सांडपाणी थेट नाल्यात सोडून दिले जाते. ठाण्यात स्थिती वेगळीच आहे. येथील एमआयडीसीचा दररोजचा कोटा १0 एमएलडी असताना जेमतेम ५ एमएलडी पाणी मिळते. त्यामुळे प्रक्रिया केलेले पाणी मिळणे तर दूरच.

ना मुंबई, ना नाशिक!

मुंबईमधील कोणतेच उद्योग मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रातून आलेले पाणी वापरत नाहीत. नाशिकलाही हीच स्थिती आहे. मलनिस्सारण केंद्रातून बाहेर आलेले पाणी इथे थेट गोदावरीच्या पात्रात सोडले जाते. नाशिक महापालिका क्षेत्रात लहान-मोठे साडेतीन हजार कारखाने सुरू आहेत. तसेच सिन्नर औद्योगिक वसाहतीतील सुमारे अडीच हजार कारखाने आहेत. या उद्योगांना गंगापूर धरण आणि दारणा नदीतून थेट पाणी दिले जाते.

सोलापूर काहीसे बरे

सोलापूरची परिस्थिती काहीसी बरी आहे. शहर आणि परिसरात १,१५0 उद्योग आहेत. यासाठी १२ एमएलडी पाण्याची गरज आहे. यातील ३.४ एमएलडी पाणी प्रक्रिया केंद्रातून दिले जाते.

 

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबादMaharashtraमहाराष्ट्रenvironmentपर्यावरण