शहरं
Join us  
Trending Stories
1
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
2
Nagpur: आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान मिळाला एबी फॉर्म; काळजावर दगड ठेवून गाठलं निवडणूक कार्यालय!
3
Nagpur: शिंदेसेनेला आठ जागा, पण सहा उमेदवार भाजपचेच; अखेरच्या दिवशी संपविला सस्पेन्स
4
वर्षाचा शेवटही एकदम झक्कास! भारतीय महिला संघाने ५-० अशा मालिका विजयासह श्रीलंकेचा उडवला धुव्वा
5
Nagpur: भाजपला बालेकिल्ल्यातच खिंडार! नागपूरमध्ये एकसोबत ४२ कार्यकर्त्यांचा राजीनामा
6
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
7
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
8
दीप्ती शर्मानं रचला इतिहास! आता आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यातही 'नंबर वन'
9
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
10
Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
11
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
12
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
13
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
14
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
15
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
16
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
17
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
18
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
19
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
20
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगांसाठी सांडपाण्याच्या वापरात महाराष्ट्र मागेच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 08:25 IST

४० टक्के वापरासाठी कसरत

औरंगाबाद : राज्यात उद्योगांसाठी सरसकट धरणाचेच पाणी वापरले जाते. एसटीपीचे (मलजल प्रक्रिया प्रकल्प) पाणी वापरणाऱ्या उद्योगांची संख्या अगदीच कमी आहे. त्यामुळे उद्योगांना ‘एसटीपी’च्या ४० टक्के पाण्याची सक्ती करताना राज्याला मोठी कसरत करावी लागणार आहे.

एसटीपीचे पाणी औद्योगिक वापरासाठी घ्यावे, असा निर्णय एमआयडीसीच्या संचालक मंडळाने घेतला आहे. त्यामुळे उद्योगांना लागणाऱ्या पाण्यापैकी ४० टक्के पाणी ‘एसटीपी’चेच वापरले पाहिजे, अशी सक्ती केली जाणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी अलीकडेच औरंगाबादेत दिली. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’च्या पर्यावरण डेस्कने राज्यातील १२ शहरांतील उद्योगांना सद्य:स्थितीत दिल्या जाणाºया पाण्याचा आढावा घेतला.

कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास ३३00, तर सातारा औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे ९00 उद्योग आहेत. जळगावमध्ये जवळपास २२00 उद्योग आहेत. तिन्ही ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पच अस्तित्वात नाही. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये एकूण ६६00 उद्योग आहेत. त्यांना ४३२२ एमएलडी पाणी दिले जाते. शहरात ७४४ दशलक्ष लिटर मैलापाणी प्रतिदिन निर्माण होते. ते प्रक्रिया केले जात असले तरी उद्योगाला दिले जात नाही.

अहमदनगरमध्ये साधारण दोन हजार, अकोला औद्योगिक वसाहतीमध्ये जवळपास १0३0, तर नागपूरमध्ये अडीच हजार उद्योगांना थेट पाणी दिले जाते. औरंगाबादेत लहान-मोठे साडेचार हजार उद्योग असून, येथे प्रक्रिया केलेले सांडपाणी थेट नाल्यात सोडून दिले जाते. ठाण्यात स्थिती वेगळीच आहे. येथील एमआयडीसीचा दररोजचा कोटा १0 एमएलडी असताना जेमतेम ५ एमएलडी पाणी मिळते. त्यामुळे प्रक्रिया केलेले पाणी मिळणे तर दूरच.

ना मुंबई, ना नाशिक!

मुंबईमधील कोणतेच उद्योग मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रातून आलेले पाणी वापरत नाहीत. नाशिकलाही हीच स्थिती आहे. मलनिस्सारण केंद्रातून बाहेर आलेले पाणी इथे थेट गोदावरीच्या पात्रात सोडले जाते. नाशिक महापालिका क्षेत्रात लहान-मोठे साडेतीन हजार कारखाने सुरू आहेत. तसेच सिन्नर औद्योगिक वसाहतीतील सुमारे अडीच हजार कारखाने आहेत. या उद्योगांना गंगापूर धरण आणि दारणा नदीतून थेट पाणी दिले जाते.

सोलापूर काहीसे बरे

सोलापूरची परिस्थिती काहीसी बरी आहे. शहर आणि परिसरात १,१५0 उद्योग आहेत. यासाठी १२ एमएलडी पाण्याची गरज आहे. यातील ३.४ एमएलडी पाणी प्रक्रिया केंद्रातून दिले जाते.

 

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबादMaharashtraमहाराष्ट्रenvironmentपर्यावरण