शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
2
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
3
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
4
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
5
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
6
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
7
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
8
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
9
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
10
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
11
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
12
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
13
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
14
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?
15
कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?
16
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
17
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
18
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
19
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
20
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर

Maharashtra Bandh : आंदोलकांकडून वाळूज एमआयडीसीत सुमारे 60 कंपन्यांची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 06:35 IST

वाळूज एमआयडीसीतील 60 कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे, तर आणखी काही 10 ते 12 लहान कंपन्यांचेही नुकसान झाल्याची माहिती औरंगाबादमधील उद्योजक संघटनेने दिली.

औरंगाबाद : महाराष्ट्र बंदमध्ये वाळूज औद्योगिकनगरीत मराठा आंदोलनाचा हिंसक उद्रेक झाला. संतप्त जमावाने ६० मोठ्या कंपन्या आणि १५ हून अधिक लहान कंपन्यांमध्ये घुसून तोडफोड केली. पोलीस, अग्निशामक, रुग्णवाहिका, दुचाकी, ट्रकसह १२ वाहने पेटवली. दगडफेकीत अनेक वाहने फोडली. पोलीस आयुक्तांच्या ताफ्यावरही जमावाने दगडफेक केली.सकाळी शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला दुपारी ११ वाजेनंतर हिंसक वळण लागले. दुचाकींवरून आलेल्या दीडशे ते दोनशे तरुणाच्या जमावाने काचेच्या बाटल्याचे उत्पादन करणाऱ्या कॅनपॅक कंपनीत बळजबरीने घुसून सुरक्षारक्षकांना मारहाण केली. सुरक्षा केबिनवर लोखंडी रॉड, लाठ्या-काठ्याने तोडफोड केली.सुरक्षारक्षकांच्या केबिनमधील सीटीटीव्ही, संगणकाची तोडफोड करून जमावाने पार्किंगमध्ये उभ्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर प्रचंड दगडफेक केली. जमावाने कंपनीवर प्रचंड दगडफेक करून आवारातील साहित्याची नासधूस करून पोलिसांची जीप पेटवून दिली. त्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा येताच जमाव तेथून पांगला. जमावाने कॅनपॅक कंपनीत तोडफोड केल्यानंतर लगतच्या वोक्हार्ट कंपनीचे प्रवेशद्वार व कँटीनवर प्रचंड दगडफेक केली. कामगारांची ने-आण करणा-या बसची तोडफोड करीत जमावाने ही बस पेटवून देण्याचा प्रयत्न केला. या जमावाने गुडईअर, मायलान, स्टरलाईट, आकार टुल्स, मेटलमॅन, व्हेरॉक, एण्डुरन्स, सीमेन्स, गणेश प्रेसिंग, आकांक्षा पॅकेजिंग, नहार इंजिनिअरिंग आदी बड्या कंपन्यांसह इतर छोट्या ६० हून अधिक कंपन्यांवर प्रचंड प्रमाणात दगडफेक केली. आकार टुल्स कंपनीत उत्पादित विविध प्रकारचे पान्हे व साहित्य जमावाने रस्त्यावर फेकले होते.वाळूज औद्योगिकनगरीत कंपन्यांवर दगडफेक केली जात असल्याची माहिती मिळताच पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद घटनास्थळी दाखल होते. आयुक्तांच्या समोरच संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक करून एक ट्रक जाळला. वाळूज अग्निशामक दलाचे पथक ट्रकला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, जमावाने अग्निशामक दलाच्या पथकावर जोरदार दगडफेक सुरू केली. पोलीस आयुक्त प्रसाद यांनी जमावाला शांत करून जात असताना जमावाने पोलीस आयुक्तांच्या ताफ्यावरच दगडफेक केली. बजाज आॅटो कंपनीत जनरल शिफ्टमध्ये येणाºया कामगारांना बंदमुळे कंपनीने फर्स्टशिपमध्ये कामासाठी बोलावले होते. याची माहिती मिळताच आंदोलकांनी बजाज कंपनीकडे मोर्चा वळविला. कामगारांच्या बस अडवून कामगारांना त्यांनी खाली उतरू दिले नाही.या घटनेमुळे कंपनी व्यवस्थापनाने सेकंड व थर्ड शिफ्ट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.>प्रचंड नुकसानव्हेरॉक, इण्डुरन्स, स्टरलाईटसह जवळपास ६० उद्योगांवर जमावाने हल्ले, दगडफेक केल्याच्या घटना घडल्या आहेत. कंपन्यांच्या कार्यालयांची, संगणकांची, वाहनांची तोडफोड, जाळपोळ करण्यात आली. एका उद्योगाचे जवळपास ८० लाखांचे नुकसान झाले. ९० टक्के कंपन्या बंद होत्या. तरीही बंद कंपन्यांना लक्ष्य करण्यात आले. यामध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांना सहकार्य केले जाईल.-राम भोगले, अध्यक्ष, सीएमआयए>कंपन्यांवर हल्ले करण्याचा प्रकार दुर्दैवी आहे. रोजगार निर्मितासाठी उद्योगांचा हातभार आहे. शहरात गुंतवणूक वाढविण्यासाठी उद्योगजक प्रयत्न करीत होते. यापुढे स्वत:च्या उद्योगात गुंतवणूक वाढविण्यात येणार नाही आणि नव्या गुंतवणुकीसाठीही प्रयत्न केला जाणार नाही. उद्योगांना सुरक्षा मिळणार नसेल तर उद्योग हलविण्याचा निर्णय घेतला जाईल.- प्रसाद कोकीळ, माजी अध्यक्ष, सीएमआयए

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंदmarathaमराठाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा