शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
3
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
4
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
5
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
6
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
7
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
8
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
9
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
10
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
11
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
12
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
13
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
14
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
15
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
16
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
17
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
18
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
19
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्तच्या ‘थर्ड पार्टी इन्स्पेक्शन’ला खो

By admin | Updated: June 13, 2016 00:48 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील जलयुक्त शिवार अभियानातील कामांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी ‘थर्ड पार्टी इन्स्पेक्शन’ करण्याचे शासनाचे आदेश

औरंगाबाद : मराठवाड्यातील जलयुक्त शिवार अभियानातील कामांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी ‘थर्ड पार्टी इन्स्पेक्शन’ करण्याचे शासनाचे आदेश असताना त्याला विभागीय पातळीवर ‘खो’ देण्यात आला आहे. औरंगाबाद आणि लातूर वगळता उर्वरित सहा जिल्ह्यांमध्ये कामांची तपासणी त्रयस्थांमार्फत झालीच नसल्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात या योजनेतील कामांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्य शासन योजनेचा गवगवा करून दुष्काळावर मात केल्याचा दावा करीत असताना विभागात कामे अर्धवट व साशंकपणे झाली असतील तर यातून काय निष्पन्न होणार, असा प्रश्न आहे. जलयुक्त शिवार योजनेत सिमेंट नाला बंधारा, नदी-नाला सरळीकरण, खोलीकरण, रुंदीकरण, विहीर पुनर्भरण, जुन्या जलस्रोतांचे बळकटीकरण, पाझर तलाव, लघुसिंचन तलाव, साठवण बंधाऱ्यांची दुरुस्ती, कालवा दुरुस्ती आदी कामे कृषी, लघु पाटबंधारे, सामाजिक वनीकरण, जि. प. तर्फे केली जात आहेत. या कामांची गुणवत्ता चांगली असावी यासाठी जलसंधारण विभागाने ५ डिसेंबर २०१४ व १३ मार्च २०१५ रोजी आदेश जारी केले आहेत. त्या आदेशानुसार योजनेतील कामे मार्चपूर्वी त्रयस्थ संस्थेकडून तपासून मूल्यमापन करणे गरजेचे आहे. असे असताना मराठवाड्यातील लातूर व औरंगाबाद वगळता इतर कोणत्या जिल्ह्यांत कामांचे मूल्यमापन झाले नाही. जालना, उस्मानाबाद, हिंगोली या जिल्ह्यांत त्रयस्थ संस्था नेमण्यात आल्या, पण कामांचे मूल्यमापनच झाले नाही. बीड, नांदेड, परभणी या जिल्ह्यांत तर त्रयस्थ संस्थांची नेमणूकच केली गेली नाही. मराठवाड्यात जलयुक्त शिवार योजनेतील १६८२ पैकी अंदाजे ३५० गावांत कामे पूर्ण झाल्याचे दिसते. १३३२ गावांत आता कामे होतील, अशी शक्यता नाही. ४गेल्या वर्षी जलयुक्त शिवारसाठी १६८२ गावे निवडण्यात आली होती. मात्र, निधीअभावी त्या कामांना अपेक्षित गती मिळालीच नाही. विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी जिल्हास्तरावर याबाबत बैठकादेखील घेतल्या. मार्चपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. जलयुक्त शिवाराची कामे केवळ प्रगतिपथावरच असल्याचे आजवर पाहायला मिळाले आहे.