शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

एकाच महिन्यात १० लाखांचे नुकसान

By admin | Updated: July 3, 2014 00:15 IST

विजय चोरडिया , जिंतूर आगारात दोन महिन्यांपासून व्यवस्थापनाच्या मनमानीमुळे एकाच महिन्यात दहा लाखांचे नुकसान झाले असून, तब्बल १२ गाड्या, २५ वाहक-चालक आगारामध्ये बसून आहेत़

विजय चोरडिया , जिंतूरआगारात दोन महिन्यांपासून व्यवस्थापनाच्या मनमानीमुळे एकाच महिन्यात दहा लाखांचे नुकसान झाले असून, तब्बल १२ गाड्या, २५ वाहक-चालक आगारामध्ये बसून आहेत़ व्यवस्थापनाने फारसे लक्ष न दिल्याने जिंतूरचे आगार आता डबघाईला आले आहे़ राज्य पातळीवर पाच वर्षापूर्वी जिंतूर आगार प्रथम आले होते़ त्यावेळीही रस्त्यांची अवस्था फारशी चांगली नव्हती़ परंतु, आहे त्या परिस्थितीत उत्पन्नाचा विचार करून फेऱ्यांची संख्या व वेळापत्रक पाळले जात होते़ पाच वर्षाच्या कालावधीत ग्रामीण भागातील बहुतांश रस्ते दुरुस्त करण्यात आले़ किंबहुना पहिल्यापेक्षा रस्त्यांची अवस्था, गाड्यांची अवस्था चांगली असतानाही उत्पन्नात मात्र जिंतूर आगार राज्यस्तरावर खालच्या पातळीवर पोहचला आहे़ या सर्व प्रकाराला आगारातील व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांत समन्वयाचा अभाव, गाड्यांची नादुरुस्ती, गाड्यांना उपलब्ध नसलेले सुटे भाग व जिल्हास्तरावरील व्यवस्थापनाची दुजाभावाची वागणूक यामुळे जिंतूर आगार आता डबघाईला आले आहे़ जिंतूर आगारात सध्या ५८ गाड्या उपलब्ध आहेत़ यापैकी पाच गाड्या मानव विकासच्या असून ५३ पैकी १२ गाड्या नादुरुस्त आहेत़ त्यामुळे १२ चालक व १२ वाहक ड्युटी नसल्याने आगारामध्ये बसून आहेत़ जून महिन्यामध्ये तब्बल ३६ हजार ३२७ किमी विविध कारणांनी कमी झाले़ म्हणजेच आगाराचे ९ लाख ८१ हजार ९१८ रुपयांचे नुकसान झाले़ मागील वर्षी पंढरपूर यात्रेनिमित्त ४३ गाड्या सोडण्यात आल्या़ ८६ फेऱ्या करून २९ हजार ३४ किमी प्रवासातून ७३ हजार २५२ रुपयांचे उत्पन्न आगाराला प्राप्त झाले़ यावर्षी आगारात गाड्याच उपलब्ध नाहीत़ त्यामुळे आता यात्रेनिमित्त आगार काय करेल हे सांगता येत नाही़ ४ ते १३ जुलै दरम्यान जिंतूर आगारातून पंढरपूरसाठी विशेष गाड्या सोडाव्या लागणार आहेत़ विशेष म्हणजे लोकमत प्रतिनिधीने जिंतूर आगाराला भेट दिल्यानंतर आगार प्रमुख, स्थानक प्रमुख, स्थानक नियंत्रक कोणीही हजर नव्हते़ सर्व कारभार अलबेल अवस्थेत होता़ त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना मात्र याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला़ ग्रामीण भागातील फेऱ्या होणार बंदआषाढी यात्रेला गाड्या पाठविण्यासाठी जिंतूर आगारात पुरेशी व्यवस्था नाही़ त्यामुळे ग्रामीण भागातील किमान ८६ फेऱ्या बंद कराव्या लागणार आहेत़ त्यामुळे या भागातील प्रवाशांना किमान १० दिवस एसटी शिवाय प्रवास करावा लागेल़जिंतूर आगारातील एमएच १४ बीटी १९५०, एमएच २० डी-९६३६, एमएच २० डी-९८४५, एमएच २० सीएल-०६११, एमएच १४ बीटी ००१८, एमएच २०डी-९८४४, एमएच २० डी- ९६१४, एमएच २० बीएल-२४६, एमएच ०६- ८६४३, एमएच २० बीएल- ६११, एमएच १४ बीटी-००९९ या गाड्या दुरुस्ती अभावी जिंतूर आगारात पडून आहेत़