शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

वकिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर

By admin | Updated: August 20, 2015 00:16 IST

बीड : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या वकील संघाच्या निवडणुकीत अ‍ॅड. अजय तांदळे यांनी आपले अस्तित्व सिद्ध करत ते अध्यक्षपदी विराजमान झाले

बीड : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या वकील संघाच्या निवडणुकीत अ‍ॅड. अजय तांदळे यांनी आपले अस्तित्व सिद्ध करत ते अध्यक्षपदी विराजमान झाले. वकिल संघाचे अध्यक्ष होणे एवढेच आपले स्वप्न नसून वकिलांच्या वर्षानुवर्षापासून कायम असलेल्या समस्या निकाली काढण्याचा संकल्प नवनिर्वाचित अध्यक्ष अ‍ॅड. अजय तांदळे यांनी ‘लोकमत’शी दिलेल्या मुलाखतीतून केला. बीड येथील जिल्हा न्यायालयात वकीलांना बसण्यासाठी जागेची समस्या आहे. जो पर्यंत नवीन इमारत होत नाही तो पर्यंत हा प्रश्न कायम राहणार असल्याचे माहीत असल्याने अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पालकमंत्री पंकजा पालवे यांची भेट घेतली. नवीन इमारतीचे कामे वेगाने व मुदतीच्या आत व्हावे यासाठी संबंधीत विभागास सूचना देण्याची मागणी त्यांच्याकडे करण्यात आली. हे काम वेगाने झाल्यास इतरत्र चालणारे न्यायालये एकाजागी चालवली जातील, हा त्याचा दुसरा फायदा होईल. तहसीलच्या मागे ग्राहक न्यायालयासाठी ४ हजार स्क्वेअर फूट जागा उपलब्ध आहे. सदरच्या बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीने ५८ लाख रुपये मंजूर केले आहेत, परंतु ८४ लाख रुपयांचे वाढीव नवीन अंदाजपत्रक तयार केले असून त्याला मंजुरी मिळावी यासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे मागणीचे निवेदन देण्यात आले असल्याचे अ‍ॅड. तांदळे म्हणाले. महिला वकीलांसाठी स्वतंत्र खोली उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दरम्यान, सन २००४ मध्ये वकील संघात सचिव पदावर काम केले असल्याने वकीलांच्या अडचणी जाणून असल्याचे अ‍ॅड. तांदळे म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले, ग्राहक भांडाराच्या माध्यमातून तिकीट, बाँड, स्टेशनरीची विक्रीकरुन वकील संघास उत्पन्न मिळवून देण्यात येणार आहे. ई-लायब्ररी मध्ये पुस्तकांची संख्या वाढविण्यात येतील. सर्वात महत्वाची बाब म्हणजे, सर्व विधिज्ञ आणि न्यायालयीन अधिकारी (बार अ‍ॅन्ड बेंच) यांच्यातील संबंध खेळीमेळी, मोकळेपणाचे व सलोख्याचे राहतील यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. दर महिन्याला सर्व साधारण सभेची बैठक घेणार असल्यचेही अध्यक्ष अ‍ॅड. तांदळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)सर्व न्यायालयांमध्ये प्रकरणे वाढली असल्याने ते आपसी समझोत्याने सोडवली जाण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमास सर्वत्र चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे मागील काळात समोर आले आहे. या वर्षी आयोजित होणाऱ्या लोक अदालतीत अधिकाधिक प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे अ‍ॅड. तांदळे म्हणाले. याचा लाभ सर्व सामान्य पक्षकारांना होईल यात शंका नाही. आगामी काळात लोक अदालतीत जिल्हा वकील संघाचा मोठा सहभाग राहील, असेही अ‍ॅड. तांदळे म्हणाले.