शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा निर्मितीला पुन्हा ‘खो’!

By admin | Updated: January 6, 2015 01:09 IST

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई आयुक्तालय लातूरऐवजी नांदेडला करण्याचा घाट घातल्याने बीडलाही झळ पोहोचली आहे. अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या मार्गाला पुन्हा एकदा मोठा अडसर निर्माण झाला आहे.

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाईआयुक्तालय लातूरऐवजी नांदेडला करण्याचा घाट घातल्याने बीडलाही झळ पोहोचली आहे. अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या मार्गाला पुन्हा एकदा मोठा अडसर निर्माण झाला आहे. मराठवाड्याचे त्रिभाजन झाल्यास लातूर आयुक्तालय स्वतंत्र राहील. त्यामुळे रखडलेला अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचा मार्गही सुकर होईल, अशी अंबाजोगाईकरांना आशा आहे.अंबाजोगाई जिल्ह्याची निर्मिती व्हावी या मागणीसाठी मागील २८ वर्षांपासून विविध मार्गाने जनआंदोलनाचा रेटा सुरु आहे. ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती केली. त्यावेळीही अंबाजोगाई जिल्हानिर्मितीची मागणी धुडकावून लावण्यात आली. आता लातूर येथे आयुक्तालय डावलल्याने अंबाजोगाई जिल्हा निर्मिती धूसर बनली आहे. लातूर येथे स्वतंत्र महसूल आयुक्तालय सुरू झाले असते तर अंबाजोगाई जिल्हानिर्मितीचा मार्ग मोकळा झाला असता. आता हा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावण्यासाठी एक धक्का और दो म्हणत अभी नही तो कभी नही हा नारा देत अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचे आंदोलन पुन्हा सक्रिय झाले आहे.जिल्हा निर्मितीच्या आंदोलनाचा इतिहास असा़़़अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या आंदोलनास खऱ्या अर्थाने वेग आला तो १९८८ पासून अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या मागणीवर शहरात बैठका झाल्या आणि हा प्रश्न प्रशासकीय पातळीवर प्रकर्षाने मांडण्यात येऊ लागला. शासन दरबारी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध मार्गाने आंदोलने उभारण्यात येऊ लागली. तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांना जिल्हा निर्मितीच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. या शिष्टमंडळाचे नेतृ्त्व स्व़ गोपीनाथराव मुंडे यांनी केले होते. तत्कालीन नगराध्यक्ष कै. अरूण पुजारी यांच्या नेतृत्वाखाली देखील उठाव झाला होता़ स्व़ विमल मुंदडा पालकमंत्री असताना त्यांनीही ही मागणी लावून धरली होती़आजतागायत झालेल्या जिल्हा निर्मितीच्या आंदोलनात माजी नगराध्यक्ष कै. शंकरराव डाके, कै. अरूण पुजारी, राजकिशोर मोदी, नंदकिशोर मुंदडा, डॉ. द्वारकादास लोहिया, अमर हबीब यांनी जिल्हा निर्मितीच्या आंदोलनाची कृतीसमितीची धुरा सांभाळत आजपर्यंत झालेल्या सर्वच आंदोलनात राजकीय पक्ष आपले मतभेद व पक्षविधीनिषेध बाजूला ठेवून आंदोलनात सक्रिय झाले व हीच भूमिका आजही अंबाजोगाईकर जोपासतात.अनुकुलता असूनही अडसरअंबाजोगाई जिल्हा निर्मिती व्हावी यासाठी पूरक असणारी सर्वच कार्यालये अंबाजोगाईत गेल्या पाच वर्षांपासून कार्यान्वित आहेत. जिल्ह्याच्या धर्तीवरच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय व अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या टोलेजंग इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. अशी अनुकुलता उपलब्ध असूनही अडसर कशासाठी? हा प्रश्न सामान्य माणसाच्या मनात निर्माण होत आहे. जिल्हा व सत्र न्यायालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, विशेष भूसंपादनाची तीन कार्यालय, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, उपअधीक्षक लघु पाटबंधारे कार्यालय, अशी सर्वच कार्यालये कार्यान्न्वित असून जिल्ह्यासाठी लागणारी सर्व संरचना आज उपलब्ध स्थितीत आहे. शहरालगत वनखात्याची सुमारे ४ हजार एकर जमीन उपलब्ध आहे. त्या शिवाय सरकारी मोकळी जमीनही उपलब्ध आहे. प्रशासनाच्या जुन्या इमारती सुस्थितीत उपलब्ध असल्याने जिल्ह्यासाठी लागणारी सर्व कार्यालये सहज कार्यान्वित होण्यासाठी पाहिजे तेवढी कार्यालयीन जागाही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे.