शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

खैरे यांचे चुकले; परंतु ते वक्तव्य भावनेच्या भरात केलेले : संजय राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 7:51 PM

उमेदवारी न मिळाल्याने खैरेंनी केलेले वक्तव्य चुकीचेच 

ठळक मुद्देखैरेंचे वक्तव्य भावनेच्या भरात केल्याचे दिसतेनवीन पिढीचे व्हिजन वेगळे आहे

औरंगाबाद : राज्यसभेसाठी उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलेले वक्तव्य चुकीचेच होते, असे मत शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी सोमवारी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. 

खैरे यांचे चुकले; परंतु त्यांनी ते वक्तव्य भावनेच्या भरात केल्याचे दिसते आहे, याबाबत पक्षप्रमुखच निर्णय घेतील, असेही राऊत म्हणाले. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले शिवसेनेचे माजी खा.खैरे यांचा १२ मार्च रोजी वक्तव्य करताना तोल गेला. पक्षाकडून माझ्या नावाचा विचार राज्यसभा सदस्यत्वासाठी होईल. परंतु ऐनवेळी काँग्रेसमधून आलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांचे नाव पुढे आल्यामुळे मन उद्विग्न झाले आहे. निष्ठावंताला न्याय मिळेल असे वाटले होते. परंतु पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. चतुर्वेदी काँग्रेसमध्ये होत्या. त्या पूर्वी गुरुदास कामत यांच्या समर्थक होत्या. त्यानंतर खा.राहुल गांधी यांच्याकडे गेल्या. नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्याचे फळ त्यांना मिळाले, असे खैरे म्हणाले होते. त्यानंतर १५ मार्च रोजी त्यांनी राऊत यांची भेट घेऊन सगळा घडलेला प्रकार व्यथित होऊन मांडला. खैरे आणि राऊत यांच्या भेटीत नेमके काय झाले, याबाबत राऊत यांची भेट घेऊन जाणून घेण्याचा ‘लोकमत’ने प्रयत्न केला.

नवीन पिढीचे व्हिजन वेगळे आहेखा. राऊत म्हणाले, खैरे आमचे जुने सहकारी आहेत. त्यांनी रविवारी माझी भेट धेतली. परंतु उमेदवारीबाबत पक्षाचा निर्णय झालेला असतो. त्या निर्णयानुसार प्रियंका चतुर्वेदी नवीन असल्या तरी त्यांना उमेदवारी दिली गेली. भविष्यातील पक्षाच्या काही धोरणासाठी त्यांचा फायदा होणार असेल म्हणूनच त्यांना संधी दिली असेल. आमची जी नवीन पिढी राजकारणात आहे. ती काही तरी वेगळा विचार करीत आहे. नवीन लोकांना पक्षात आणल्यावर त्यांना जबाबदारी देणे गरजेचे आहे. नवीन लोकांना संधी दिली नाही तर त्यांनी पक्षात का यावे?  राजकारणात कुणी साधू-संत नसतात. काही तरी इच्छा म्हणूनच लोक पक्षांतर करीत असतात. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतChandrakant Khaireचंद्रकांत खैरेShiv Senaशिवसेना