शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

अंतर्गत कलहाने काँग्रेसचा घात !

By admin | Updated: July 19, 2014 01:22 IST

संजय जाधव, पैठण पैठण नगर परिषदेत निर्णायक बहुमत असताना काँग्रेस पक्षाच्या उमेदवारास नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले.

संजय जाधव, पैठणपैठण नगर परिषदेत निर्णायक बहुमत असताना काँग्रेस पक्षाच्या उमेदवारास नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मुस्लिमबहुल भागातून भरीव असे बळ मिळत आले आहे; मात्र काल झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा पराभव होताच न.प.च्या कार्यालयासमोर जमा होऊन याच भागातील नागरिकांनी फटाके वाजवीत विरोधात घोषणा दिल्या. विधानसभेच्या तोंडावर झालेल्या या पराभवाचे आत्मचिंतन काँग्रेसच्या वरिष्ठांनी करणे गरजेचे झाले आहे.पैठण नगर परिषदेत अडीच वर्षांपूर्वी २० पैकी १० नगरसेवक निवडून देत जनतेने सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला पसंती दिली. यात मुस्लिमबहुल भागातून १० पैकी ७ नगरसेवक निवडून दिले व उर्वरित शहरातून ३ नगरसेवकांची वर्णी काँग्रेसकडून लागली होती. राष्ट्रवादीच्या पारड्यात जनतेने २ नगरसेवकांचे बळ दिले होते.पैठण नगर परिषदेचे नगराध्यक्षपद हे अनुसूचित जाती, जमातीसाठी राखीव होते; मात्र १० पैकी एकही नगरसेवक या प्रवर्गातील नसल्याने काँग्रेसने राष्ट्रवादी पक्षाकडून निवडून आलेले राजू गायकवाड यांना काँग्रेसमध्ये ओढून त्यांना नगराध्यक्षपदी बसवत मित्रपक्षाला धक्का दिला. वास्तविक पाहता राष्ट्रवादी हा मित्रपक्ष असल्याने अडीच वर्षे राष्ट्रवादी व अडीच वर्षे काँग्रेस अशी वाटाघाटी करूनही काँग्रेस पक्ष आज सत्तेत राहू शकत होता. २ नगरसेवकांपैकी १ नगरसेवक ओढून नेल्याने राष्ट्रवादी न. प.च्या राजकारणात दुखावली व त्याच घटनेचे पडसाद काल झालेल्या निवडणुकीत उमटले, अशी चर्चा शहरभर होत आहे.काँग्रेसने राष्ट्रवादीचा नगरसेवक ओढत त्याला नगराध्यक्ष केले. दोन वेळेस नगराध्यक्षपदी राहिलेले जितसिंग करकोटक यांना उपनगराध्यक्षपद दिले. पैठण शहराध्यक्षपदही जितसिंग करकोटक यांच्याचकडे होते. काँग्रेसच्या १० नगरसेवकांपैकी ५ नगरसेवक मुस्लिम समाजाचे होते. या पैकी एकाला उपनगराध्यक्षपद काँग्रेसने देणे गरजेचे होते, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. येथूनच आपल्याला डावलले जात असल्याची भावना या नगरसेवकांत निर्माण झाली व काल झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाची उमेदवारी जितसिंग करकोटक यांना घोषित होताच काँग्रेसच्या नगरसेवकांत अस्वस्थता वाढली. नगरसेवकांत असलेल्या नाराजीस जितसिंग करकोटक दूर करण्यात कमी पडले. यातून १० पैकी ६ नगरसेवकांनी काल झालेल्या निवडणुकीतून अंग काढून घेतल्याने काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेस पक्षाबाबत निर्माण झालेली परिस्थिती व गैरसमज दूर करण्याची जबाबदारी आता वरिष्ठांवर आलेली आहे. असे न झाल्यास आगामी काळात काँग्रेसची पीछेहाट अटळ आहे, असे मानले जात आहे. काँग्रेस पक्षाचा व्हीप न पाळणारे नगरसेवक आजही आम्ही पक्षासोबत आहोत, असे विधान करीत आहेत. या परिस्थितीत काँग्रेसचे वरिष्ठ या नगरसेवकांवर कारवाई करणार की आणखी दुसरी कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.