शहरं
Join us  
Trending Stories
1
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
2
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
3
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
4
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
5
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
6
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
7
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
8
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
9
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
10
क्रिकेटरशी जोडलं नाव, आता करोडपती यूट्युबरची बायको होणार 'ही' अभिनेत्री? लग्नाची रंगली चर्चा
11
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
12
लोकसंख्या वाढीसाठी चंद्राबाबू नायडूं यांची मोठी घोषणा! तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी सुरू केली 'कॅश ऑफर' योजना! कारण काय?
13
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
14
Virat Kohli : किंग कोहलीचा विक्रमी धडाका! IPL इतिहासात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं
15
Mouni Roy : संसार मोडल्यावर मौनी रॉय आणि दिशा पाटनी रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या, व्हायरल पोस्टचं 'सत्य'
16
आयडियाची कल्पना! सूट-बूट घालून विकतोय फ्राईड राईस; दरमहा ७ लाखांची कमाई
17
पंतप्रधान मोदी यांचा ८ वर्षांनी स्वीडन दौरा; व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण मुद्द्यांवर चर्चा
18
Summer Tips: उन्हाळ्यात लोक टक्कल का करतात? जाणून घ्या त्यामागील आरोग्यदायी फायदे!
19
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर ST खोल खड्ड्यात कोसळली, २५ प्रवासी थोडक्यात बचावले
20
मुलीचं मौन म्हणजे 'कबूल है-कबूल है-कबूल है...!' अफगाणिस्तानात तालिबानची बालविवाहाला मंजूरी
Daily Top 2Weekly Top 5

केबीसी एजंटावर होणार औरंगाबादेत गुन्हे दाखल

By admin | Updated: July 25, 2014 00:49 IST

औरंगाबाद : सामान्य जनतेला दामदुपटीचे आमिष दाखवून केबीसीमध्ये मोठ्या रकमा गुंतविण्यासाठी प्रोत्साहित करणारे एजंट आज गब्बर झालेले आहेत.

औरंगाबाद : सामान्य जनतेला दामदुपटीचे आमिष दाखवून केबीसीमध्ये मोठ्या रकमा गुंतविण्यासाठी प्रोत्साहित करणारे एजंट आज गब्बर झालेले आहेत. त्यांच्यामुळेच अनेक जण देशोधडीला लागले असल्याने त्यांच्यावर औरंगाबाद पोलीस गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी आता कागदपत्रे जमा करण्यास सुरुवातही केली आहे.
केबीसीमध्ये पैसे गुंतविल्यास अल्पावधीतच अडीचपट रक्कम देण्याचे आमिष दाखवून कंपनीच्या एजंटांनी सामान्य जनतेकडून मोठ्या रकमा उकळल्या. या रकमा कंपनीत गुंतवून त्यांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. कायद्यातील तरतुदीनुसार जेथे फसवणूक झाली त्या ठिकाणच्या जवळच्या पोलीस ठाण्यात याविषयी गुन्हा दाखल केला जातो. केबीसीमध्ये पैसे गुंतविण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देणाऱ्या एजंटांनीच त्यांच्याकडून रकमा घेतल्या. नंतर त्यांनी त्या रकमा कंपनीत जमा केल्या आहेत. नाशिक येथे जाऊन गुंतवणूक करणाऱ्यांच्या तक्रारींवर नाशिक आर्थिक गुन्हेशाखा तपास करीत आहेत, तर ज्यांनी औरंगाबादेत गुंतवणूक केली आहेत, त्यांच्या तक्रारीवरून येथे गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले.
गुरुवारी पोलिसांनी येथे आलेल्या तक्रारदारांचे फॉर्म भरून घेतले आहेत. त्यांची किती रकमेची फसवणूक झाली. तसेच त्यांनी कोणामार्फत आणि कोणत्या एजंटच्या सांगण्यावरून पैसे गुंतविले याबाबतची माहिती आज जमा केली आहे. या माहितीच्या आधारे पोलीस आता कंपनीचे संचालक आणि त्यांच्या एजंटांविरोधात गुन्हे दाखल करणार आहे.
तक्रारदारांनी पुढे येणे आवश्यक
आतापर्यंत एकही तक्रारदार पुढे आला नव्हता, त्यामुळे पोलिसांना या प्रकरणी गुन्हे नोंदविता आले नाही. अनेक एजंट सामान्य जनतेला मोठ्या रकमा मिळण्याचे आमिष दाखवून गब्बर झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे आठ दिवसांपूर्वी केबीसीमध्ये फसवणूक झालेल्या एका गुंतवणूकदार महिलेने तक्रार देण्यास नकार दिल्याने पोलिसांना गुन्हा दाखल करता आला नाही.