शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

जायकवाडी ५३.५३ टक्क्यांवर; पिण्याच्या, उद्योगांच्या पाण्याचा प्रश्न मिटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 14:33 IST

Heavy Rainfall in Marathawada : जायकवाडी धरणातून अंदाजे लहान-मोठ्या ४२ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. शिवाय, दोन लाख शेतकरीदेखील धरणातील पाण्यावर अवलंबून आहेत.

ठळक मुद्दे मराठवाड्यातील ८ प्रकल्प तुडुंब

औरंगाबाद: मराठवाड्यासह ( Marathwada ) औरंगाबादची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam ) ५३.५३ टक्के पाणीसाठा सध्या झाला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे साठा ( Heavy Rainfall in Marathawada ) वाढल्याने पिण्याच्या आणि उद्योगांच्या पाण्याचा प्रश्न सध्या मिटला असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत ४५ टक्के जलसाठा अद्याप कमी आहे. गेल्या वर्षी १० सप्टेंबर रोजी धरणात ९८ टक्के जलसाठा होता. 

जायकवाडी धरणातून अंदाजे लहान-मोठ्या ४२ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. शिवाय, दोन लाख शेतकरीदेखील धरणातील पाण्यावर अवलंबून आहेत. औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांतील गावे, औद्योगिक वसाहतींसाठी पाणी आरक्षित आहे. शहराला रोज १५० एमएलडी पाणीपुरवठा होतो. तर उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणात उपसा होतो. सध्या धरणात ११६२ दशलक्ष घनमीटर इतका उपयुक्त जलसाठा आहे. २१७० दशलक्ष घनमीटर उपयुक्त जलसाठ्याची धरणाची एकूण क्षमता आहे. यंदाच्या पावसाळ्यात ६०९ मि.मी. पाऊस धरण क्षेत्रात झाला असून, गेल्या वर्षी ७०१ मि.मी. पाऊस धरण क्षेत्रात झाला होता.

हे प्रकल्प भरले आहेत तुडुंबनिम्न दुधना ९६ टक्के, येलदरी १०० टक्के, सिद्धेश्वर ९७ टक्के, माजलगाव ९४ टक्के, मांजरा ८४ टक्के, पेनगंगा ९६ टक्के, मानार १०० टक्के, निम्न तेरणा ७२ टक्के, विष्णुपुरी ९२ टक्के हे प्रकल्प तुडुंब झाले आहेत. सीना कोळेगाव १५ टक्के तर खडका बंधाऱ्यात १०० टक्के आणि शहागड बंधाऱ्यात ४९ टक्के पाणी आले आहे.

गेला खरीप, यंदाच्या रबीला आठ आवर्तने दिलीजायकवाडी धरणातून रबी आणि खरीप हंगाम मिळून ८ आवर्तने (पाणीपाळी) सोडण्यात आले. रबी हंगामातील शेवटची पाणीपाळी फेब्रुवारीअखेरीस संपली. १ मार्च ते ३१ जुलै २०२१ पर्यंत पाणी वितरण करण्यात आले. १२७९ दलघमी पाणी सिंचनासाठी आहे. रबी हंगामात १ लाख ४६ हजार ९०० हेक्टर तर खरीप हंगामासाठी ५३ हजार हेक्टरसाठी हे पाणी दिले. नांदूर मधमेश्वर कालवा, निम्न दुधना या प्रकल्पातील पाणीवाटपाचा विचार यात केला होता. यंदाच्या पावसाळ्यापर्यंत सिंचनासाठी पूर्ण क्षमतेने पाणी दिले. यंदा धरणात ५३.५३ टक्के जलसाठा असल्यामुळे रबी २०२२ व खरिपाला किती पाणी सोडण्यात येईल, हे आताच सांगता येणे अवघड आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणRainपाऊसMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादagricultureशेती