शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी ५३.५३ टक्क्यांवर; पिण्याच्या, उद्योगांच्या पाण्याचा प्रश्न मिटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 14:33 IST

Heavy Rainfall in Marathawada : जायकवाडी धरणातून अंदाजे लहान-मोठ्या ४२ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. शिवाय, दोन लाख शेतकरीदेखील धरणातील पाण्यावर अवलंबून आहेत.

ठळक मुद्दे मराठवाड्यातील ८ प्रकल्प तुडुंब

औरंगाबाद: मराठवाड्यासह ( Marathwada ) औरंगाबादची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam ) ५३.५३ टक्के पाणीसाठा सध्या झाला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे साठा ( Heavy Rainfall in Marathawada ) वाढल्याने पिण्याच्या आणि उद्योगांच्या पाण्याचा प्रश्न सध्या मिटला असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत ४५ टक्के जलसाठा अद्याप कमी आहे. गेल्या वर्षी १० सप्टेंबर रोजी धरणात ९८ टक्के जलसाठा होता. 

जायकवाडी धरणातून अंदाजे लहान-मोठ्या ४२ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. शिवाय, दोन लाख शेतकरीदेखील धरणातील पाण्यावर अवलंबून आहेत. औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांतील गावे, औद्योगिक वसाहतींसाठी पाणी आरक्षित आहे. शहराला रोज १५० एमएलडी पाणीपुरवठा होतो. तर उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणात उपसा होतो. सध्या धरणात ११६२ दशलक्ष घनमीटर इतका उपयुक्त जलसाठा आहे. २१७० दशलक्ष घनमीटर उपयुक्त जलसाठ्याची धरणाची एकूण क्षमता आहे. यंदाच्या पावसाळ्यात ६०९ मि.मी. पाऊस धरण क्षेत्रात झाला असून, गेल्या वर्षी ७०१ मि.मी. पाऊस धरण क्षेत्रात झाला होता.

हे प्रकल्प भरले आहेत तुडुंबनिम्न दुधना ९६ टक्के, येलदरी १०० टक्के, सिद्धेश्वर ९७ टक्के, माजलगाव ९४ टक्के, मांजरा ८४ टक्के, पेनगंगा ९६ टक्के, मानार १०० टक्के, निम्न तेरणा ७२ टक्के, विष्णुपुरी ९२ टक्के हे प्रकल्प तुडुंब झाले आहेत. सीना कोळेगाव १५ टक्के तर खडका बंधाऱ्यात १०० टक्के आणि शहागड बंधाऱ्यात ४९ टक्के पाणी आले आहे.

गेला खरीप, यंदाच्या रबीला आठ आवर्तने दिलीजायकवाडी धरणातून रबी आणि खरीप हंगाम मिळून ८ आवर्तने (पाणीपाळी) सोडण्यात आले. रबी हंगामातील शेवटची पाणीपाळी फेब्रुवारीअखेरीस संपली. १ मार्च ते ३१ जुलै २०२१ पर्यंत पाणी वितरण करण्यात आले. १२७९ दलघमी पाणी सिंचनासाठी आहे. रबी हंगामात १ लाख ४६ हजार ९०० हेक्टर तर खरीप हंगामासाठी ५३ हजार हेक्टरसाठी हे पाणी दिले. नांदूर मधमेश्वर कालवा, निम्न दुधना या प्रकल्पातील पाणीवाटपाचा विचार यात केला होता. यंदाच्या पावसाळ्यापर्यंत सिंचनासाठी पूर्ण क्षमतेने पाणी दिले. यंदा धरणात ५३.५३ टक्के जलसाठा असल्यामुळे रबी २०२२ व खरिपाला किती पाणी सोडण्यात येईल, हे आताच सांगता येणे अवघड आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणRainपाऊसMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादagricultureशेती