शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

टंचाईच्या काळात उपलब्ध पाणी पिण्यायोग्य आहे का?

By विजय सरवदे | Updated: May 23, 2024 19:20 IST

रासायनिक तपासणी झाली पण, दूषित जलस्त्रोतांची आकडेवारी गुलदस्त्यात

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात सध्या ४१२ गावे आणि ६१ वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. एकूण या ४७३ गावांना ६७८ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. शिवाय २८५ गावांमधील ३४६ विहिरींचे अधिग्रहण करून त्यातील पाणी लोकांसाठी उपलब्ध करून दिले आहे. मात्र, टंचाईच्या या काळात उपलब्ध पाणी पिण्यासाठी योग्य आहे का, याची काळजी ना प्रशासनाला आहे, ना लोकांना. पाण्याचे नमुने तपासण्याची मोहीम सुरू झाली. पण, दूषित पाण्याचे स्त्रोत किती आहेत. तेथे कोणत्या उपाययोजना केल्या जातात, हे गुलदस्त्यात आहे. 

ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध, सुरक्षित व स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे, तसेच जलजन्य आजाराच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवता यावे, यासाठी पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर, तसेच मान्सूनपूर्व जलस्त्रोतांची तपासणी करण्याची मोहीम जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन कक्षाने हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत ३० जूनपर्यंत जिल्ह्यातील १५३३ पाणीस्त्रोतांची रासायनिक तपासणी केली जाणार आहे. आतापर्यंत १३८४ पाण्याचे नमुने तपासले असून, ८०६ नमुने प्रयोगशाळेत सादर केल्याची नोंद आहे. त्यापैकी प्रयोगशाळेत रासायनिक पाणी तपासणीचे ५६, तर जैविक तपासणीचे ५५१ पाणी नमुन्यांची तपासणी झाल्याची ऑनलाइन नोंद आहे. 

दरम्यान, पाणी तपासणीचा अहवाल अद्यापही स्वच्छ भारत मिशन कक्षाकडे प्राप्त झालेला नाही. त्यामुळे टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा किंवा अधिग्रहीत विहिरींचे पाणी, विंधन विहिरी, नळयोजनेसाठी अस्तित्वात असलेले जलस्त्रोत नागरिकांना पिण्यासाठी सुरक्षित आहेत का, याची प्रशासकीय पातळीवर कोणीही ठामपणे सांगू शकत नाही.जिल्ह्यातील ८७० जलसुरक्षकांकडे पाणी स्त्रोतांची तापसणी करण्यासाठी रासायनिक किट देण्यात आले आहेत. या एका किटच्या माध्यमातून १०० पाणी नुमन्यांची तपासणी केली जाते. जैविक तपासणीचे देखील किट पोहोच झाले असून, त्याचा तपासणीसाठी एकदाचा वापर केला जातो. वर्षातून एकदाच रासायनिक तपासणी केली जाते, तर जैविक तपासणी वर्षातून दोनवेळा केली जाते.

तालुका - प्रयोगशाळेत दाखल नमुनेछत्रपती संभाजीनगर ११३फुलंब्री ३४सिल्लोड १२९सोयगाव ८०कन्नड ३२खुलताबाद १३२गंगापूर ३४वैजापूर ८७पैठण १६५

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणी