शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

टंचाईच्या काळात उपलब्ध पाणी पिण्यायोग्य आहे का?

By विजय सरवदे | Updated: May 23, 2024 19:20 IST

रासायनिक तपासणी झाली पण, दूषित जलस्त्रोतांची आकडेवारी गुलदस्त्यात

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात सध्या ४१२ गावे आणि ६१ वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. एकूण या ४७३ गावांना ६७८ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. शिवाय २८५ गावांमधील ३४६ विहिरींचे अधिग्रहण करून त्यातील पाणी लोकांसाठी उपलब्ध करून दिले आहे. मात्र, टंचाईच्या या काळात उपलब्ध पाणी पिण्यासाठी योग्य आहे का, याची काळजी ना प्रशासनाला आहे, ना लोकांना. पाण्याचे नमुने तपासण्याची मोहीम सुरू झाली. पण, दूषित पाण्याचे स्त्रोत किती आहेत. तेथे कोणत्या उपाययोजना केल्या जातात, हे गुलदस्त्यात आहे. 

ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध, सुरक्षित व स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे, तसेच जलजन्य आजाराच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवता यावे, यासाठी पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर, तसेच मान्सूनपूर्व जलस्त्रोतांची तपासणी करण्याची मोहीम जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन कक्षाने हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत ३० जूनपर्यंत जिल्ह्यातील १५३३ पाणीस्त्रोतांची रासायनिक तपासणी केली जाणार आहे. आतापर्यंत १३८४ पाण्याचे नमुने तपासले असून, ८०६ नमुने प्रयोगशाळेत सादर केल्याची नोंद आहे. त्यापैकी प्रयोगशाळेत रासायनिक पाणी तपासणीचे ५६, तर जैविक तपासणीचे ५५१ पाणी नमुन्यांची तपासणी झाल्याची ऑनलाइन नोंद आहे. 

दरम्यान, पाणी तपासणीचा अहवाल अद्यापही स्वच्छ भारत मिशन कक्षाकडे प्राप्त झालेला नाही. त्यामुळे टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा किंवा अधिग्रहीत विहिरींचे पाणी, विंधन विहिरी, नळयोजनेसाठी अस्तित्वात असलेले जलस्त्रोत नागरिकांना पिण्यासाठी सुरक्षित आहेत का, याची प्रशासकीय पातळीवर कोणीही ठामपणे सांगू शकत नाही.जिल्ह्यातील ८७० जलसुरक्षकांकडे पाणी स्त्रोतांची तापसणी करण्यासाठी रासायनिक किट देण्यात आले आहेत. या एका किटच्या माध्यमातून १०० पाणी नुमन्यांची तपासणी केली जाते. जैविक तपासणीचे देखील किट पोहोच झाले असून, त्याचा तपासणीसाठी एकदाचा वापर केला जातो. वर्षातून एकदाच रासायनिक तपासणी केली जाते, तर जैविक तपासणी वर्षातून दोनवेळा केली जाते.

तालुका - प्रयोगशाळेत दाखल नमुनेछत्रपती संभाजीनगर ११३फुलंब्री ३४सिल्लोड १२९सोयगाव ८०कन्नड ३२खुलताबाद १३२गंगापूर ३४वैजापूर ८७पैठण १६५

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणी