शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुकांनो, उमेदवारी मिळाल्याच्या भ्रमात फिरू नका

By admin | Updated: August 22, 2014 00:20 IST

औरंगाबाद : शिवसेनेकडून विधानसभेसाठी इच्छुकांचा आकडा लांबत चालला आहे. काही जण तर उमेदवारी निश्चित असल्याच्या तोऱ्यात वागत आहेत.

औरंगाबाद : शिवसेनेकडून विधानसभेसाठी इच्छुकांचा आकडा लांबत चालला आहे. काही जण तर उमेदवारी निश्चित असल्याच्या तोऱ्यात वागत आहेत. तर काही इच्छुक परस्पर मातोश्रीवर जाऊन उमेदवारीचा शब्द घेऊन येत आहेत. त्यामुळे आज खा.चंद्रकांत खैरे यांनी अनेकांच्या कानपिचक्या घेतल्या. पक्षात सध्या मीच नेता असल्याचे त्यांनी छातीठोकपणे सांगितले. दरम्यान ‘मध्य’ मधून इच्छुक एक पदाधिकारी गुरुवारी रात्री मुंबईला उमेदवारीसाठी गेला. इच्छुकांनी उमेदवारी मिळाल्याच्या भ्रमात फिरू नये, असे सांगून पक्ष सदस्य नोंदणी करा, पक्षासाठी स्वत:सारखा पैसा खर्च करण्याचे आवाहनही त्यांनी केले. पक्षातील निर्णयावर आपली पकड मजबूत असल्याचे दाखविण्यासाठी ते आक्रमकपणे बोलत होते, असे सेनेच्या गोटातून समजले आहे. कुणाचीही उमेदवारी अंतिम झालेली नाही. पक्ष सदस्य नोंदणीवरून ते चांगलेच घसरले. अडीच लाख रुपये खर्चून स्टीकर, पाट्या तयार केल्या. मात्र कुणीही त्यासाठी पुढाकार घेतला नाही. सदस्य नोंदणीसाठी महापौर कला ओझा यांनी परिश्रम घेतल्याचा दावा खा.खैरे यांनी केला. शिवाई ट्रस्टच्या इमारतीत आज शहर व जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. २३ आॅगस्ट रोजी उद्धव ठाकरे शहरात येत असून, त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांना जिल्हा व शहरातून सर्व नेते, पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले. आमदारांना सर्व कार्यक्रम रद्द करून त्यावेळी उपस्थित राहावे लागणार आहे. बैठकीला महापौर कला ओझा, आ. प्रदीप जैस्वाल, आ. हर्षवर्धन जाधव, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, माजी आ. किशनचंद तनवाणी, सहसंपर्क प्रमुख सुहास दाशरथे यांच्यासह मनपातील पदाधिकारी व काही नगरसेवकांची उपस्थिती होती. आ. संजय शिरसाट, आ. आर. एम. वाणी हे बैठकीला गैरहजर होते. तर काही जिल्हा परिषद सदस्यांनीदेखील बैठकीला दांडी मारली. महिला आघाडीला आहे संधीमहिला आघाडीने आता मैदानात उतरले पाहिजे. त्यांनाही काम करण्याची व उमेदवारी मिळण्याची संधी आहे. तसेही महापौर ओझा यांनी मध्य मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केलीच आहे. महिला आघाडीने घरची कामे कमी करून बाहेर पडावे. काहीही होऊ शकते. उमेदवारीही मिळू शकते, असा सूर बैठकीत आळवून दावेदारांच्या मनसुब्यांवर पाणी फेरण्याचा प्रयत्न करण्यात आला.