शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

नरेगात अपूर्ण कामांची जंत्री

By admin | Updated: June 23, 2017 23:23 IST

हिंगोली : जिल्ह्यातमग्रारोहयोची कामे वेळेत सुरू न केल्याचे परिणाम दरवर्षी भोगावे लागतात.

हिंगोली : जिल्ह्यातमग्रारोहयोची कामे वेळेत सुरू न केल्याचे परिणाम दरवर्षी भोगावे लागतात. अर्धवट कामे ठेवण्याचे प्रमाण वाढत जात असल्याने नंतर अशा कामांवरील शासन खर्च वायाही जातो. यंदाही तब्बल ३६९८ कामे अर्धवट असल्याचे दिसून येत आहे.दरवर्षीच नोव्हेंबरनंतर मग्रारोहयोतील कामांना गती देणे अपेक्षित असताना एप्रिल-मे महिन्यात प्रशासनाला जाग येते. तोपर्यंत लोकप्रतिनिधी, शासन असा सगळीकडून रेटा वाढलेला असतो त्यामुळे हे सोपस्कार पूर्ण करायचे असतात. त्यात कामेही भरमसाठ सुरू केली जातात. ती पूर्ण कधी होतील, याचा साधा अंदाजही बांधला जात नाही. शिवाय मजुरांना काम उपलब्ध करून देणे अनिवार्य असल्याने ही कामे सुरू करावीही लागतात. औंढा तालुक्यात ३२१0, वसमत-११९१, हिंगोली-३७१६, कळमनुरी-२0८३, सेनगाव-४७३३ अशी सुरू झालेल्या कामांची संख्या १४९३३ एवढी होती. यापैकी ६८५४ कामे पूर्ण झाली. तर हे प्रमाण ५४ टक्के आहे. सर्वाधिक ६२ टक्के कामे वसमतमध्ये पूर्ण झाली आहेत. तर अपूर्ण राहिलेली ३१५६ कामे रद्द करावी लागली. तरीही औंढा-१0१३, वसमत-१८२, हिंगोली-८३५, कळमनुरी-५५७, सेनगाव-११११ अशी रखडलेल्या कामांची तालुकानिहाय संख्या आहे. अनेक कामे दुसऱ्या वर्षी पुन्हा सुरू केली जात नाहीत. त्याचा ताळमेळही बहुतेक यंत्रणा ठेवत नाहीत. काही ठिकाणी ग्रामस्थांनी रेटा लावला म्हणूनच ही कामे पूर्ण करण्याची तसदी घेतली जाते. तर अर्धवट कामांवर शासनाने केलेला खर्च मात्र वाया जातो. निदान हे टाळण्यासाठी तरी ही बाब गांभिर्याने घेणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी नवे डीएसआर दर आल्याने अंदाजपत्रक सुधारित करावे लागते. मूळ कामासाठीच मोठे हेलपाटे खावे लागल्याने यंत्रणा रखडलेल्या कडे दुर्लक्ष करतात. त्याचाही परिणाम या कामांवर होतो. वैयक्तिक लाभाच्या योजनांत तेवढा लाभार्थीच पाठपुरावा करतो. त्यालाही कार्यारंभ आदेश देण्यापासून, वेळोवेळी मोजमाप, मस्टर, लाभाची रक्कम मिळण्यासाठी त्यात येणाऱ्या प्रत्येक घटकाला खुश करताना काळजावर दु:खाच्या डागण्या लावून घ्याव्या लागतात.