जालना : वाळूच्या अवैध उपशाबद्दल राज्य आणि केंद्र सरकारवर आरोप करणाऱ्या आ. राजेश टोपे यांच्या पालकमंत्री पदाच्या काळात जिल्ह्यात आणि त्यांच्या घनसावंगी मतदारसंघात सर्वाधिक अवैध उपसा झाला, असा प्रतिटोला भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय तौर यांनी लगावला आहे.शुक्रवारी टोपे यांनी जिल्ह्यातील वाळूच्या अवैध उपशाबाबत सरकारवर आरोप केले होते. त्या आरोपांना प्रत्युत्तर देताना तौर यांनी म्हटले आहे की, टोपे यांनी पालकमंत्री पदाच्या काळात वाळूमाफियांना पाठिशी घातले होते. त्यांच्या काळातच जिल्ह्यातील रस्त्यांची वाट लागलेली आहे. घनसावंगी तालुक्यातील ५२ गावातील गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहण्याची वेळ टोपे काळातीलच आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}