शहरं
Join us  
Trending Stories
1
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
2
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
3
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
4
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
5
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
6
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
7
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
8
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
9
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
10
क्रिकेटरशी जोडलं नाव, आता करोडपती यूट्युबरची बायको होणार 'ही' अभिनेत्री? लग्नाची रंगली चर्चा
11
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
12
लोकसंख्या वाढीसाठी चंद्राबाबू नायडूं यांची मोठी घोषणा! तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी सुरू केली 'कॅश ऑफर' योजना! कारण काय?
13
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
14
Virat Kohli : किंग कोहलीचा विक्रमी धडाका! IPL इतिहासात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं
15
Mouni Roy : संसार मोडल्यावर मौनी रॉय आणि दिशा पाटनी रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या, व्हायरल पोस्टचं 'सत्य'
16
आयडियाची कल्पना! सूट-बूट घालून विकतोय फ्राईड राईस; दरमहा ७ लाखांची कमाई
17
पंतप्रधान मोदी यांचा ८ वर्षांनी स्वीडन दौरा; व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण मुद्द्यांवर चर्चा
18
Summer Tips: उन्हाळ्यात लोक टक्कल का करतात? जाणून घ्या त्यामागील आरोग्यदायी फायदे!
19
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर ST खोल खड्ड्यात कोसळली, २५ प्रवासी थोडक्यात बचावले
20
मुलीचं मौन म्हणजे 'कबूल है-कबूल है-कबूल है...!' अफगाणिस्तानात तालिबानची बालविवाहाला मंजूरी
Daily Top 2Weekly Top 5

आयआयएम औरंगाबादेतच हवे : राजेंद्र दर्डा

By admin | Updated: July 28, 2014 01:04 IST

औरंगाबाद- इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंटची (आयआयएम) शाखा औरंगाबादेतच

औरंगाबाद- इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंटची (आयआयएम) शाखा औरंगाबादेतच येण्यासाठी विभागातील लोकप्रतिनिधी, उद्योजक, व्यापारी आणि शैक्षणिक क्षेत्राच्या प्रतिनिधींबरोबर मी सर्वतोपरी प्रयत्न करीन, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी केले. नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रात एक ‘आयआयएम’ स्थापन करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. ‘आयआयएम’ची ही शाखा औरंगाबादेतच यावी, ही मागणी आता मराठवाड्यातून जोर धरत आहे. या कामी दर्डा यांनी पुढाकार घेऊन सीएमआय या उद्योजकांच्या संघटनेची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी नुकतीच भेट घडवून आणली होती.
या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’शी बोलताना शिक्षणमंत्री म्हणाले की, मराठवाड्याच्या विकासासाठी राज्य सरकारने नेहमीच सकारात्मक पावले उचलली आहेत. आर्थिक पॅकेजेस देण्याबरोबरच सिपेट, इंडो जर्मन टूल रूम यांसारख्या संस्था औरंगाबादेत याव्यात म्हणून आम्ही नेहमीच प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रात ‘आयआयएम’ स्थापन होणार, अशी घोषणा झाली त्याक्षणी ही संस्था औरंगाबादेतच यावी, असा पहिला विचार माझ्या मनात आला. डीएमआयसी आणि स्मार्ट सिटी प्रकल्पांमुळे औरंगाबाद एका वेगळ्याच स्तरावर पोहोचणार आहे. आयआयएममुळे शहराच्या प्रतिष्ठेत आणखीनच भर पडेल. त्यामुळेच ही संस्था औरंगाबादेतच यावी, अशी माझी तीव्र इच्छा आहे, असे दर्डा म्हणाले.
प्रयत्नांना बळ
अशा प्रकारचे प्रकल्प खेचून आणण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, असे अनुभव डीएमआयसी, आंतरराष्ट्रीय विमानतळ, अ‍ॅटो क्लस्टर आणि स्मार्ट सिटी या प्रकल्पांचा यशस्वी पाठपुरावा करताना मला आले आहेत. शहरातील उद्योजक व व्यापारी यांनी आयआयएमसाठी घेतलेला पुढाकार प्रशंसनीय आहे.
या शहराचा लोकप्रतिनिधी व राज्य शासनातील एक मंत्री म्हणून सर्व स्तरांवर आयआयएमसाठी चाललेल्या प्रयत्नांना बळ देण्याची माझी भूमिका राहील. सर्व संबंधितांना बरोबर घेऊन आयआयएम औरंगाबादेत यावी, यासाठी मी पाठपुरावा करीन, अशी ग्वाही शिक्षणमंत्र्यांनी दिली.