शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

सेना, भाजप, एमआयएमकडून प्रस्ताव आल्यास आघाडी करण्यास तयार : जोगेंद्र कवाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2022 6:43 PM

रिपब्लिकन ऐक्यासंदर्भात रामदास आठवले वक्तव्ये करतात. मात्र स्वतः पुढाकार घेत नाहीत. ते स्वतः बाळासाहेब आंबेडकरांना जाऊन भेटत नाहीत.

औरंगाबाद : महाविकास आघाडीकडून खूप अपेक्षा आहेत. पण हे सरकार विशेषतः सामाजिक न्यायाच्या प्रश्नावर पुरेसे गंभीर नसल्याने दलित अत्याचाराबाबत महाराष्ट्र देशात तिसरा आहे. हे सर्व पाहता आगामी निवडणुका एकतर आम्ही स्वबळावर लढू. तसेच शिवसेना, भाजप आणि एमआयएमकडून सन्मानपूर्वक प्रस्ताव आल्यास पीपल्स रिपब्लिकन पक्ष त्यांच्याशी आघाडी करण्यास तयार असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. ज़ोगेंद्र कवाडे यांनी स्पष्ट केले. विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त विद्यापीठ गेटवरील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर ते सुभेदारी विश्रामगृहावर झालेल्या पत्रपरिषदेत बोलत होते.

कायदे बदला अशी कधी मागणी होत नाही. परंतु ॲट्राॅसिटी कायदा बदला अशी मागणी का होते, केंद्र सरकारने हा कायदा कडक केला. पण त्याची कठोर अंमलबजावणी का होत नाही, असे सवाल उपस्थित करून  अन्याय - अत्याचाराचा मुकाबला करण्यासाठी आम्ही कार्यकर्त्यांच्या कार्यशाळा घेणार आहोत. सामाजिक न्याय खात्याचा निधी वेळोवेळी इतरत्र वळविण्यात येत असल्याचे कवाडे म्हणाले. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात आमचाही वाटा आहे. पण मंत्रिपद व आमदारकी द्या सोडून. निदान सत्तेतला ठरल्यानुसार वाटा तरी द्यायला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

रिपब्लिकन ऐक्यासंदर्भात रामदास आठवले वक्तव्ये करतात. मात्र स्वतः पुढाकार घेत नाहीत. ते स्वतः बाळासाहेब आंबेडकरांना जाऊन भेटत नाहीत. आम्ही आता वंचित राहिलो नाहीत, बाबासाहेबांमुळे आम्ही १९५६ सालीच संचित झाल्याचा टोला प्रा. कवाडे यांनी लगावला. यावेळी जयदीप कवाडे, जे. के नारायणे, लक्ष्मण कांबळे, रामदास लोखंडे, अशोक जाधव, प्रकाश जाधव, चरणदास इंगोले, राहुल प्रधान, गणेश बनवणे, संजय सोनवणे आदी पत्रपरिषदेस उपस्थित होते.

टॅग्स :Jogendra kawadeजोगेंद्र कवाडेAurangabadऔरंगाबादBJPभाजपाShiv SenaशिवसेनाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन