शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

हुजूरसाहेब नांदेड- बिकानेर रेल्वे औरंगाबादमार्गे वगळली

By admin | Updated: August 31, 2014 00:41 IST

औरंगाबाद : हुजूरसाहेब नांदेड- बिकानेर साप्ताहिक एक्स्प्रेस नांदेड- पूर्णा- अकोलामार्गे वळविण्यात आली आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांकडून गेल्या अनेक वर्षांपासून मागणी केली जाणारी हुजूरसाहेब नांदेड- बिकानेर साप्ताहिक एक्स्प्रेस सोडण्याची घोषणा रेल्वे अर्थसंकल्पात करण्यात आली. ही गाडी औरंगाबादमार्गे चालविण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती; परंतु ही रेल्वे नांदेड- औरंगाबाद- मनमाड मार्गाऐवजी नांदेड- पूर्णा- अकोलामार्गे वळविण्यात आली आहे. यामुळे परभणी, जालना आणि पर्यटनाची राजधानी असलेले औरंगाबाद राजस्थानशी जोडले जावे, यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.औरंगाबाद हे पर्यटनक्षेत्र राजस्थानशी जोडले जावे, यासाठी औरंगाबादमार्गे बिकानेर रेल्वे सोडावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. विविध रेल्वे संघटनांकडून सदर रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. यानुसार रेल्वे बजेटमधून हुजूरसाहेब नांदेड- बिकानेर साप्ताहिक एक्स्प्रेस मराठवाड्याच्या वाट्याला आली आहे; परंतु ही रेल्वे नांदेड- पूर्णा- अकोला- सुरतमार्गे धावणार आहे. या निर्णयामुळे परभणी, जालन्यासह जागतिक पातळीवर ओळख असलेल्या औरंगाबादच्या पर्यटक, सर्वसामान्य प्रवाशांवर अन्याय होईल, असे रेल्वे संघटकांनी म्हटले. औरंगाबाद- रेणिगुंठा- औरंगाबाद साप्ताहिक एक्स्प्रेस, हुजूरसाहेब नांदेड- औरंगाबाद साप्ताहिक एक्स्प्रेस या गाड्या सोडण्यात येत असल्या तरी हुजूरसाहेब नांदेड- बिकानेर साप्ताहिक एक्स्प्रेस औरंगाबादमार्गे सोडण्यात येत नसल्याने पर्यटनाची दोन स्थळे जोडली जाण्यासाठी आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.जनहित याचिका दाखल करणारआंतरराष्ट्रीय स्तराची दोन स्थळे जोडण्यापासून वंचित राहणार आहेत. ही रेल्वे औरंगाबादमार्गे सोडण्यात यावी, यासाठी पुढील आठवड्यात जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असे मराठवाडा रेल्वे प्रवासी सेनेचे सदस्य राज सोमाणी म्हणाले.एक फेरी औरंगाबादमार्गे हवीएक आठवडा तिकडून तर एक आठवडा औरंगाबादमार्गे ही रेल्वे सोडण्याची गरज आहे. जनशताब्दी एक्स्प्रेस जालन्याहून सोडण्याचे नियोजन केले जात असल्याचे समजते. असे करताना या रेल्वेच्या बोगी वाढविण्याची गरज आहे, असे मराठवाडा रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा म्हणाले.