शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीनशे शेतकऱ्यांना मदतीचा हात

By admin | Updated: June 29, 2014 00:38 IST

उस्मानाबाद : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या तालुक्यातील घोगरेवाडी येथील शेतकऱ्यांना डोंबिवली येथील विवेकानंद सेवाभावी संस्थेने मदतीचा हात दिला.

उस्मानाबाद : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या तालुक्यातील घोगरेवाडी येथील शेतकऱ्यांना डोंबिवली येथील विवेकानंद सेवाभावी संस्थेने मदतीचा हात दिला असून, या संस्थेच्या वतीने साडेतीनशे शेतकऱ्यांना मोफत बी-बियाणे व खतांचे वाटप नुकतेच करण्यात आले. गेल्या दोन-तीन महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील शेती पिकांचे तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. सध्या खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असून, पैशांअभावी शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत डोंबिवली येथील या संस्थेने सुमारे ८० हजार रूपये किमतीचे बी-बियाणे, जैविक खते देऊन शेतकऱ्यांना आधार दिला आहे. घोगरेवाडीतील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात हा खत, बियाणे वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, तालुका कृषी विकास अधिकारी डी. आर. जाधव, प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब सावंत, कृषी पर्यवेक्षक बी. ए. पाटील, संस्थेचे अध्यक्ष केतन बोंदर, मंडळ कृषी अधिकारी ए. पी. चिक्षे आदी उपस्थित होते. यावेळी संस्थाध्यक्ष बोंदर यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून संस्थेने हा मदतीचा हात दिल्याचे सांगून गावकऱ्यांनी एकजुटीने काम करून गावचा विकास साधावा. आधुनिक तंत्र व मार्केटींगचा अभ्यास करूनच शेतीचे उत्पन्न घ्यावे असे सांगितले. प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी जाधव यांनी केले. कार्यक्रमास विवेकानंद संस्थेचे उपाध्यक्ष रवी वारंग, कोषाध्यक्ष शैलेश निपुलग आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक के. जी. सुरवसे यांनी केले तर चिक्षे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)मॉडेल गाव बनवूयावेळी बोलताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी घोगरेवाडी गाव मॉडेल गाव करून या गावच्या शेतीच्या विकास कार्यात सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले. शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करणाऱ्यांवर भर द्यावा. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या संपर्कात राहून शेतीचे नवनवीन तंत्रज्ञात आत्मसात करून आपला आर्थिक विकास साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.