शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

वर्षभरात साडेचार हजारांवर गर्भपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 23:24 IST

शहरात अवैध गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपात करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाल्यानंतर एक-एक धागेदोरे मनपा आणि पोलिसांच्या हाती लागत आहे. गर्भलिंग निदान केल्यानंतर अवैध गर्भपात करणाºयांचा शोध घेण्यात येत आहे. एकीकडे ही परिस्थिती आहे, तर दुसरीकडे शहरात नोंदणीकृत केंद्रांवर वर्षभरात सुमारे साडेचार हजारांवर गर्भपात झाल्याची माहिती समोर आली.

ठळक मुद्देधक्कादायक : ‘अवैध’च्या शोधाबरोबर अधिकृत केंद्रेही निशाण्यावर येण्याची शक्यता

औरंगाबाद : शहरात अवैध गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपात करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाल्यानंतर एक-एक धागेदोरे मनपा आणि पोलिसांच्या हाती लागत आहे. गर्भलिंग निदान केल्यानंतर अवैध गर्भपात करणाºयांचा शोध घेण्यात येत आहे. एकीकडे ही परिस्थिती आहे, तर दुसरीकडे शहरात नोंदणीकृत केंद्रांवर वर्षभरात सुमारे साडेचार हजारांवर गर्भपात झाल्याची माहिती समोर आली.महापालिका आणि पोलिसांनी शहरात २२ जानेवारी रोजी अवैध गर्भलिंग निदान करणाºया डॉक्टरांची टोळी जेरबंद केली. या प्रकरणात आतापर्यंत ९ जणांना अटक झाली आहे. यात चार डॉक्टर, तीन नातेवाईक आणि एका लॅब टेक्निशियनचा समावेश आहे. कायद्यानुसार काही कारणांमुळे गर्भपात करता येतो. याचा फायदा घेऊन गर्भलिंग निदानानंतर संबंधित महिलेला गर्भपातासाठी अवैध गर्भपात करणाºया ठिकाणांबरोबर टोळीने नोंदणीकृत केंद्रांवरही पाठविल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे अवैध गर्भपात करणाºयांचा शोध घेण्याबरोबर नोंदणीकृत केंद्रांचीही झाडाझडती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.शहरात १४३ नोंदणीकृत गर्भपात केंद्र आहेत. याठिकाणी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नियमितपणे तपासणी केली जाते. गर्भधारणेनंतर काही कारणांमुळे महिलेला गर्भपात करण्याचा अधिकार आहे. त्यासाठी नियमानुसार अर्ज आणि आवश्यक प्रक्रिया करून २० आठवड्यांपर्यंतचा गर्भपात करता येतो. यामध्ये उपलब्ध सोयीसुविधांनुसार काही केंद्रांना १२ आठवड्यांपर्यंतचे तर काही केंद्रांना २० आठवड्यांपर्यंतचे गर्भपात करण्याची परवानगी आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार वर्षभरात नोंदणीकृत सुमारे साडेचार हजार गर्भपात करण्यात आलेले आहे.गर्भपाताची ही आहेत कारणेमहिलेची मानसिक आणि सामाजिक परिस्थिती योग्य नसेल, आधी मुले असल्याने होणाºया नव्या बाळाचा सांभाळ अशक्य होणार असेल, गर्भनिरोध साधनांचा वापर करूनही गर्भ राहिल्यास गर्भपात केला जातो. याबरोबरच एखाद्या आजारपणात गर्भधारणा झाली आणि त्यामुळे आईच्या जिवावर बेतत असेल, तर गर्भपात करता येतो. अत्याचारामुळे गर्भ राहिलेला असेल, अशावेळी गर्भपात केला जातो. या सर्व कारणांमुळे कायदेशीररीत्या गर्भपात करता येत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. एकट्या घाटीत वर्षभरात १ हजार ३०० गर्भपात झाले आहेत.आणखी किती डॉक्टर?चार डॉक्टर जेरबंद झाल्यानंतर गर्भलिंग निदान करणाºया टोळीत आणखी किती डॉक्टर सहभागी आहे, असा प्रश्न जनसामान्यांतून विचारला जात आहे.दोन वर्षांपूर्वी झाडाझडतीमार्च २०१७ मध्ये सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ गावी बेकायदेशीर गर्भपाताची घटना उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यातील सर्व रुग्णालये, सोनोग्राफी सेंटर तसेच शासनमान्य गर्भपात कें द्रांची झाडाझडती घेण्यात आली होती. गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायद्यांतर्गत जिल्ह्यात कोणत्याही नोंदणीकृत, अनोंदणीकृत केंद्रांतील डॉक्टर किंवा अन्य कोणीही कायद्याचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता; परंतु या मोहिमेतून काहीही साध्य झालेले नसल्याची परिस्थिती अवैध गर्भलिंग निदान करणाºया टोळीमुळे समोर आले आहे.डॉक्टरांकडून पडताळणीनोंदणीकृत केंद्रांवर गर्भपात करण्यापूर्वी डॉक्टरांकडून पडताळणी केली जाते. गर्भपात नेमके कोणत्या कारणांमुळे आणि का करत आहे, हे पाहिले जाते. नोंदणीकृत केंद्रांसंदर्भात नियमित तपासणी केली जाते. गर्भलिंग निदान करणाºया टोळीत आणखी किती जण सहभागी आहेत, हे सध्यातरी सांगता येणार नाही. एक एक बाब समोर येत आहे. गर्भलिंग निदान कायद्यांतर्गत हे प्रकरण न्यायालयात दाखल करण्याची तयारी सुरूआहे.-डॉ. नीता पाडळकर,आरोग्य अधिकारी, मनपा

टॅग्स :Abortionगर्भपातAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी