शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

वर्षभरात साडेचार हजारांवर गर्भपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 23:24 IST

शहरात अवैध गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपात करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाल्यानंतर एक-एक धागेदोरे मनपा आणि पोलिसांच्या हाती लागत आहे. गर्भलिंग निदान केल्यानंतर अवैध गर्भपात करणाºयांचा शोध घेण्यात येत आहे. एकीकडे ही परिस्थिती आहे, तर दुसरीकडे शहरात नोंदणीकृत केंद्रांवर वर्षभरात सुमारे साडेचार हजारांवर गर्भपात झाल्याची माहिती समोर आली.

ठळक मुद्देधक्कादायक : ‘अवैध’च्या शोधाबरोबर अधिकृत केंद्रेही निशाण्यावर येण्याची शक्यता

औरंगाबाद : शहरात अवैध गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपात करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाल्यानंतर एक-एक धागेदोरे मनपा आणि पोलिसांच्या हाती लागत आहे. गर्भलिंग निदान केल्यानंतर अवैध गर्भपात करणाºयांचा शोध घेण्यात येत आहे. एकीकडे ही परिस्थिती आहे, तर दुसरीकडे शहरात नोंदणीकृत केंद्रांवर वर्षभरात सुमारे साडेचार हजारांवर गर्भपात झाल्याची माहिती समोर आली.महापालिका आणि पोलिसांनी शहरात २२ जानेवारी रोजी अवैध गर्भलिंग निदान करणाºया डॉक्टरांची टोळी जेरबंद केली. या प्रकरणात आतापर्यंत ९ जणांना अटक झाली आहे. यात चार डॉक्टर, तीन नातेवाईक आणि एका लॅब टेक्निशियनचा समावेश आहे. कायद्यानुसार काही कारणांमुळे गर्भपात करता येतो. याचा फायदा घेऊन गर्भलिंग निदानानंतर संबंधित महिलेला गर्भपातासाठी अवैध गर्भपात करणाºया ठिकाणांबरोबर टोळीने नोंदणीकृत केंद्रांवरही पाठविल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे अवैध गर्भपात करणाºयांचा शोध घेण्याबरोबर नोंदणीकृत केंद्रांचीही झाडाझडती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.शहरात १४३ नोंदणीकृत गर्भपात केंद्र आहेत. याठिकाणी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नियमितपणे तपासणी केली जाते. गर्भधारणेनंतर काही कारणांमुळे महिलेला गर्भपात करण्याचा अधिकार आहे. त्यासाठी नियमानुसार अर्ज आणि आवश्यक प्रक्रिया करून २० आठवड्यांपर्यंतचा गर्भपात करता येतो. यामध्ये उपलब्ध सोयीसुविधांनुसार काही केंद्रांना १२ आठवड्यांपर्यंतचे तर काही केंद्रांना २० आठवड्यांपर्यंतचे गर्भपात करण्याची परवानगी आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार वर्षभरात नोंदणीकृत सुमारे साडेचार हजार गर्भपात करण्यात आलेले आहे.गर्भपाताची ही आहेत कारणेमहिलेची मानसिक आणि सामाजिक परिस्थिती योग्य नसेल, आधी मुले असल्याने होणाºया नव्या बाळाचा सांभाळ अशक्य होणार असेल, गर्भनिरोध साधनांचा वापर करूनही गर्भ राहिल्यास गर्भपात केला जातो. याबरोबरच एखाद्या आजारपणात गर्भधारणा झाली आणि त्यामुळे आईच्या जिवावर बेतत असेल, तर गर्भपात करता येतो. अत्याचारामुळे गर्भ राहिलेला असेल, अशावेळी गर्भपात केला जातो. या सर्व कारणांमुळे कायदेशीररीत्या गर्भपात करता येत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. एकट्या घाटीत वर्षभरात १ हजार ३०० गर्भपात झाले आहेत.आणखी किती डॉक्टर?चार डॉक्टर जेरबंद झाल्यानंतर गर्भलिंग निदान करणाºया टोळीत आणखी किती डॉक्टर सहभागी आहे, असा प्रश्न जनसामान्यांतून विचारला जात आहे.दोन वर्षांपूर्वी झाडाझडतीमार्च २०१७ मध्ये सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ गावी बेकायदेशीर गर्भपाताची घटना उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यातील सर्व रुग्णालये, सोनोग्राफी सेंटर तसेच शासनमान्य गर्भपात कें द्रांची झाडाझडती घेण्यात आली होती. गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायद्यांतर्गत जिल्ह्यात कोणत्याही नोंदणीकृत, अनोंदणीकृत केंद्रांतील डॉक्टर किंवा अन्य कोणीही कायद्याचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता; परंतु या मोहिमेतून काहीही साध्य झालेले नसल्याची परिस्थिती अवैध गर्भलिंग निदान करणाºया टोळीमुळे समोर आले आहे.डॉक्टरांकडून पडताळणीनोंदणीकृत केंद्रांवर गर्भपात करण्यापूर्वी डॉक्टरांकडून पडताळणी केली जाते. गर्भपात नेमके कोणत्या कारणांमुळे आणि का करत आहे, हे पाहिले जाते. नोंदणीकृत केंद्रांसंदर्भात नियमित तपासणी केली जाते. गर्भलिंग निदान करणाºया टोळीत आणखी किती जण सहभागी आहेत, हे सध्यातरी सांगता येणार नाही. एक एक बाब समोर येत आहे. गर्भलिंग निदान कायद्यांतर्गत हे प्रकरण न्यायालयात दाखल करण्याची तयारी सुरूआहे.-डॉ. नीता पाडळकर,आरोग्य अधिकारी, मनपा

टॅग्स :Abortionगर्भपातAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी