शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

HSC Result : औरंगाबाद विभागात जालन्याची बाजी; बीड दुसऱ्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 4:17 PM

उत्तीर्णतेच्या टक्केवारीत मुलींची आघाडी कायम

ठळक मुद्देविभागाचा निकाल ८८.१८ टक्के राज्याचा एकूण निकाल ९०.६६ टक्के

औरंगाबाद :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यात औरंगाबाद विभागात जालना जिल्ह्याचा निकाल ९०.७२ टक्के एवढा लागला आहे. तर दुसऱ्या स्थानी बीड जिल्हा राहिला असून, ८८.८३ टक्के निकाल लागला आहे. विभागात उत्तीर्णतेत यावर्षीही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.१३ टक्के असून, मुलाची ८५.६६ टक्के एवढी आहे. 

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या निकालात राज्याचा एकूण निकाल ९०.६६ टक्के लागला आहे. कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक ९५.८९ टक्के लागला आहे तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी ८८.१८ टक्के आहे. मागील वर्षीच्या तुलनेत निकाल ४.७८ टक्क्यांनी वाढला आहे. 

बारावी परीक्षेचा निकालाची अनेक विद्यार्थी अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत होते. त्यात सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा केल्या जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु आता अखेर विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे. परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेली बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान घेण्यात आली होती. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कोरोना महामारी मुळे यावर्षी निकाल लावण्यासाठी विलंब झाला आहे.

औरंगाबाद विभागाचा निकाल ८८.१८ टक्के लागला असून विभागातील ४०६ परीक्षा केंद्रावर बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. सदरील परीक्षेला विभागातील औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली असे एकूण विभागातून १ लाख ६४ हजार ७३०विद्यार्थ्यांनी परीक्षेला नोंद केली होती. त्यात १लाख ६३ हजार ७३८ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १ लाख ४४ हजार ३७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. औरंगाबाद जिल्ह्याचा निकाल ८७.७६ टक्के लागला. तर जालना जिल्ह्यातुन २९ हजार ६३७ विद्यार्थ्यांनी नोंद केली होती. त्यापैकी २९ हजार ५४५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तर त्यापैकी २६ हजार ८०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर जालना जिल्ह्याचा निकाल ९०.७२ टक्के लागला.

तसेच बीड जिल्ह्यातील ३९ हजार १५६ विद्यार्थ्यांपैकी ३८ हजार ८८६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर त्यापैकी ३४ हजार ५४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर बीड जिल्ह्याचा निकाल ८८.८३ टक्के लागला. तसेच परभणी जिल्ह्यातील एकूण २३ हजार १३४ विद्यार्थ्यांपैकी २२ हजार ८४९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १९ हजार ३४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण परभणी जिल्ह्याचा निकाल ८४.६६% लागला. याशिवाय हिंगोली जिल्ह्यातून १२ हजार ४०५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १२ हजार २८० विद्यार्थी परीक्षेला बसले. तर त्यात १० हजार ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर एकूण हिंगोली जिल्ह्याचा निकाल ८८.५४ % एवढा लागला लागला. 

मुलींची यशाची परंपरा कायमऔरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड असे एकूण विभागात बारावी परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. विभागातून ९२.१३ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. तर मुलांचे प्रमाण हे ८५.६६ टक्के लागला आहे. त्यामुळे यंदा मुलींचीच बाजी मारली आहे.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थी