शहरं
Join us  
Trending Stories
1
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
2
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल महागणार? आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले दरवाढीचे संकेत
3
Delhi Gangrape: दिल्ली हादरली! धावत्या बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक
4
बीजिंगमध्ये ट्रम्प-शी जिनपिंग यांची ऐतिहासिक भेट; द्विपक्षीय चर्चा सुरू, या मुद्द्यांवर होणार चर्चा
5
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
6
Prateek Yadav: प्रतीक यादव यांच्या मृत्यूच्या २४ तास आधी नेमकं काय घडलं? महत्त्वाची माहिती समोर!
7
CNG Price Hike: महागाईचा झटका! मुंबईत सीएनजीची दरवाढ, पाहा काय आहे नवी किंमत?
8
इमरान खान यांच्या पहिल्या पत्नी जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत रिलेशनशिपमध्ये
9
मोठी बातमी! LPG आणणाऱ्या 'एमव्ही सनशाईन' जहाजाने पार केले होर्मुझ, नौदलाचे कडेकोट संरक्षण
10
भरघोस पगारासह देशसेवेची संधी! भारतीय वायुसेनेची भरती जाहीर; जाणून घ्या महत्वाच्या तारखा...
11
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
12
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
13
अग्रलेख: सोने घ्यावे की न घ्यावे? निर्णय घेण्याची वेळ आली आहे
14
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
15
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
16
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
17
विशेष लेख: पावसाचा अंदाज सुधारण्याची शक्यता आहे!
18
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
19
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
20
Sindhudurg: ‘ती’ अखेरची क्लिक ठरली जीवघेणी; हसत्या-खेळत्या तिघींचा धरणात करुण अंत!
Daily Top 2Weekly Top 5

घोडके यांनी जिद्दीने केली अपंगत्वावर मात

By admin | Updated: December 3, 2014 01:15 IST

गजानन वानखडे , जालना ‘हे ज्ञानाची पवित्रता.. ज्ञानाची हाती’ असे ज्ञानेश्वरीत म्हटल्याप्रमाणे ज्ञानासारखे ज्ञानच पवित्र आहे, असा वसा घेत वयाच्या पाचव्या वर्षांपासून


गजानन वानखडे , जालना
‘हे ज्ञानाची पवित्रता.. ज्ञानाची हाती’ असे ज्ञानेश्वरीत म्हटल्याप्रमाणे ज्ञानासारखे ज्ञानच पवित्र आहे, असा वसा घेत वयाच्या पाचव्या वर्षांपासून आलेल्या अपंगत्वाला न डगमगता जिद्दीने मात करत गेल्या तीस वर्षांपासून शहरात ट्यूशन्स घेवून संसाराचा गाडा हाकत आहेत. शहरातील चंद्रकात कडूबा घोडके हे अपंगव्यक्तीसाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे.
औरंगाबाद जिल्हातील दुधड येथील चंद्रकांत घोडके मामाकडे शिकायला शहरात आले . येथेच स्थायिक झाले. औरंगाबाद येथे बीकॉम झाल्यानंतर नौकरी करण्यापेक्षा मुलांना शिकवून आपण आपला संसार सुरू केला. आजही घोडके हे अपंगांना मिळणारा कोणताही शासकीय लाभ घेत नाहीत. गेल्या तीस वर्षांत त्यांच्या क्लासमधून अनेक डॉक्टर्स, इंजिनिअर, विविध क्लासवन अधिकारी तयार केल्याने मला समाधान आहे. सर्वसामान्य माणूस जे सुख भोगत असतो, त्याहीपेक्षा कितीतरी पट मी माझ्या जीवनात सुख मिळविले आहे. पैसा तर कमावलाच. त्यापेक्षा माजी विद्यार्थी मला आदराने ओळख देतात त्याचे मला जास्त समाधान आहे. ४० हजार विद्यार्थ्यांना शिकवून ते आपल्या पायावर उभे आहेत.
आपल्याला आलेल्या अपंगत्वाचे केव्हाही वाईट न वाटत सतत मेहनतीवर भर दिल्यास तुम्ही जीवनात काहीपण मिळवू शकता, असा ठाम विश्वास घोडके यांनी व्यक्त केला. यात माझ्या पत्नीने मला पावलोपावली साथ दिल्यानेच मी इथपर्यंत पोहोचलो आहे. मला दोन मुले, एक मुलगी आहे. बायकोने कोणतीही तक्रार न करता ती कायम माझ्या पाठीशी उभी राहिली. त्यामुळे मला मुलांवर जास्त लक्ष देण्याची गरज पडली नाही. आजही आमचे नाते पती-पत्नीचे नसून एक मित्रत्वाचे आहे. वयाची ५५ वर्षी पूर्ण केली आता माझा मोठा मुलगा अंबड येथे क्लास घेतोय. ज्ञानानेच मला सर्व काही दिले .त्यामुळे तुम्ही अपंग आहात हे गौण गोष्ट आहे. मेहनत कराल तर तुम्हाला सर्व काही मिळते.४
घनसावंगी तालुक्यातील विठ्ठल भास्कर चव्हाण हे जन्मताच अपंग आहेत. गावात काहीच काम करता येत नसल्याने अंगात जिद्द असल्याने गेल्या दीड वर्षापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पानाची छोटीशी टपरी टाकून आपला संसार चालवत आहेत. त्यांना दोन मुली एक मुलगा आहे.तिन्ही मुलांना चांगल्या शाळेत शिकवित आहे. काम असते अपंगव्यक्तीने रडत बसण्यापेक्षा मेहनत करावी, असे चव्हाण यांनी सांगितले. दैवाला दोष न देता ज्या परिस्थितीत आपल्याला जन्मला घातले, त्याला स्वीकारून पुढे जावे, असे चव्हाण धैर्याने सांगतात.