शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

‘मराठवाडा मुक्ती संग्रामाचा आणि विकास आंदोलनाचा इतिहास नव्याने लिहिण्याची गरज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:17 IST

औरंगाबाद : मराठवाडा मुक्ती संग्रामाचा आणि मराठवाडा विकास आंदोलनाचा इतिहास नीटपणाने लिहिला गेला नाही. भावी पिढीला हा इतिहास माहीत ...

औरंगाबाद : मराठवाडा मुक्ती संग्रामाचा आणि मराठवाडा विकास आंदोलनाचा इतिहास नीटपणाने लिहिला गेला नाही. भावी पिढीला हा इतिहास माहीत होणे गरजेचे आहे. म्हणून तो नव्याने लिहिण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मान्यवरांनी क्रांतिवीर दत्तोबा भोसले-मातोळकर यांच्या सुधारित स्मृतिग्रंथाच्या प्रकाशन समारंभात केले.

शिवछत्रपती महाविद्यालयाच्या सभागृहात हा सोहळा पार पडला.

ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा.रं. बोराडे, मानसिंग पवार, ज्येष्ठ विधिज्ञ शशिकुमार चौधरी यांची यावेळी भाषणे झाली. क्रांतिवीर दत्तोबा भोसले-मातोळकर यांच्या शौर्याच्या आणि त्यांच्या पुरोगामित्वाच्या अनेक कथा सांगत या सर्वांनी हा इतिहास नीट लिहिला गेला नसल्याची खंत व्यक्त केली. स.भु. शिक्षण संस्थेने मराठवाडा मुक्ती संग्रामाचा आणि मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने मराठवाडा विकास आंदोलनाचा इतिहास लिहिण्याकामी पुढाकार घ्यावा, अशी सूचना मानसिंग पवार यांनी केली.

स.भु. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राम भोगले आणि मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आमदार सतीश चव्हाण यांची मंचावर उपस्थिती होती. या दोघांनी ही जबाबदारी स्वीकारावी, असा मानसिंग पवार यांचा आग्रह होता.

दत्तोबा भोसले आणि त्यांच्यासारख्या क्रांतिवीरांच्या इतिहासाकडे पाठ करून चाललोय. हे कृतघ्नपणाचे लक्षण होय, असे मत रा.रं. बोराडे यांनी व्यक्त केले.

माजी खासदार उत्तमसिंग पवार, माजी राज्यमंत्री अनिल पटेल, किशोर शितोळे, बाबा भांड, प्रताप बोराडे, पद्माकर मुळे, प्रा.विजय‌ पाथ्रीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अच्युत भोसले, सुरेश कुटे, चंद्रशेखर जाधव, पृथ्वीराज भोसले, रोहन काकडे, रमेश कुटे, मुरलीधर बनसोडे आदींनी पाहुण्यांचे स्वागत केले.

कादंबरी भोसले, अनुजा भोसले, तनुजा भोसले, कुमुदिनी भोसले, श्रेया भोसले, अरविंद भोसले, तन्मय भोसले आदींचा सत्कार यावेळी करण्यात आला.

समाजाची म्हणून काही जबाबदारी आहे की नाही?

दत्तोबा भोसले हे पुरोगामी होते. निजामास त्यांनी सळो की पळो करून सोडले होते. त्यांना पकडण्यासाठी लाखो रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली होती. इतिहास, साहित्य, बहुजन समाज आणि मराठवाडा यात तारतम्य नाही. दत्तोबा भोसले, काकासाहेब देशमुख, दगडाबाई शेळके यांच्यासारखे लढवय्ये या लढ्यात होते म्हणून हा लढा यशस्वी झाला. हा इतिहास त्यांच्या कुटुंबीयांनीच सांगितला पाहिजे का? समाजाची म्हणून काही जबाबदारी आहे की नाही, असा सवाल यावेळी वक्त्यांनी उपस्थित केला.

प्रा.विजय चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. सरोजिनी पंडित यांनी सूत्रसंचालन केले. विवेक भोसले यांनी आभार मानले.