शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’च्या बातमीची हायकोर्टाकडून दखल; वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात वृत्ताची ‘सुमोटो याचिका’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 13:45 IST

वृक्षतोडीसंदर्भात वन विकास महामंडळाने दि. २ फेब्रुवारीपर्यंत शपथपत्राद्वारे  उत्तर दाखल करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर: किनवटच्या जंगलांमधील वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचे नुकसान होत असून, मौल्यवान सागवान आणि इतर औषधी वनस्पतींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. इतकेच नव्हे तर वृक्षतोडीमुळे वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात आला आहे, अशा आशयाची बातमी ‘लोकमत’ने दि. १८ जानेवारी रोजी छापली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. हितेन वेणेगावकर यांनी त्या बातमीची स्वत:हून दखल घेत त्या बातमीलाच ‘सुमोटो जनहित याचिका’ म्हणून सोमवारी दाखल करून घेतले.

वृक्षतोडीसंदर्भात वन विकास महामंडळाने दि. २ फेब्रुवारीपर्यंत शपथपत्राद्वारे  उत्तर दाखल करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. ॲड. मुकुल कुलकर्णी यांची न्यायालयाचे मित्र (अमीकस क्युरी) म्हणून खंडपीठाने नेमणूक केली आहे. 

किनवट तालुक्यातील घनदाट जंगलांमध्ये वन विकास महामंडळाकडून ‘विरळणी’  आणि ‘ओडब्ल्यूआर’ प्रकल्पांच्या नावाखाली अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरू आहे. जंगलतोडीचा सर्वाधिक परिणाम वन्य जीवांवर झाला आहे. प्राणी आणि पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट झाले आहेत. अधिवास, अन्न आणि पाण्याच्या कमतरतेमुळे बिबट्या, अस्वल आणि रानडुक्कर यांसारखे वन्यप्राणी आता मानवी वस्तीकडे वळत आहेत. त्यामुळे  ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. असे ‘लोकमत’च्या बातमीत म्हटले आहे.

केंद्र शासनाकडे पाठविला परवानगीचा प्रस्ताव

  • जंगलातील जुनी, आजारी आणि आयुष्य संपलेली झाडे केंद्र शासनाच्या परवानगीने तोडली जातात. तोडलेल्या वृक्षांऐवजी नवीन झाडे लावली जातात.
  • किनवटमधील वृक्षतोडीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर केला असल्याचे मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी खंडपीठास सांगितले.
English
हिंदी सारांश
Web Title : High Court Acts on Lokmat Report: Wildlife Threatened, Petition Filed

Web Summary : The High Court took suo moto cognizance of a Lokmat report highlighting deforestation in Kinwat forests endangering wildlife. The court sought a response from the Forest Development Corporation and appointed an amicus curiae. Deforestation has led to habitat loss, pushing animals into human settlements.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरHigh Courtउच्च न्यायालयwildlifeवन्यजीव