शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

औरंगाबादेत कचऱ्याच्या धुराने दम्याच्या रुग्णांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 17:18 IST

शहरातील कचराकोंडीमुळे गेले काही दिवस कचरा जाळण्याच्या उद्योगाने शहरात दम्याच्या रुग्णांत दीडपट वाढ झाल्याचे तज्ज्ञांनी जागतिक दमा दिनानिमित्त स्पष्ट केले.

ठळक मुद्दे: अनुवंशिकता, वायू प्रदूषण, अ‍ॅलजी, ताणतणावसह अन्य कारणांनी १०० व्यक्तींमागे १० लोकांमध्ये दमा आढळतो.. दम्याचे प्रमाण दहा टक्क्यांपर्यंत येऊन ठेपले आहे.

औरंगाबाद : अनुवंशिकता, वायू प्रदूषण, अ‍ॅलजी, ताणतणावसह अन्य कारणांनी १०० व्यक्तींमागे १० लोकांमध्ये दमा आढळतो. दम्याचे प्रमाण दहा टक्क्यांपर्यंत येऊन ठेपले आहे. शहरातील कचराकोंडीमुळे गेले काही दिवस कचरा जाळण्याच्या उद्योगाने शहरात दम्याच्या रुग्णांत दीडपट वाढ झाल्याचे तज्ज्ञांनी जागतिक दमा दिनानिमित्त स्पष्ट केले.

दम्याविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिन साजरा करण्यात येतो. यंदा १ मे रोजी हा दिवस साजरा करण्यात येत आहे. ‘प्रत्येक श्वासाबरोबर दम्याला दूर करूया,’ असे यंदाचे घोषवाक्य आहे. दमा (अस्थमा) हा श्वसननलिकेचा आजार आहे. हा आजार सहा महिन्यांच्या बालकापासून ते ६० वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठांमध्येही आढळतो. जास्त काळ खोकला येणे, छातीत खफ होणे, श्वास घेताना शिट्टी वाजल्यासारखा आवाज येणे ही काही लक्षणे आहेत. थंड हवामान, वायू प्रदूषण, धूम्रपान अथवा धूम्रपान करणाऱ्यांच्या सान्निध्यात येणे, धूळ, धुराची अ‍ॅलर्जी, अनुवंशिकता, लठ्ठपणा अशी काही दमा होण्याची कारणे आहेत. या आजाराविषयी अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे लोकांमध्ये जनजागृती होण्याची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.

रुग्णालयात वाढली गर्दीशहरात गेले काही दिवस प्रत्येक भागामध्ये दिवस-रात्र कचरा जाळण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे प्रदूषणात तर भर पडली; परंतु सोबतच दम्याच्या रुग्णांमध्ये कमालीची वाढ झाली. कचराकोंडीपूर्वी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या आणि     कचराक ोंडीनंतरची संख्या पाहता त्यात दीडपटीने वाढ झाल्याचे दमा विकारतज्ज्ञांनी सांगितले.

कचऱ्याचा परिणामविविध कारणांसह कायम वायू प्रदूषणाच्या वातावरणात राहिल्याने दमा होतो. कचरा जाळण्यामुळे गेले काही दिवस दम्याच्या रुग्णांत दीडपटीने वाढ झाली. आजारासंदर्भात वेळीच खबरदारी घेणे आवश्यक ठरते.- डॉ. सुहास बर्दापूरकर

जनजागृतीची गरजदम्याच्या आजाराविषयी अधिक जनजागृती होणे गरजेचे आहे. हा आजार होऊ नये, यासाठी लहान मुलांचे वेळच्या वेळी लसीकरण करणे, धूम्रपान न करणे, रात्री जागरण न करणे यासह अनेक प्रतिबंधात्मक उपाय करता येतात.- डॉ. बालाजी बिरादार

टॅग्स :Healthआरोग्यGarbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका