शहरं
Join us  
Trending Stories
1
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
2
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
3
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
4
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
5
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
6
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
7
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
9
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
10
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
11
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
12
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
13
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
14
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
15
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
16
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
17
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
18
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
19
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत कचऱ्याच्या धुराने दम्याच्या रुग्णांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 17:18 IST

शहरातील कचराकोंडीमुळे गेले काही दिवस कचरा जाळण्याच्या उद्योगाने शहरात दम्याच्या रुग्णांत दीडपट वाढ झाल्याचे तज्ज्ञांनी जागतिक दमा दिनानिमित्त स्पष्ट केले.

ठळक मुद्दे: अनुवंशिकता, वायू प्रदूषण, अ‍ॅलजी, ताणतणावसह अन्य कारणांनी १०० व्यक्तींमागे १० लोकांमध्ये दमा आढळतो.. दम्याचे प्रमाण दहा टक्क्यांपर्यंत येऊन ठेपले आहे.

औरंगाबाद : अनुवंशिकता, वायू प्रदूषण, अ‍ॅलजी, ताणतणावसह अन्य कारणांनी १०० व्यक्तींमागे १० लोकांमध्ये दमा आढळतो. दम्याचे प्रमाण दहा टक्क्यांपर्यंत येऊन ठेपले आहे. शहरातील कचराकोंडीमुळे गेले काही दिवस कचरा जाळण्याच्या उद्योगाने शहरात दम्याच्या रुग्णांत दीडपट वाढ झाल्याचे तज्ज्ञांनी जागतिक दमा दिनानिमित्त स्पष्ट केले.

दम्याविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिन साजरा करण्यात येतो. यंदा १ मे रोजी हा दिवस साजरा करण्यात येत आहे. ‘प्रत्येक श्वासाबरोबर दम्याला दूर करूया,’ असे यंदाचे घोषवाक्य आहे. दमा (अस्थमा) हा श्वसननलिकेचा आजार आहे. हा आजार सहा महिन्यांच्या बालकापासून ते ६० वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठांमध्येही आढळतो. जास्त काळ खोकला येणे, छातीत खफ होणे, श्वास घेताना शिट्टी वाजल्यासारखा आवाज येणे ही काही लक्षणे आहेत. थंड हवामान, वायू प्रदूषण, धूम्रपान अथवा धूम्रपान करणाऱ्यांच्या सान्निध्यात येणे, धूळ, धुराची अ‍ॅलर्जी, अनुवंशिकता, लठ्ठपणा अशी काही दमा होण्याची कारणे आहेत. या आजाराविषयी अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे लोकांमध्ये जनजागृती होण्याची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.

रुग्णालयात वाढली गर्दीशहरात गेले काही दिवस प्रत्येक भागामध्ये दिवस-रात्र कचरा जाळण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे प्रदूषणात तर भर पडली; परंतु सोबतच दम्याच्या रुग्णांमध्ये कमालीची वाढ झाली. कचराकोंडीपूर्वी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या आणि     कचराक ोंडीनंतरची संख्या पाहता त्यात दीडपटीने वाढ झाल्याचे दमा विकारतज्ज्ञांनी सांगितले.

कचऱ्याचा परिणामविविध कारणांसह कायम वायू प्रदूषणाच्या वातावरणात राहिल्याने दमा होतो. कचरा जाळण्यामुळे गेले काही दिवस दम्याच्या रुग्णांत दीडपटीने वाढ झाली. आजारासंदर्भात वेळीच खबरदारी घेणे आवश्यक ठरते.- डॉ. सुहास बर्दापूरकर

जनजागृतीची गरजदम्याच्या आजाराविषयी अधिक जनजागृती होणे गरजेचे आहे. हा आजार होऊ नये, यासाठी लहान मुलांचे वेळच्या वेळी लसीकरण करणे, धूम्रपान न करणे, रात्री जागरण न करणे यासह अनेक प्रतिबंधात्मक उपाय करता येतात.- डॉ. बालाजी बिरादार

टॅग्स :Healthआरोग्यGarbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका