शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त गावांमुळे ग्रामसेवकांवर ताण !

By admin | Updated: July 1, 2014 01:03 IST

विठ्ठल कटके , रेणापूर रेणापूर तालुक्यात ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांची चार पदे रिक्त असून, एकेका ग्रामसेवकाला तीन-तीन गावांचा पदभार दिल्यामुळे त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे.

विठ्ठल कटके , रेणापूररेणापूर तालुक्यात ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांची चार पदे रिक्त असून, एकेका ग्रामसेवकाला तीन-तीन गावांचा पदभार दिल्यामुळे त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. तर काही ग्रामसेवक दहा-दहा वर्षांपासून नेमणुकीच्या ठिकाणीच कार्यरत आहेत.रेणापूर तालुक्यात एकूण ६६ ग्रामपंचायती असून, ४२ सज्जे आहेत. रेणापूर, पोहरेगाव, कोष्टगाव, कारेपूर या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी तर उर्वरित ग्रामपंचायतींवर ग्रामसेवक ग्रामपंचायतींचे दैनंदिन काम पाहतात. एकूण ३६ ग्रामसेवक सहा ग्रामविकास अधिकाऱ्यांमध्ये २२ पुरुष तर ११ महिला कर्मचारी आहेत. ६६ ग्रामपंचायतीला ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवकांची ६६ पदे असणे गरजेचे असताना केवळ ४२ कार्यरत आहेत. एक ग्रामविकास अधिकारी व तीन ग्रामसेवकांची पदे रिक्त आहेत. ३३ ग्रामसेवकांना दोन ते तीन गावांचा कारभार सांभाळावा लागतो. जर एखादा ग्रामसेवक रजेवर गेला, तर त्याही गावाचा कारभार अतिरिक्त दिला जातो. त्यामुळे कोणत्या ग्रामपंचायतीकडे कधी हजर रहायचे, यासाठी त्या ग्रामसेवकाला वार ठरवून घ्यावा लागतो. त्यामुळे गावातील दैनंदिन कामांना पर्यायाने दिरंगाई होते. एखाद्या व्यक्तीला एखाद्या प्रमाणपत्राची तातडीची गरज असेल, तेव्हा त्यांची मोठी अडचण होते. ठरलेल्या दिवसाची प्रतीक्षाच नागरिकांना करावी लागते. शिवाय, दोन-तीन गावांचा एका कर्मचाऱ्यावर अतिरिक्त भार पडल्यामुळे तो कर्मचारी त्रासून जातो. त्याने कोणत्या गावी वास्तव्य करावे, हाही त्याच्यासमोर प्रश्न उभा असतो.सेवाज्येष्ठतेचा नियम शिथिल करा...निवाडा-आंदलगावचे ग्रामसेवक ए.सी. उस्तुर्गे यांच्याकडे २२ डिसेंबर २००४ पासून याच गावचा पदभार आहे. त्यांच्याबाबत ग्रामस्थांकडून अनेक तक्रारी असतानाही त्यांची बदली होत नाही. तर दिवेगाव, माकेगाव, नरवटवाडीचे एस.ए. पवार, रामवाडीचे एस.व्ही. गुडे, तळणीचे राठोड हे ग्रामसेवकही आठ-आठ वर्षांपासून त्याच ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांनी जर विनंती अर्ज केला तरच त्यांची बदली होते, असे समजते. सेवाज्येष्ठता नियम बदलीसाठी आड येतो, असे सांगण्यात येते. त्यामुळे हा नियम शिथिल करावा, अशी मागणी सरपंचांकडून केली जात आहे.