शहरं
Join us  
Trending Stories
1
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
2
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
3
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
4
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर ST खोल खड्ड्यात कोसळली, २५ प्रवासी थोडक्यात बचावले
5
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
6
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
7
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
8
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
9
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
10
क्रिकेटरशी जोडलं नाव, आता करोडपती यूट्युबरची बायको होणार 'ही' अभिनेत्री? लग्नाची रंगली चर्चा
11
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
12
लोकसंख्या वाढीसाठी चंद्राबाबू नायडूं यांची मोठी घोषणा! तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी सुरू केली 'कॅश ऑफर' योजना! कारण काय?
13
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
14
Virat Kohli : किंग कोहलीचा विक्रमी धडाका! IPL इतिहासात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं
15
Mouni Roy : संसार मोडल्यावर मौनी रॉय आणि दिशा पाटनी रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या, व्हायरल पोस्टचं 'सत्य'
16
आयडियाची कल्पना! सूट-बूट घालून विकतोय फ्राईड राईस; दरमहा ७ लाखांची कमाई
17
पंतप्रधान मोदी यांचा ८ वर्षांनी स्वीडन दौरा; व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण मुद्द्यांवर चर्चा
18
Summer Tips: उन्हाळ्यात लोक टक्कल का करतात? जाणून घ्या त्यामागील आरोग्यदायी फायदे!
19
मुलीचं मौन म्हणजे 'कबूल है-कबूल है-कबूल है...!' अफगाणिस्तानात तालिबानची बालविवाहाला मंजूरी
20
Rahul Gandhi: "शिक्षणमंत्र्यांवर अजूनही कारवाई का नाही?" NEET पेपरफुटी प्रकरणावर राहुल गांधींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

आयआयएम औरंगाबादला द्या

By admin | Updated: July 18, 2014 01:54 IST

औरंगाबाद : इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंटची (आयआयएम) स्थापना औरंगाबादेत झाल्यास मराठवाडा मागास आहे या प्रतिमेतून बाहेर पडायला मदत होईल

औरंगाबाद : इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंटची (आयआयएम) स्थापना औरंगाबादेत झाल्यास मराठवाडा मागास आहे या प्रतिमेतून बाहेर पडायला मदत होईल व मोठ्या आर्थिक विकासाला चालना मिळेल, अशी आग्रही भूमिका शहरातील उद्योगपतींनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यासंदर्भात मदत करण्याचे आश्वासन दिले.
शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या पुढाकाराने चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चरच्या (सीएमआयए) शिष्टमंडळाची पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी गुरुवारी भेट झाली. सीएमआयएचे अध्यक्ष मुनीष शर्मा आणि मराठवाडा आॅटो क्लस्टरचे चेअरमन राम भोगले यांनी या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. आयआयएमची स्थापना रायपूर, रांची, उदयपूर यासारख्या टिअर टू शहरांमध्ये झाल्याचे शिष्टमंडळाने चव्हाण यांना सांगितले. केंद्र सरकारने महाराष्ट्रात आयआयएम स्थापन करण्याचे जाहीर केले असून महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था आणि संशोधन संघटना असलेले औरंगाबाद त्यासाठी आदर्श आहे, असे या उद्योगपतींचे म्हणणे होते.
आयआयएमला शिक्षक मिळविण्यात टिअर टू शहरांना अडचणींना तोंड द्यावे लागल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांना सांगितले. त्यावर उद्योगपतींनी गुवाहाटीत आयआयटीला प्रारंभी अशा अडचणी आल्याचे सांगताना आज गुवाहाटी आयआयटी देशात पहिल्या पाचात असल्याचे आवर्जून सांगितले.
आयआयएमसारख्या महत्त्वाच्या संस्था जोपर्यंत औरंगाबादेत सुरू होत नाहीत तोपर्यंत मराठवाडा मागास आहे ही मानसिक ठेवण बदलणार नाही, असे या शिष्टमंडळाने ठासून सांगितले. आयआयएमसाठी पुण्याचेही नाव चर्चेत आहे. तथापि, पुणे शहरात सध्याच प्रतिष्ठेचे म्हणता येतील, असे अनेक प्रकल्प असून आयआयएममुळे त्याला तसा कोणताही फायदा होणार नाही; परंतु आयआयएममुळे औरंगाबादच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल, असे ते म्हणाले. मराठवाड्याच्या संतुलित विकासासाठी औरंगाबादेत आयआयएम सुरू होणे उपयुक्त ठरले, असा शिष्टमंडळाचा आग्रह होता.
औरंगाबादला हवी आपली मदत
उद्योगपतींच्या या मागणी व भूमिकेला पाठिंबा देताना शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा मुख्यमंत्र्यांना म्हणाले की, औरंगाबाद हे भरभराटीला येत असलेले टू टिअर शहर असून आयआयएमसारख्या प्रतिष्ठेच्या संस्था या शहरात सुरू होण्यासाठी आपल्या मदतीची गरज आहे. त्यावर मुख्यमंत्री चव्हाण यांनी मराठवाड्याच्या हितासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले.