शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

जिनिंग व्यवसाय कमालीचा संकटात

By admin | Updated: November 30, 2014 00:55 IST

गजेंद्र देशमुख , जालना जिल्ह्यात झालेल्या अत्यल्प पावसामुळे कापसाच्या उत्पादनात तीस ते चाळीस टक्के घट आली. त्याचबरोबर शासनाच्या काही धोरणामुळे जिनिंग व्यवसाय अडचणीत आला आहे.


गजेंद्र देशमुख , जालना
जिल्ह्यात झालेल्या अत्यल्प पावसामुळे कापसाच्या उत्पादनात तीस ते चाळीस टक्के घट आली. त्याचबरोबर शासनाच्या काही धोरणामुळे जिनिंग व्यवसाय अडचणीत आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ५० पैकी ५ जिनिंग सुरु आहेत. यामुळे पर्यायी उद्योग मिळून चारशे ते पाचशे कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचे या व्यवसायातील तज्ज्ञांनी सांगितले.
गत काही वर्षांपासून अस्मानी व सुलतानी संकटामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडत आहे. शेतकरी आर्थिक संकटात रुतत आहे. यंदा निसर्गाच्या अवकृपेमुळे कापसाच्या उत्पादनात ३० ते ४० टक्के घट आली आहे. जो कापूस आला तो व्यापारी अथवा सीसीआय केंद्रातून खरेदी होत आहे. त्यातच अत्यल्प कापूस असल्याने अनेक शेतकरी जिनिंग ऐवजी खाजगी व्यापाऱ्यास कापूस विक्री करुन मोकळे होत आहेत. याचा थेट फटका जिनिंग उद्योगाला बसत आहे.
खाजगी व्यापारी ३८०० रुपयांच्या दरम्यान तर सीसीआय ४०२५- ४०५० रुपये प्रति क्विंटलला भाव देत आहे. जिनिंगमध्ये कापूस नसल्याने अनेकांनी जिनिंंब बंद ठेवले आहेत. चार सहा महिन्यांत २० ते २५ लाख क्ंिवटल कापसाचे जिनिंंग होते.
जिनिंग व प्रेसिंग व्यवसाय साधारणपणे सहा ते सात महिने सुरु असतो त्यात डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च दरम्यान मालाची आवक जास्त असते. यावर्षी अशी परिस्थिती नाही. सीसीआय मिळून फक्त ४० ते ५० हजार क्ंिवटल कापसाची खरेदी झाली आहे.
जालना जिल्ह्यात मंठा -४, सातोना १, परतूर ५, वाटूर १, सेवली १, कुंभारपिंपळगाव २, तीर्थपुरी २, अंबड ४, भोकरदन ६, बदनापूर २, जालना १२ मिळून ५० जिनिंग आहेत. असे असले तरी यापैकी ५ जिनिंग सुरु आहेत.
सर्व जिनिंगचा विचार करता दिवसाकाठी २५ हजार क्विंटल कापसाचे जनिंग होते. दिवसाकाठी १२ ते १५ कोटींची उलाढाल होते. या वर्षी हे चित्र बदलले आहे. बोटावर मोजण्याइतक्याच जिनिंग व्यवस्थित सुरु आहेत.
पर्यायी उद्योगांना मोठा फटका
जिनिंगसोबतच आॅईलमिल, इतर उपउद्योग मिळून साधारणपणे ४०० ते ५०० कोटींचा फटका बसत आहे. कापसाच्या सरकीवर आॅईल मिल चालते. परंतु जिनिंगच बंद असल्याने आॅईल मिलवरही संकट ओढावले आहे.
एका जिनिंगमध्ये दीडशे ते दोनशे मजूर कामावर असतात. जिनिंग बंद असल्याने परिस्थिती चिंताजनक आहे. जिनिंग बंदचा फटका २ ते ३ हजार मजुरांना बसला आहे.
४जिनिंगमधून कापसाची खरेदी झाल्यास शेतकऱ्यांना तात्काळ रक्कम मिळते. वेळही वाचतो, असे असले तरी व्यापारी थेट गावात जाऊन कापसाची खरेदी करीत असल्याने शेतकरी जिनिंगवर येईनासे झाले आहेत. ४
जिनिंंग व्यवसायिक व उद्योजक राजेश नहार म्हणाले, वरुणराजाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. कापसाचे उत्पादन तर कमी झालेच परंतु शासनाच्या अनेक विचित्र धोरणांमुळेही जिनिंंग व्यवसायावर मर्यादा येत आहेत. आयात तसेच निर्यात धोरणात अनेक त्रुटी आहेत. याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.