शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान भरपाई मिळेना

By admin | Updated: July 10, 2014 00:43 IST

मोहन बारहाते, मानवत तालुक्यात झालेल्या गारपिटीची शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. मात्र बँकेच्या व्यवहारात प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहचलीच नाही.

मोहन बारहाते, मानवत
तालुक्यात झालेल्या गारपिटीची शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. मात्र बँकेच्या व्यवहारात प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहचलीच नाही. आजही सुमारे आठ ते साडेआठ हजार शेतकरी सभासद गारपिटीच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
एप्रिल २०१४ मध्ये म्हणजे पहिल्या आठवड्यातच गारपीट, वादळी व पाऊस झाला होता. या नैसर्गिक संकटानंतर शेतकऱ्यांचे गहू, ज्वारी, करडई, तूर आदी पिकांसह केळी, संत्रा, मोसंबी या फळबागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या मोठ्या नैसर्गिक संकटाची दखल घेत कृषीमंत्री व राज्याचे मंत्री, केंद्रीय पाहणी पथक तालुक्यात येऊन गेले.
नुकसानीचा अंदाज घेतल्यानंतर शासनस्तरावरून आदेश काढून प्रशासनाला नुकसानीचे पंचनामे करण्यास सांगितले. महसूल विभागाने सब घोडे बारा टक्के या न्यायाने फळबाग व धान्य पिकांचे पंचनामे करून सर्वांना न्याय दिल्याचे मनोमन मानून घेतले. त्यानंतर या पंचनाम्याच्या आधारावर नुकसान भरपाईचे आकडे टाकून या याद्या बँकेमध्ये पाठविण्यात आल्या. परंतु बँकांकडून अजूनही शेतकऱ्यांंना नुकसान भरपाईची मदत मिळाली नाही. आजही मानवतच्या मुख्य शाखेवरून सुमारे साडेआठ हजारांपर्यंत सभासद शेतकऱ्यांना मदत मिळणे बाकी आहे.
शासकीय कर्मचारी त्यांच्यापुढे आलेले काम हातावेगळे करून मोकळे होतात आणि नंतर त्याबद्दल त्यांची विस्मृती होते. शिवाजी सावंतांच्या मृत्यूंजय कादंबरीमध्ये या विषयावर वाक्य होते. ते असे ईश्वराने मानवाला सर्वात मोठी दिलेली देणगी म्हणजे विस्मृती होय. विस्मृती नसती तर विविध स्मृतींच्या ससेमिऱ्याने माणूस वेडा झाला असता, अशीच काहीशी स्थिती शासकीय कर्मचाऱ्यांची आहे. त्यांनी सर्वच लक्षात ठेवायचे म्हटले तर कर्मचारी वेडे होऊन जातील, म्हणूनच की, काय? प्रत्येक अधिकारी माहिती विचारली असता फाईल बघून सांगतो, असे म्हणतात. यावर्षी अगोदरच पेरण्यांना एक महिना उशिर झाला आहे आणि शासनाची मदत अजूनही गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या हाती नाही. पेरणी जर जून महिन्यामध्ये झाली असती तर आणखी किमान सात ते आठ हजार शेतकऱ्यांना रक्कम मिळाली नसती. अगोदरच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना खरोखरच आर्थिक मदतीची गरज आहे. परंतु उशिरा होणाऱ्या पेरणीच्या तोंडावरही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित आहे.
प्रशासकीय अधिकाऱ्यांची उदासिनता
बँकेचे व्यवस्थापक, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी यापैकी कोणासही या गारपिटी क्षतीग्रस्त झालेल्या पिकांच्या शेतकऱ्यांच्या सभासदांची संख्या कोणासही मुखपाठ नाही. यापैकी प्रत्येक जण पहावे लागेल, नक्की सांगता येत नाही, फाईल बघून सांगतो, मी कार्यालयात नाही, अशी उत्तरे देऊन मोकळे होतात. जगाचा पोशिंदा म्हणून ज्याचा गाजावाजा होतो त्या शेतकऱ्यांवर कधी नव्हे ते आस्मानी संकट कोसळले. या संकटाने शेतकरी शरीराने, मनाने आणि धनाने पूरता कोलमडून पडला. मात्र ज्याच्या जीवावर सगळे जग जगते त्याच्याबद्दल कोणालाही आस्ता नाही.