शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

कचराप्रश्नी शिवसेनेचा मनपा आयुक्तांवर ठपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 11:57 PM

शहरातील कचराकोंडीच्या वर्षभरानंतर घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न कायम आहे. शहरातील कचराप्रश्नी शिवसेनेने मनपा आयुक्तांवर ठपका ठेवला आहे.

औरंगाबाद : शहरातील कचराकोंडीच्या वर्षभरानंतर घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न कायम आहे. शहरातील कचराप्रश्नी शिवसेनेने मनपा आयुक्तांवर ठपका ठेवला आहे. वेळकाढू कार्यशैली आणि घनकचरा व्यवस्थापनाचा तयार केलेला सविस्तर प्रकल्प अहवाल चुकल्याने हा प्रश्न सुटण्याची शक्यता नसल्याची टीका शिवसेनेने मनपा आयुक्तांवर केली आहे.

स्थायी समितीचे सभापती राजू वैद्य यांनी शुक्रवारी मनपा आयुक्तांना कामात सुधारणा करण्यासंदर्भात एक पत्र दिले आहे. शहरात घनकचरा व्यवस्थापनाचा जो जटिल प्रश्न निर्माण झाला होता, त्याची प्रशासकीय कसब वापरून सोडवणूक कराल, अशी आशा होती. मुख्यमंत्र्यांनीदेखील तज्ज्ञ असल्याचे सांगून मनपा आयुक्तपदी नियुक्ती केली. परंतु एक वर्षाचा कालावधी लोटूनही परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याचे दिसून येत आहे. शहराच्या घनकचऱ्याची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने लावणे अपेक्षित असताना वेळकाढू कार्यशैलीमुळे औरंगाबाद शहराच्या चारही बाजूस नारेगावसारखी परिस्थिती झालेली आहे, असे या पत्रात नमूद केले आहे.

याबरोबर घनकचरा व्यवस्थापनांतर्गत आयुक्तांनी तयार केलेला डीपीआर चुकला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सुटण्याची शक्यता आणखी दुरावली आहे. सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) शासन स्वीकारील किंवा नाही, याची शाश्वती नाही. परिणामी शहरातील कचरा विल्हेवाटीचा प्रश्न सुटण्याची शक्यता धूसर झाली आहे, असे राजू वैद्य यांनी पत्रात नमूद केले आहे.याबरोबर उत्पन्न वाढीसाठी कोणतीही ठोस उपाययोजना नाही. वैधानिक तरतुदीचे हेतूपुरस्सर उल्लंघन क रणे, जी पदे मंजूर नाहीत, अशा पदांवर नियुक्त्या, जबाबदारीपासून अलिप्त राहण्याचे धोरण, जनतेसाठी कार्यालयात उपलब्ध नसणे आदींचाही पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. आगामी वर्ष हे निवडणुकीचे आहे. आम्हा लोकप्रतिनिधींना जनतेला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कामात योग्य सुधारणा करण्याची अपेक्षा या पत्रात राजू वैद्य यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फेकला होता कचराशहरातील कचराकोंडी फोडण्यात सत्तारूढ पक्ष अयशस्वी ठरलेले असताना १९ जुलै २०१८ रोजी शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रवेशद्वारासमोर कचरा फेकला होता. शहर स्वच्छ राखण्याची जबाबदारी असणारे नगरसेवकही कचरा टाकण्याच्या आंदोलनात सहभागी झाले होते. आता कचºयावरून मनपा आयुक्तांना शिवसेनेने लक्ष्य केले आहे.एकच उपाय, पदाधिकाºयांनो राजीनामे द्या...कचराकोंडीने त्रस्त झालेल्या औरंगाबादकरांच्या मनात काय आहे, यासंदर्भात ‘लोकमत’ने शहरातील नागरिकांचे सर्वेक्षण करून मते जाणून घेतली होती. यामध्ये ‘एकच उपाय, पदाधिकाºयांनो राजीनामे द्या’ अशी मागणी जनतेतून समोर आली होती. महापालिकेतील राजकारणामुळे प्रश्न सुटत नसल्याबरोबर ढिसाळ प्रशासनही कारणीभूत असल्याचे नागरिकांनी म्हटले होते. ३१ जानेवारी रोजी हे सर्वेक्षण सविस्तर प्रकाशित करण्यात आले होते. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद