शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
8
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
9
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
10
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
11
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
12
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
13
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
14
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
15
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
17
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
18
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
19
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
20
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
Daily Top 2Weekly Top 5

पाथरी आगारात विद्यार्थिनींची गांधीगिरी

By admin | Updated: July 12, 2014 01:12 IST

पाथरी : मानव विकास कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी प्रत्येक तालुकास्तरावर राज्य शासनाने पाच बसेस उपलब्ध करून दिल्या असल्या तरी शाळेत येणाऱ्या विद्यार्थिनींना बसच मिळत नाहीत.


पाथरी : मानव विकास कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी प्रत्येक तालुकास्तरावर राज्य शासनाने पाच बसेस उपलब्ध करून दिल्या असल्या तरी शाळेत येणाऱ्या विद्यार्थिनींना बसच मिळत नाहीत. ११ जुलै रोजी सकाळी १० च्या सुमारास खेर्डा पाटीवर मुली बसमध्ये प्रवास करण्यासाठी उभ्या असतानाही चालकाने बस न थांबविल्याने अखेर या मुलींनी पाथरी आगार व्यवस्थापकाची भेट घेऊन त्यांचा सत्कार करून गांधीगिरी केली.
मागील तीन वर्षांपासून राज्य शासनाकडून ग्रामीण भागातील मुलींना शहरामध्ये शिक्षणासाठी येण्यासाठी सोय व्हावी म्हणून बसेस उपलब्ध करून देण्याची योजना सुरू केली. प्रत्येक तालुकास्तरावर ग्रामीण भागाचे मार्ग ठरवून देऊन मानव विकासाच्या बसचा आराखडा तयार करण्यात येतो.
शाळा सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला आहे. परंतु ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींना प्रवास करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यावर कोणी नियंत्रण ठेवायचे? हा गहण प्रश्न आहे. आगाराचे कर्मचारी मनमानी करतात, शिक्षण विभागाला याकडे लक्ष देण्यास वेळ नाही, पंचायत समितीचे सोयरसूतक नाही आणि शाळेची काही जबाबदारी नाही म्हणून याबाबत कोणीच जबाबदारी घेण्यास तयार नाही. ११ जुलै रोजी पाथरी आगाराची नाथरा-पाथरी ही बस खेर्डामार्गे पाथरीकडे येत होती. खेर्डा पाटीवर या बसची वाट पाहत अनेक विद्यार्थिनी थांबल्या होत्या. परंतु चालकाने या पाटीवर बसच उभी केली नाही. गावातील ग्रा. पं. सदस्य सुरेश आमले आणि विकास वायेळ यांनी या बसचा पाठलाग करून बस पुन्हा खेर्डा पाटीवर परत आणली. याबसमध्ये बसून या विद्यार्थिनींना थेट आगार व्यवस्थापकाकडे नेण्यात आले. (वार्ताहर)
शाळेसाठी विद्यार्थिनी रस्त्यावर
दररोज शाळेत येण्यासाठी उशिर होत आहे. मानव विकासच्या बस पाटीवर थांबविल्या जात नाही. शासनाचा या योजनेचा लाभच होत नसल्याने या बसमधील संगीता सिताफळे, जना लांडगे, यशोदा सिताफळे, राधा सिताफळे, शिल्पा भाग्यवंत, साक्षी आमले, भालके यांनी डेपो मॅनेजर मोेरे यांचा हार घालून गांधीगिरीने सत्कार केला. तसेच यावेळी सदाशिव थोरात, राहूल ढगे, के.प् ाी. पांढरे, बालासाहेब डख, जम्मू खान पठाण यांंनी डेपो मॅनेजरसोबत चर्चा करून बससेवा सुरळीत करण्याची मागणी केली.
पाथरी तालुक्यातील खेर्डा पाटीवर मानव विकासची बस थांबत नसल्यामुळे विद्यार्थिनींनी आगार व्यवस्थापकास हार घालून गांधीगिरी करून आपल्या व्यथा मांडल्या.