शहरं
Join us  
Trending Stories
1
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
2
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
3
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
4
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
5
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
6
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
7
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
8
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
9
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
10
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
11
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
12
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
13
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
14
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
15
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
16
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?
17
'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
18
अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
19
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
20
गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश

बोंडअळीच्या मदतीत फुलंब्रीला ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:54 IST

तालुक्यात ६१ हजार शेतकºयाचे ३१ हजार हेक्टर क्षेत्रातील कपाशी पिकाचे पंचनामे करून शासनाला पाठविले होते, पण यातील एकाही शेतकºयाला मदत मिळणार नसल्याचा खुलासा झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कफुलंब्री : तालुक्यात ६१ हजार शेतकºयाचे ३१ हजार हेक्टर क्षेत्रातील कपाशी पिकाचे पंचनामे करून शासनाला पाठविले होते, पण यातील एकाही शेतकºयाला मदत मिळणार नसल्याचा खुलासा झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.फुलंब्री तालुक्यात बोंडअळीमुळे कपाशीचे उत्पादन पन्नास टक्यांनी कमी झाल्याने लागवडीपासून कापूस वेचणीपर्यंत केलेला खर्चही निघाला नाही. कपाशी पिकावर पडलेल्या बोंडअळीने नुकसान झाल्यानंतर याची नैसर्गिक आपत्तीत गणना करून शेतकºयांना मदत मिळावी म्हणून ओरड झाली. शासनाने याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. सर्वत्र पंचनामे झाले पण नुकसानभरपाई देताना टक्केवारीची अट लावण्यात आली. नैसर्गिक आपत्तीखाली नुकसान झाले तर त्याची टक्केवारी ठरविणे योग्य नाही, असे शेतकºयांचे म्हणणे आहे.तालुक्यात कपाशी पिकाचे क्षेत्र ३१ हजार हेक्टर असून ६१ हजार शेतकºयांची संख्या आहे. कपाशी पिकावर मोठ्या बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट होऊन शेतकºयांचे नुकसान झाले असताना फुलंब्री तालुक्यातील चार पैकी एकाही कृषी मंडळाचे अनुदानात नाव आलेले नाही. त्यामुळे तालुक्यातील एकाही शेतकºयाला मदत मिळणार नाही.तालुक्यात यंदा बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कपाशी पिकाचे उत्पादन पन्नास टक्यांनी घटले आहे. यंदा ३१ हजार हेक्टर क्षेत्रात एक लाख ५५ हजार क्विंटल कापूस निघाला. गेल्या वर्षी प्रती एकर ९ ते १० क्विंटल कापूस निघाला होता, तो यंदा केवळ प्रती एकर ५ क्विंटल निघाला. यात शेतकºयाचा लागवडीसाठी लावलेला खर्चही निघाला नाही. याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे.शासनाच्या निकषानुसार नुकसान २८ टक्केच४तालुक्यातील ३१ हजार हेक्टर क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले. त्या पंचनाम्यात ४० टक्यांपर्यंत नुकसान झाले आल्याचा अहवाल शासनाला पाठविला होता, पण शासनाने पिक विमा टप्प्याची तुलना करून बोंडअळीने केवळ २८ टक्केच क्षेत्र बाधित झाले असल्याचा निष्कर्ष काढला व यामुळे शेतकºयांना मदतीपासून वंचित ठेवले.