शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

खाजगी बस कंटेनरला धडकून पाचजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 6:54 PM

औरंगाबाद-नगर महामार्गावरील एएस क्लब चौकात सोमवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास खाजगी बस व कंटेनरचा अपघात झाला.

वाळूज महानगर : औरंगाबाद-नगर महामार्गावरील एएस क्लब चौकात सोमवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास खाजगी बस व कंटेनरचा अपघात झाला. यात बसमधील क्लिनरसह ४ प्रवासी जखमी झाले असून, इतर प्रवाशांना कोणतीही इजा न झाली नाही. बसचा वेग कमी असल्याने अनर्थ टळला.

वैष्णवी ट्रान्सपोर्टची खाजगी बस (एमएच-४०, वाय- ६९०२) ही रविवारी रात्री जळगावहून औरंगाबाद मार्गे पुण्याला ३० प्रवासी घेवून निघाली. दरम्यान, दिल्लीहून वाळूज मार्गे सोलापूरकडे जाणाऱ्या कंटेनरने (आरजे१४-जीडी३७६८) सोमवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास अचानक एएस क्लब चौकातून पैठण लिंकरोडकडे वळण घेतले. त्याचवेळी बसचालक कैलास खंदारे याने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, नियंत्रण सुटल्याने बस कंटेनरवर आदळली.

यात बसच्या कॅबिनमध्ये बसलेले क्लिनर वैभव उर्फ गणेश मराठे व अन्य ४ प्रवासी जखमी झाले. जखमी प्रवाशांची नावे समजू शकली नाहीत. तर बसची समोरील काच पूर्णपणे तुटली असून, कॅबिनचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेत जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले.

या प्रकरणी पोलीस ठाण्यात सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले. बसचा वेग जास्त असता तर मोठी दुर्घटना घडली असती, असे नागेश कुकलारे या प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

 

टॅग्स :WalujवाळूजAccidentअपघात