शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: केरळमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी, ९६ जागांवर घेतली आघाडी
2
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
3
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
4
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
5
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
6
बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
7
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
8
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
9
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
10
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
11
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
12
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
13
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
14
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
15
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
16
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
17
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
18
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
19
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
20
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

पाचशे गावांना चारशे टँकरने पाणी

By admin | Updated: June 2, 2014 01:35 IST

औरंगाबाद : मेअखेरीस मराठवाड्यातील पाणीटंचाईने आणखीनच भीषण स्वरूप धारण केले आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत विभागातील टँकरची संख्या १४४ ने वाढली आहे.

औरंगाबाद : मेअखेरीस मराठवाड्यातील पाणीटंचाईने आणखीनच भीषण स्वरूप धारण केले आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत विभागातील टँकरची संख्या १४४ ने वाढली आहे. सध्या विभागात एकूण ३९५ टँकरच्या माध्यमातून पाचशे गावांना पाण्याचा पुरवठा केला जात आहे. मराठवाड्यात यंदाही जानेवारी महिन्यापासूनच पाणीटंचाई जाणवत आहे. मात्र, सुरुवातीला टंचाईची तीव्रता काही गावांपुरतीच मर्यादित होती. एप्रिल महिन्यापासून ही तीव्रता वाढली असून, दिवसेंदिवस नवनवीन गावे पाणीटंचाईच्या फेर्‍यात येत आहेत. मागील आठवड्यात मराठवाड्यात २५१ टँकर सुरू होते. चालू आठवड्यात ही संख्या ३९५ झाली आहे. परभणी आणि हिंगोली हे दोन जिल्हे वगळता इतर सहा जिल्ह्यांमध्ये सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक १३५ गावांना १७७ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तर सर्वात कमी ५ टँकर लातूर जिल्ह्यात सुरू आहेत. टँकरशिवाय अनेक गावांत त्याच ठिकाणी विहिरी अधिग्रहित करूनही पाणीपुरवठा केला जात आहे. विभागात एकूण ६९९ खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात २३९, जालना जिल्ह्यात १६, नांदेड जिल्ह्यात १४, बीड जिल्ह्यात २६६, लातूर जिल्ह्यात ४५ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ११९ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. मागील आठवड्यात अधिग्रहित विहिरींची संख्या ३७२ होती. चालू आठवड्यात त्यात आणखी ३२७ ची भर पडली आहे. सध्या अधिग्रहित करण्यात आलेल्या ६९९ विहिरींपैकी २०० विहिरी या टँकर भरण्यासाठी अधिग्रहित केल्या गेल्या आहेत. जिल्हाटँकर औरंगाबाद१७७ जालना०७ नांदेड१७ बीड१२९ लातूर०५ उस्मानाबाद६० एकूण३९५