शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘ती’ शाळा बंद करण्याचे आदेश

By admin | Updated: August 21, 2014 01:22 IST

पाटोदा : तालुक्यातील तांबा राजुरी येथे असलेल्या मतिमंद विद्यालयाच्या संस्था चालकांमध्ये वाद आहे. यातूनच काही सदस्यांनी अनधिकृतपणे इतर

पाटोदा : तालुक्यातील तांबा राजुरी येथे असलेल्या मतिमंद विद्यालयाच्या संस्था चालकांमध्ये वाद आहे. यातूनच काही सदस्यांनी अनधिकृतपणे इतर ठिकाणी मतिमंद शाळा भरविली होती. सदरील प्रकरण ‘लोकमत’ने उघडकीस आले होते. अखेर याची दखल समाजकल्याण अधिकाऱ्यांनी घेऊन २४ तासात अनधिकृतपणे सुरू असलेली शाळा बंद करावी, असे आदेश दिले आहेत.तांबा राजुरी येथे विद्याविकास संस्थेचे मूकबधीर व मतिमंद विद्यालय आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर सुपेकर यांनी १६ डिसेंबर १९७७ रोजी राजीनामा दिलेला आहे. सदरील प्रकरण धर्मादाय आयुक्तांकडे आहे. दरम्यान, सध्या कागदोपत्री अध्यक्ष सुपेकर हेच आहेत. याचा फायदा घेत त्यांनी काही कर्मचारी व सदस्य नवनाथ तांबे यांच्यासह तांबा राजुरी येथेच एका इमारतीमध्ये अनधिकृतपणे शाळा भरविली होती. काही कर्मचाऱ्यांनी मूकबधिर मुलांच्या पालकांची दिशाभूल करून अनधिकृतपणे भरविलेल्या शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला होता. सदरील प्रकार समोर येताच पालक पांडुरंग पोकळे (रा. बेलगाव ता. आष्टी) व छायाबाई केकान (रा. भुतवडा ता. जामखेड) यांनी सोमीनाथ तनपुरे या कर्मचाऱ्याविरोधात न्यायालयात दाद मागितली होती. यावर न्यायालयाने सदरील विद्यार्थ्यांना पालकांच्या ताब्यात द्यावे, असे आदेश दिले होते. यानंतरही सदरची अनधिकृत शाळा सुरूच राहिल्याचे जि.प. समाजकल्याण कार्यालयातील अधिकारी लांडे, मोराळे यांनी अधिकृत असलेल्या शाळेची तपासणी केली होती. यावेळी नवनाथ तांबे व इतरांनी या अधिकाऱ्यांना दमदाटी करून पिटाळून लावले होते. सदरील प्रकारावर ‘लोकमत’ने २० जुलै रोजी वृत्तही प्रकाशित केले होते. सदरील प्रकाराबाबत संस्थासचिव विठ्ठल तांबे यांनी समाजकल्याण अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहारही केला होता. अनधिकृतरित्या भरविलेल्या शाळेत काही अनुचित प्रकार होऊ शकतो यासाठी सदरील शाळा बंद करण्याची मागणी केली होती. यावर जि.प. समाजकल्याण अधिकारी शेळके यांनी आदेश काढले आहेत. मान्यताप्राप्त कर्मचाऱ्यांना मूळ शाळेवर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कर्मचाऱ्यांनी बोगस शाळा सुरू करून विद्यार्थ्यांना वेठीस धरले, अपंग कायदा १९९५ चे प्रकरण १० कलम ५१ नुसार विद्यार्थ्यांना डांबून ठेवून त्यांचा हक्क हिरावून घेत शोषण केल्याचे ताशेरेही ओढले आहेत. मान्यताप्राप्त कर्मचाऱ्यांनी अधिकृत इमारतीमध्येस सर्व विद्यार्थ्याना बसविण्याचे आदेश दिले असून चोवीस तासांच्या आत अनधिकृत शाळा बंद करण्याचेही सूचित केले आहे. (वार्ताहर)