शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

कर्जबुडव्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा

By admin | Updated: July 19, 2014 01:21 IST

औरंगाबाद : ‘बँकेचा पैसा जनतेच्या भल्यासाठी, नाही कोणाच्या लुटीसाठी,’ अशा घोषणा देत देशातील बड्या कर्जबुडव्यांविरोधात आज बँक कर्मचाऱ्यांनी आवाज बुलंद केला.

औरंगाबाद : ‘बँकेचा पैसा जनतेच्या भल्यासाठी, नाही कोणाच्या लुटीसाठी,’ अशा घोषणा देत देशातील बड्या कर्जबुडव्यांविरोधात आज बँक कर्मचाऱ्यांनी आवाज बुलंद केला. जाणीवपूर्वक बडी कर्ज थकविणाऱ्या कर्जदारांना फौजदारी गुन्हा लागू करा, सार्वजनिक बँकांचे खाजगीकरण करू नका, या मागणीसाठी औरंगाबाद जिल्हा बँक कर्मचारी असोसिएशनच्या वतीने निदर्शने करण्यात आली. बँक राष्ट्रीयीकरणाच्या ४५ व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात अशा प्रकारची निदर्शने करण्यात आली. सिडकोतील स्टेट बँक आॅफ हैदराबाद बँकेच्या विभागीय कार्यालयासमोर सायंकाळी ५ वाजता निदर्शने करण्यासाठी बँक कर्मचारी जमा झाले होते. याचे नेतृत्व असोसिएशनचे अध्यक्ष देवीदास तुळजापूरकर यांनी केले.नवीन भाजपा सरकारही सार्वजनिक बँकविरोधी असून या सार्वजनिक बँकांचे खाजगीकरण करण्याचा त्यांचा मनसुबा अर्थसंकल्पातून व्यक्त झाला आहे. मात्र, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमुळेच भारतातील आर्थिकव्यवस्था टिकून राहिली, हे त्यांनी यावेळी निर्दशात आणून दिले. इन्कम टॅक्स बुडविणाऱ्यांची यादी जाहीर केली जाते, त्याच धर्तीवर बँकेचे कर्ज बुडविणाऱ्यांची यादी जाहीर करण्यात यावी, बड्या कॉर्पोरेट उद्योगपतींना नवीन बँकांचे परवाने देऊ नका. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण ग्राहक विरोधी आहे. स्टेट बँकांच्या सहयोगी ५ बँकांच्या कायद्यातून मुक्त करा, आदी मागण्यांची माहिती रवी धामणगावकर यांनी दिली. निदर्शनात बी.एन. देशमुख, सुनीता गणोरकर, बबन खर्डेकर, सतीश देशपांडे, अजय पाटील, राकेश बुरबुरे, कुमुदिनी देशमुख, जयश्री जोशी, सुहासिनी देशमुख यांच्यासह बँक कर्मचारी हजरहोते. गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षर करण्याचा निर्धारचीट फंड घोटाळा, केबीसी घोटाळा आदी घोटाळ्यांत सर्वसामान्य गुंतवणूकदाराची आर्थिक लूट होत आहे.गुंतवणूकदारांनी कुठे पैसा गुंतवावा, त्यांचा पैसा कुठे सुरक्षित राहील, याची माहिती देण्यासाठी गुंतवणूकदरांना आर्थिक साक्षर करण्याचा विडा बँक कर्मचाऱ्यांनी उचलला आहे. सार्वजनिक बँकांचे खाजगीकरण रोखणे, बँकेचे कर्ज बुडवून जनतेच्या पैशावर डल्ला मारणारे बडे उद्योजक या विरोधात लढ्यात जनतेला सहभागी करून घेण्यात येणार आहे. यासाठी सर्वप्रथम गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षर करण्यात येणार असल्याची घोषणा देवीदास तुळजापूरकर यांनी केली.?